शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

वाघांच्या बंदाेबस्तासाठी गावकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

वाघाच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबास २५ लाखांची एकरकमी मदत द्यावी, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी, वाघांमुळे जखमी झालेल्या व्यक्तीस पाच लाख रुपये देण्यात यावेत. गडचिरोली आणि वडसा वन विभागातील उपवनसंरक्षकांनी नरभक्षी वाघांच्या बंदोबस्ताकरिता कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे निष्पाप ११ लोकांचा बळी गेला, यास जबाबदार दोन्ही वन विभागातील उपवनसंरक्षकांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली तालुक्यात धुमाकूळ घालत अनेकांचा बळी घेणाऱ्या वाघाचा ताबडतोब बंदाेबस्त करावा, या मागणीसाठी येथील वनसंरक्षक कार्यालयासमाेर बुधवार, दि. १ सप्टेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदाेलन सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी या आंदाेलनात राजकीय पदाधिकारी, सरपंचांसह १८ गावांमधील शेतकरी सहभागी झाले होते.भारतीय जनसंसद शाखा गडचिरोलीसह ग्रामपंचायतींच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या ठिय्या आंदोलनादरम्यान विविध मागण्या करण्यात आल्या. त्यात वाघाच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबास २५ लाखांची एकरकमी मदत द्यावी, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी, वाघांमुळे जखमी झालेल्या व्यक्तीस पाच लाख रुपये देण्यात यावेत. गडचिरोली आणि वडसा वन विभागातील उपवनसंरक्षकांनी नरभक्षी वाघांच्या बंदोबस्ताकरिता कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे निष्पाप ११ लोकांचा बळी गेला, यास जबाबदार दोन्ही वन विभागातील उपवनसंरक्षकांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, आदी मागण्यांचे निवेदन वनसंरक्षक डाॅ. किशाेर मानकर यांना देण्यात आले. या गावकऱ्यांच्या आंदाेलनाचे नेतृत्व जनसंसदचे पदाधिकारी नीलकंठ संदोकर, विजय खरवडे, रमेश बांगरे, गडचिरोली पंचायत समितीचे सभापती माराेतराव इचाेडकर, उपसभापती विलास दशमुखे, आंबेशिवणीचे उपसरपंच योगाजी कुडवे आदींनी केले. आंदाेलनात पंचायत समिती सदस्य रामरतन गाेहणे, डाॅ. नीलिमा सिंग आदींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

सरपंच-उपसरपंचांचा आंदाेलनात सहभाग- ठिय्या आंदोलनात तालुक्यातील आंबेशिवणी, आंबेटोला, भिकारमौशी, खुर्सा, गिलगाव, मुरमाडी, अमिर्झा, मौशिखांब, टेंभा, चांभार्डा, धुंडेशिवणी, राजगाटा चेक, उसेगाव, चेप्रा, दिभना, गोगाव, अडपल्ली, चुरचुरा, नवेगाव, पोर्ला, मेंढा अशा १८ गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक सहभागी झाले आहेत. गेल्या काही महिन्यात बळी गेलेले नागरिक याच गावांच्या परिसरातील रहिवासी हाेते. काही शेतकऱ्यांची गुरेही वाघांनी ठार मारली आहेत.

- तर शेतकऱ्यांच्या हातात बंदुका द्या- गेल्या तीन-चार महिन्यांपासून गडचिरोली तालुक्यातील १८ गावांच्या परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या १० महिन्यांत ११ शेतकऱ्यांचा बळी गेला असून, अनेक जनावरेही वाघाचे शिकार झाले आहे. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाने वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरणाऱ्या या वाघांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या हातात बंदुका द्या, वाघाचा आम्ही बंदोबस्त करतो, असा इशारा पं.स.उपसभापती विलास दशमुखे व भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी यावेळी दिला. तीन दिवसांत त्या वाघांना जेरबंद करा, अन्यथा वनसंरक्षक कार्यालयाला कुलूप ठोकू, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :agitationआंदोलनTigerवाघ