शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

वाघांच्या बंदाेबस्तासाठी गावकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:40 IST

गडचिराेली तालुक्यातील आंबेशिवणी, आंबेटोला, भिकारमोशी, अमिर्झा, कळमटोला, धुंडेशिवणी, पिपरटोला, नवरगांव, चुरचुरा, कुऱ्हाडी, महादवाडी, गोगाव, दिभना, जेप्रा, राजगाटाचक, उसेगाव, मुरुमबोडी, ...

गडचिराेली तालुक्यातील आंबेशिवणी, आंबेटोला, भिकारमोशी, अमिर्झा, कळमटोला, धुंडेशिवणी, पिपरटोला, नवरगांव, चुरचुरा, कुऱ्हाडी, महादवाडी, गोगाव, दिभना, जेप्रा, राजगाटाचक, उसेगाव, मुरुमबोडी, बोथेडा, गिलगांव, खुर्सा, मुरमाडी या भागात नरभक्षक वाघांचा वावर आहे. नरभक्षक वाघांमुळे ११ निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे. तसेच २ व्यक्ती जखमी झालेले आहेत तर ५० ते ६० पाळीव जनावरे वाघाने फस्त केले आहेत. २३ ऑगस्टला वनसंरक्षक व उपवनसंरक्षक यांना देऊन नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याकरीता निवेदन देण्यात आले होते, असे असतानासुद्धा वनविभागाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. २५ ऑगस्टला गोगाव येथील रामाजी चुधरी यांचा बळी गेला. नागरिकांचा बळी जात असताना वनविभाग काेणतीही उपाययाेजना करण्यास तयार नाहीत. त्यामुळे १ सप्टेंबरपासून ठिय्या आंदाेलन करण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेला मनाेहर झंजाळ, याेगेश कुडवे, वामन गडपायलेे, अरूण कथलपवार, निलंकर म्हस्के, रेवनाथ मेश्राम, लताताई मडावी, रमेश गुरनुले, साेमाजी करकाडे, खुशाल मुरतेली, यादव जांभूळकर, मेघराज राऊत, रमेश चाैधरी, साईनाथ कंडीलवार, सुरेश जुमनाके, संजय शिंगाडे, संभाजी ठाकरे, ज्ञानेश्वर गुरनुले, गाेवर्धन नरुले, सुनील नक्षीणे, अतुल राऊत यांच्यासह जवळपास ५० नागरिक हजर हाेते.

बाॅक्स

माणसाची किंमत १५ लाख रुपये काय

वाघाने हल्ला केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला वनविभागाकडून १५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. माणसाची किमत १५ लाख रुपयेच काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. १५ लाख रुपये वनविभाग देते म्हणून वनविभाग काेणतीही उपाययाेजना करणार नाही काय? तथाकथित वन्यजीवप्रेमी वाघांचे संरक्षण करण्याच्या केवळ गाेष्टी करतात. मात्र, त्यांच्या कुटुंबातील सदस्याला जर वाघाने ठार मारले तर ते चूप राहणार काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

नरभक्षक वाघामुळे आम्रपर्यंत ११ लोकांचा बळी गेलेला आहे तरी वडसा व गडचिरोली या दोन्ही उपवनरक्षकांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे व नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त न केल्यास वनविभागाच्या कोणत्याही कर्मचारी व अधिकाऱ्यास परिसरात फिरू देणार नाही तसेच दिनांक ०१/०९/२०२१ पासून वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहोत.