शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या बंदाेबस्तासाठी गावकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:40 IST

गडचिराेली तालुक्यातील आंबेशिवणी, आंबेटोला, भिकारमोशी, अमिर्झा, कळमटोला, धुंडेशिवणी, पिपरटोला, नवरगांव, चुरचुरा, कुऱ्हाडी, महादवाडी, गोगाव, दिभना, जेप्रा, राजगाटाचक, उसेगाव, मुरुमबोडी, ...

गडचिराेली तालुक्यातील आंबेशिवणी, आंबेटोला, भिकारमोशी, अमिर्झा, कळमटोला, धुंडेशिवणी, पिपरटोला, नवरगांव, चुरचुरा, कुऱ्हाडी, महादवाडी, गोगाव, दिभना, जेप्रा, राजगाटाचक, उसेगाव, मुरुमबोडी, बोथेडा, गिलगांव, खुर्सा, मुरमाडी या भागात नरभक्षक वाघांचा वावर आहे. नरभक्षक वाघांमुळे ११ निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे. तसेच २ व्यक्ती जखमी झालेले आहेत तर ५० ते ६० पाळीव जनावरे वाघाने फस्त केले आहेत. २३ ऑगस्टला वनसंरक्षक व उपवनसंरक्षक यांना देऊन नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याकरीता निवेदन देण्यात आले होते, असे असतानासुद्धा वनविभागाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. २५ ऑगस्टला गोगाव येथील रामाजी चुधरी यांचा बळी गेला. नागरिकांचा बळी जात असताना वनविभाग काेणतीही उपाययाेजना करण्यास तयार नाहीत. त्यामुळे १ सप्टेंबरपासून ठिय्या आंदाेलन करण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेला मनाेहर झंजाळ, याेगेश कुडवे, वामन गडपायलेे, अरूण कथलपवार, निलंकर म्हस्के, रेवनाथ मेश्राम, लताताई मडावी, रमेश गुरनुले, साेमाजी करकाडे, खुशाल मुरतेली, यादव जांभूळकर, मेघराज राऊत, रमेश चाैधरी, साईनाथ कंडीलवार, सुरेश जुमनाके, संजय शिंगाडे, संभाजी ठाकरे, ज्ञानेश्वर गुरनुले, गाेवर्धन नरुले, सुनील नक्षीणे, अतुल राऊत यांच्यासह जवळपास ५० नागरिक हजर हाेते.

बाॅक्स

माणसाची किंमत १५ लाख रुपये काय

वाघाने हल्ला केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला वनविभागाकडून १५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. माणसाची किमत १५ लाख रुपयेच काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. १५ लाख रुपये वनविभाग देते म्हणून वनविभाग काेणतीही उपाययाेजना करणार नाही काय? तथाकथित वन्यजीवप्रेमी वाघांचे संरक्षण करण्याच्या केवळ गाेष्टी करतात. मात्र, त्यांच्या कुटुंबातील सदस्याला जर वाघाने ठार मारले तर ते चूप राहणार काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

नरभक्षक वाघामुळे आम्रपर्यंत ११ लोकांचा बळी गेलेला आहे तरी वडसा व गडचिरोली या दोन्ही उपवनरक्षकांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे व नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त न केल्यास वनविभागाच्या कोणत्याही कर्मचारी व अधिकाऱ्यास परिसरात फिरू देणार नाही तसेच दिनांक ०१/०९/२०२१ पासून वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहोत.