शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

वैरागडात पाणी टंचाई तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:18 IST

वैलोचना नदी पात्रात असलेल्या जुन्याच ७५ हजार लिटर क्षमतेच्या नळ योजनेतून गावाला पाणी पुरवठा होत आहे. तसेच नळ योजनेच्या विहिरीत पाणीसाठा कमी असल्याने वैरागड गावात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनळ योजना अंतिम टप्प्यात : पिण्यासाठी गळतीच्या पाण्याचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैलोचना नदी पात्रात असलेल्या जुन्याच ७५ हजार लिटर क्षमतेच्या नळ योजनेतून गावाला पाणी पुरवठा होत आहे. तसेच नळ योजनेच्या विहिरीत पाणीसाठा कमी असल्याने वैरागड गावात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील बरेच लोक पिण्यासाठी गळतीच्या पाण्याचा वापर करीत आहेत.ग्रामस्थ पाईप लाईन वॉल्वमधून निघणारे गळतीचे पाणी पिण्यासाठी आपल्या घरी नेत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. वैरागड येथील वाढत्या लोकसंख्येमुळे जुन्या नळ योजनेचे पाणी गावाला पुरत नाही. परिणामी मागील १०-१५ वर्षापासून उन्हाळ्यात वैरागड येथे पाणी टंचाईची समस्या जाणवते. येथील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. सद्य:स्थितीत गावातील पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणच्या नळाला पिण्यापुरतेही पाणी येत नाही. जेवढे पाणी येते ते गढूळ असते. त्यामुळे अनेक नागरिक हातपंप व विहिरीचा आधार घेऊन आपली पाण्याची गरज पूर्ण करीत आहेत. मात्र या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.दरवर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन मागील दोन ते तीन वर्षांपासून वैरागड येथील गोरजाई डोहावर अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त नवीन नळ योजनेचे काम प्रस्तावित आहे. सद्य:स्थितीत या नळ योजनेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे, अशी माहिती ग्रामीण पेयजल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.गेल्या तीन-चार वर्षाच्या तुलनेत वैरागड गावातील कुटुंबधारकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नळ योजनेचे पाणी गावात अपुरे पडते. गावातील पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना अद्यापही केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाप्रती रोष व्यक्त होत आहे. सदर समस्येसंदर्भात लोकमतने अनेकदा वृत्त प्रकाशित करून ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र निगरगट्ट प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही.महिलांची पाण्यासाठी पायपीटवैरागड गावात सार्वजनिक विहिरी व हातपंप आहेत. मात्र या साधनांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे अनेक कुटुंब नळ योजनेच्या पाण्यावर अवलंबून असतात. मात्र वैलोचना नदीची पाणी पातळी खालावली असल्यामुळे येथे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिला व मुली सकाळपासूनच पाण्यासाठी पायपीट करीत असतात. हातपंप व विहिरीवर महिलांची सकाळपासूनच गर्दी दिसून येते.पाणी समस्या कमी करण्यासाठी नदी पात्रात तत्काळ हातबोअर पंप बसविण्यात आला आहे. मात्र भूजलपातळी इतकी खोल गेली आहे की, या हातबोअर पंपाचे पाणी विहिरीपर्यंत पोहोचत नाही.- एन. ए. घुटके, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत वैरागड

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई