शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

वैरागडात पाणी टंचाई तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:18 IST

वैलोचना नदी पात्रात असलेल्या जुन्याच ७५ हजार लिटर क्षमतेच्या नळ योजनेतून गावाला पाणी पुरवठा होत आहे. तसेच नळ योजनेच्या विहिरीत पाणीसाठा कमी असल्याने वैरागड गावात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनळ योजना अंतिम टप्प्यात : पिण्यासाठी गळतीच्या पाण्याचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैलोचना नदी पात्रात असलेल्या जुन्याच ७५ हजार लिटर क्षमतेच्या नळ योजनेतून गावाला पाणी पुरवठा होत आहे. तसेच नळ योजनेच्या विहिरीत पाणीसाठा कमी असल्याने वैरागड गावात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील बरेच लोक पिण्यासाठी गळतीच्या पाण्याचा वापर करीत आहेत.ग्रामस्थ पाईप लाईन वॉल्वमधून निघणारे गळतीचे पाणी पिण्यासाठी आपल्या घरी नेत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. वैरागड येथील वाढत्या लोकसंख्येमुळे जुन्या नळ योजनेचे पाणी गावाला पुरत नाही. परिणामी मागील १०-१५ वर्षापासून उन्हाळ्यात वैरागड येथे पाणी टंचाईची समस्या जाणवते. येथील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. सद्य:स्थितीत गावातील पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणच्या नळाला पिण्यापुरतेही पाणी येत नाही. जेवढे पाणी येते ते गढूळ असते. त्यामुळे अनेक नागरिक हातपंप व विहिरीचा आधार घेऊन आपली पाण्याची गरज पूर्ण करीत आहेत. मात्र या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.दरवर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन मागील दोन ते तीन वर्षांपासून वैरागड येथील गोरजाई डोहावर अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त नवीन नळ योजनेचे काम प्रस्तावित आहे. सद्य:स्थितीत या नळ योजनेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे, अशी माहिती ग्रामीण पेयजल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.गेल्या तीन-चार वर्षाच्या तुलनेत वैरागड गावातील कुटुंबधारकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नळ योजनेचे पाणी गावात अपुरे पडते. गावातील पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना अद्यापही केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाप्रती रोष व्यक्त होत आहे. सदर समस्येसंदर्भात लोकमतने अनेकदा वृत्त प्रकाशित करून ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र निगरगट्ट प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही.महिलांची पाण्यासाठी पायपीटवैरागड गावात सार्वजनिक विहिरी व हातपंप आहेत. मात्र या साधनांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे अनेक कुटुंब नळ योजनेच्या पाण्यावर अवलंबून असतात. मात्र वैलोचना नदीची पाणी पातळी खालावली असल्यामुळे येथे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिला व मुली सकाळपासूनच पाण्यासाठी पायपीट करीत असतात. हातपंप व विहिरीवर महिलांची सकाळपासूनच गर्दी दिसून येते.पाणी समस्या कमी करण्यासाठी नदी पात्रात तत्काळ हातबोअर पंप बसविण्यात आला आहे. मात्र भूजलपातळी इतकी खोल गेली आहे की, या हातबोअर पंपाचे पाणी विहिरीपर्यंत पोहोचत नाही.- एन. ए. घुटके, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत वैरागड

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई