शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
5
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
6
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
7
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
8
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
9
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
10
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
11
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
12
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
13
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
14
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
15
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
16
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
17
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
18
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
19
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
20
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
Daily Top 2Weekly Top 5

vidhan sabha 2019 - संभावित उमेदवारांची तिकिटांसाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

गडचिरोलीचे विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांनी वैद्यकीय अधिकारीपदाचा त्याग करून गेल्यावेळी भाजपच्या तिकीटवर नशिब आजमावले आणि ते यशस्वी झाले. यावेळी मधल्या काळात वातावरण चांगले नव्हते. भाजपकडून दुसऱ्या उमेदवारांची चाचपणीही झाली. त्यामुळे त्यांचे तिकीट कापले जाणार की काय, अशी चर्चा होती. मात्र अलिकडे तेसुद्धा निश्चिंत आहे.

ठळक मुद्देविधानसभेचा बिगुल वाजला : सर्वच पक्षांमध्ये पक्षांतराची शक्यता, पक्षनिष्ठेचा लागणार कस

मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीचा बहुप्रतीक्षित बिगूल अखेर शनिवारी वाजताच संभावित उमेदवारांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली आहे. सत्तारूढ भाजप-शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच इच्छुक उमेदवारांना तिकीट आपल्यालाच मिळणार की नाही अशी धाकधूक वाटत आहे. एक-दोन उमेदवार सोडल्यास कोणता मतदार संघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार आणि कोणाची तिकीट कटणार याची काहीच शाश्वती नाही. त्यामुळे संभावित उमेदवार आपापले तिकीट पक्के करण्यासाठी धावाधाव करीत आहेत.
गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी हे तीनही मतदार संघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यामुळे या प्रवर्गातील अनेक उच्चशिक्षित लोक नोकरीचा त्याग करून या मतदार संघांमधून आपले राजकीय नशिब आजमावत असतात. यावेळीही ही परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे.
गडचिरोलीचे विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांनी वैद्यकीय अधिकारीपदाचा त्याग करून गेल्यावेळी भाजपच्या तिकीटवर नशिब आजमावले आणि ते यशस्वी झाले. यावेळी मधल्या काळात वातावरण चांगले नव्हते. भाजपकडून दुसऱ्या उमेदवारांची चाचपणीही झाली. त्यामुळे त्यांचे तिकीट कापले जाणार की काय, अशी चर्चा होती. मात्र अलिकडे तेसुद्धा निश्चिंत आहे.
आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे हे विशेष अशी राजकीय पार्श्वभूमी नसताना सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार यांच्या राजकीय खेळीवर विजयी झाले. यावेळीही तिकीट आणण्यापासून तर विजयी होण्यापर्यंत त्यांची मदार पोरेड्डीवार यांच्यावरच आहे. ते तिकीटच्या बाबतीत निश्चिंत असले तरी या मतदार संघात काँग्रेसच्या संभावित उमेदवारांची भाऊगर्दी आहे. पक्ष अनुभवाला प्राधान्य देते की नवीन दमाचा उमेदवार उतरवते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अहेरी मतदार संघात अजूनही वातावरण स्पष्ट झालेले नाही. भाजपच्या तिकीटासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे धोरण अजून निश्चित झालेले नाही. अम्ब्रिशराव आणि धर्मरावबाबा यांनी जनसंपर्कातून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले असले तरी कोण कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबत तर्कवितर्क सुरूच आहेत. त्यामुळे पक्षांतराला ऊत येण्याची शक्यता आहे.

अहेरीत राजघराण्याची प्रतिष्ठा पणाला
अहेरी मतदार संघावर आतापर्यंत आत्राम राजघराण्याचे वर्चस्व राहिले आहे. विद्यमान आमदार अम्ब्रिशराव आत्राम यांचे आजोबा विश्वेश्वरराव, वडील सत्यवानराव यांच्यानंतर धर्मरावबाबा यांनी तीन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. मात्र २००९ च्या निवडणुकीत या मतदार संघात आदिवासी विद्यार्थी संघाचे दीपक आत्राम हे राजघराण्याबाहेरील उमेदवार प्रथमच निवडून आले. तत्पूर्वी पेंटारामा तलांडी हे इतर उमेदवारांचे नामांकन रद्द झाल्यामुळे अविरोध निवडून आले होते. आता पुन्हा एकदा राजघराण्याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

भाजप-काँग्रेसमध्ये गटबाजी कायम
जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात गटबाजी आहे. सत्ता गेल्यानंतरही गेल्या पाच वर्षातही ही गटबाजी संपलेली नाही. त्याचा काहीसा फटका लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सहनही करावा लागला. पण अजूनही संभावित उमेदवारांच्या स्वभावात फारसा फरक पडलेला नाही. दुसरीकडे भाजप सत्तेवर आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा, अनेकांचा झालेला अपेक्षाभंग, यामुळे या पक्षातही गटबाजीची लागण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी भाजपलाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

संभावित नवीन चेहरे
वामनराव सावसाकडे (काँग्रेस)
माधुरी मडावी (काँग्रेस)
अ‍ॅड.लालसू नोगोटी (वंबआ)
डॉ.नितीन कोडवते (काँग्रेस)
संदीप कोरेत (भाजप)
अशोक धापोडकर (शिवसेना)

अम्ब्रिशराव यांची कसोटी
अहेरी मतदार संघातून पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरून जिंकून आलेले अम्ब्रिशराव आत्राम यांना भाजप सरकराने राज्यमंत्रीपदही बहाल केले. पण कार्यकाळाच्या अखेरच्या दिवसात मंत्रीपद सोडावेही लागले. लोकसभेत या मतदार संघात घटलेले मताधिक्य पुन्हा कमावण्यासाठी त्यांची कसोटी लागणार आहे.

‘पेसा’ कुणाकडे?
जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या पेसा ग्रामपंचायती आपला स्वतंत्र प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्यासाठी उत्सुक आहे. अहेरी मतदार संघात त्यांच्या वतीने कोणी लढतीत उतरण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भामरागड मधून अ‍ॅड.लालसू नोगोटी हे पेसाचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले. मात्र यावेळी ते वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटवर लढणार असल्याची चर्चा आहे.

शेकाप लढणारच
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा घटकपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला आपले निवडणुकीतील बोधचिन्ह टिकवून ठेवण्यासाठी विशिष्ट जागांवर आपले उमेदवार उभे करणे गरजेचे आहे. आघाडीत तेवढ्या जागा शेकापला मिळणार नसल्याने काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होऊ शकते. गडचिरोलीत लढण्यासाठी शेकाप तयारीत आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा