शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विधान भवनावर फडकवणार विदर्भाचा झेंडा, विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्धार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 18:00 IST

विदर्भातील शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न संपविण्यासाठी आणि विदर्भाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हा एकमेव पर्याय आहे. असे असताना सरकार या मुद्यावर चाल ढकलपणा करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून येत्या १ मे महाराष्ट्र दिनी विदर्भातून हजारो शेतकरी, बेरोजगार, महिलांना घेऊन नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा फडकविला जाईल, असा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी येथे व्यक्त केला.

गडचिरोली : विदर्भातील शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न संपविण्यासाठी आणि विदर्भाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हा एकमेव पर्याय आहे. असे असताना सरकार या मुद्यावर चाल ढकलपणा करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून येत्या १ मे महाराष्ट्र दिनी विदर्भातून हजारो शेतकरी, बेरोजगार, महिलांना घेऊन नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा फडकविला जाईल, असा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी येथे व्यक्त केला.समितीच्या वतीने येत्या मार्च, एप्रिल व मे महिन्यात केल्या जाणा-या विविध आंदोलनांची माहिती सोमवारी येथे नेवले व इतर पदाधिका-यांनी दिली. त्यात १ मार्चला शासनाच्या निषेधार्थ बेरोजगारांचे डिग्री जलाओ आंदोलन, तर १६ व १७ एप्रिलला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यात विदर्भ आर्थिकदृष्ट्या कसे सक्षम राज्य राहीले हे पटवून दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. वर्षाला २ कोटी लोकांना रोजगार देऊ असे सांगणा-या सरकारमुळे नोटबंदीनंतर अनेक उद्योग बंद पडून लाखो युवक बेरोजगार झाले. आता आणखी ३० टक्के नोकरकपात करण्याचा सरकारचा मानस आहे. नोक-या कमी करणारे सरकार नवीन नोक-या काय देणार? दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढतच आहे. म्हणून विदर्भ राज्य वेगळे करून विदर्भवासियांच्या विकासाचा मार्ग मोकळा करा, अशी मागणी समितीच्या पदाधिका-यांनी सरकारला उद्देशून केली.या पत्रपरिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे गडचिरोली जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, पश्चिम विदर्भाच्या महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, सुधाकर नाईक, जगदीश बद्रे, जिल्हा सचिव डॉ.देवीदास मडावी, घिसू पाटील खुणे, सुधाकर डोईजड, प्रतिभा चौधरी, अनिता मडावी, रमेश भुरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शब्द पाळला नाही तर सत्ता जाईलभाजपने निवडणूक काळात दिलेले विदर्भ राज्याचे आश्वासन पाळण्याची ही वेळ आहे. आज विदर्भातील आमदारसंख्येच्या बळावर राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे राजकीय अडचणीतून भाजप सरकार विदर्भ राज्याचा मुद्दा टोलवत आहे. लगतच्या तेलंगणाच्या निर्मितीसाठीही आंध्रातील काँगे्रस सरकारने विलंब केला आणि दोन्ही राज्यात काँग्रेसला हार पत्करावी लागली. भाजपने शब्द पाळण्यास विलंब लावल्यास भाजपाचीही तीच गत होईल, असा इशारा राम नेवले यांनी दिला.

टॅग्स :nagpurनागपूर