शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पुढील दोन आठवडे अतिशय महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

संचारबंदीची योग्य अंमलबजावणी झाल्यास कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील. यामध्ये संसर्ग टाळण्यासाठी विलगीकरण करणे, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व पुरवठा करणे, गरजूंपर्यंत मदत पोहोचविणे या कामांना गती देता येईल. जिल्हा कोरोना संसर्गमुक्त ठेवण्यासाठी लॉकडाऊन संचारबंदी आवश्यक आहे. त्यातून सूट देणे म्हणजे, संसर्गाला आमंत्रण दिल्यासारखे आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : संचारबंदीची यशस्वी अंमलबजावणी झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकही कोरोनाबाधीत रूग्ण नाही. नागरिकांनी अजून काही दिवस संयम बाळगावा. दुसºया जिल्ह्यातून आलेले अजुनही १ हजार ५९२ नागरिक आरोग्य विभागाच्या निगराणीखाली आहेत. पुढील दोन आठवडे अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.संचारबंदीची योग्य अंमलबजावणी झाल्यास कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील. यामध्ये संसर्ग टाळण्यासाठी विलगीकरण करणे, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व पुरवठा करणे, गरजूंपर्यंत मदत पोहोचविणे या कामांना गती देता येईल. जिल्हा कोरोना संसर्गमुक्त ठेवण्यासाठी लॉकडाऊन संचारबंदी आवश्यक आहे. त्यातून सूट देणे म्हणजे, संसर्गाला आमंत्रण दिल्यासारखे आहे. जीवनावश्यक वस्तू व शेतीविषयक दुकानांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र याचा दुरूपयोग होता कामा नये. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही. लहानसहान कामासाठी अनावश्यक काही नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यांनी संयम बाळगावा. दोन आठवडे घराबाहेर पडू नये.एकूण १७ हजार १०३ नागरिक दुसºया जिल्ह्यातून आले होते. त्यापैकी १ हजार ५९२ नागरिकांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झालेला नाही. त्यांच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत ४५ नागरिकांचे नमुने तपासले आहेत. त्यातील ४१ नमुने निगेटीव्ह आले आहेत. दोन नमुन्यांचा अहवाल मिळणे बाकी आहे. अजुनही धोका संपला नाही. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. कोरोनामुक्त नऊ जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे. कोरोनाविरोधात लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. संचारबंदीचे पालन जेवढे चांगल्या पध्दतीने होईल, तेवढेच लवकरच लॉकडाऊन हटविण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.कर्मचाऱ्यांच्या अपडाऊनवर प्रतिबंध घालागडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकही कोरोनाग्रस्त नाही. भविष्यात बाहेर जिल्ह्यातून येणाºया नागरिकांमुळे संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काही कर्मचारी दुसºया जिल्ह्यातून ये-जा करतात. या कर्मचाºयांमुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक कर्मचाºयाने मुख्यालयी राहणे सक्तीचे आहे. तरीही काही कर्मचारी ये-जा करतात. अशा कर्मचाºयांवर जिल्हा सीमेवर तैनात असलेल्या पोलिसांनी प्रतिबंध घालावा. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.इंदिरा गांधी चौकात तैनात पोलीस प्रत्येक वाहनधारकाची नोंद करीत आहेत. त्यामध्ये वाहनधारकाचे नाव, वाहन क्रमांक, मोबाईल क्रमांक, कुठून कुठे चालले, याची नोंद घेतली जात आहे. या नोंदीवरून एखादा नागरिक दिवसातून कितीवेळा फिरला हे पोलिसांच्या लक्षात येणार आहे.आतील गल्ल्यांमधून वाहनांची वर्दळकिराणा दुकान, भाजीपाला खरेदीची कारणे सांगून काही नागरिक घराबाहेर पडत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी १ वाजतानंतर सर्वच दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे घराबाहेर पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही काही नागरिक दुचाकी धरून फिरत राहतात. मुख्य मार्ग व इंदिरा गांधी चौकात पोलीस राहतात. त्यामुळे सदर वाहनधारक शहरातील आतमधल्या गल्ल्यांमधून भरधाव वाहने चालवतात. पोलिसांच्या फिरत्या पथकाने शहरातील आतमधल्या गल्ल्यांमधूनही फेरफटका मारण्याची गरज आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारी