शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

वैलोचना नदी पुलावरील लाकडामुळे वाहतुकीचा खोळंबा

By admin | Updated: September 19, 2015 02:01 IST

प्रचंड मेघगर्जनेसह बुधवारच्या रात्रीपासून गुरूवारी सायंकाळपर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवरील कमी उंचीच्या पुलावर पाणी चढले.

बसफेऱ्या रद्द : पुरामुळे वैरागड-मानापूर मार्ग दोन दिवस होता बंदवैरागड : प्रचंड मेघगर्जनेसह बुधवारच्या रात्रीपासून गुरूवारी सायंकाळपर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवरील कमी उंचीच्या पुलावर पाणी चढले. त्यामुळे वैरागड-मानापूर या मार्गावरील वाहतूक बुधवारच्या रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत बंद होती. दुपारच्या सुमारास पूर ओसरल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली असती, मात्र या पुलावर मधोमध मोठे लाकूड असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.वैलोचना नदीला आलेल्या पुराने वाहून आलेले मोठे झाड पुलावर आडवे पडले. त्यामुळे वैरागड-मानापूर मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाच्या सकाळच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराच्या सकाळच्या बसेस वैरागडपर्यंत पोहोचल्या. मात्र पुलावर मोठे झाड असल्याने सदर बसेस येथूनच परत गेल्या. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली. बुधवारी रात्रीपासून संततधार पाऊस झाल्याने वैरागड-मानापूर मार्गावरील पुलावरून तीन फूट पाणी वाहत होते. दरम्यान पुराने वाहून आलेल्या लाकडामुळे वाहतुकीचा बराचवेळा खोळंबा झाला. हलक्याशा पावसानेही वैलोचना नदीला पूर येत असतो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वारंवार प्रभावीत होते. त्यामुळे वैलोचना नदीवर नव्याने मोठ्या उंचीचा पूल बांधावा, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे. मात्र याकडे प्रशासनाचा कायम कानाडोळा होत आहे. परिणामी या अडचणींचा सामना नागरिकांना करावाच लागत आहे. (वार्ताहर)