सागवान शेती : यंदाच्या खरीप हंगामात झालेला अत्यल्प पाऊस व त्यानंतर उत्पादन खर्चापेक्षा कमी उत्पन्न यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. आरमोरी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी भुईमुगाची शेती पेरली आहे. अनेक शेतकरी शेती व्यवसायाला पर्याय म्हणून वन शेतीकडेही वळले आहेत. वैरागड येथील भात गिरणीचे मालक बशीर कुरेशी यांनी मोकळ्या जागेत अशा प्रकारे सागवानाची शेती करून शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.