शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

वैरागड- कुरंडीमाल रस्त्याचे काम होत आहे थातूरमातूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:37 IST

प्रशासन सूस्त : गिट्टीमुळे वाढले अपघाताचे प्रमाण

लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : तालुक्यातील वैरागड, डोंगरतमासी, कुरंडीमाल या रस्त्याचे अर्धवट व निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पसरविलेल्या गिट्टीमुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

तालुक्यातील वैरागड, डोंगरतमासी, कुरंडीमाल हा दोन किलोमीटरचा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने जिल्हा वार्षिक निधीतून मंजूर करण्यात आला. सदर कामाचे कार्यारंभ आदेश कंत्राटदारांना देण्यात आले. मार्च महिन्यात सदर कंत्राटदाराने गिट्टीचे ढिगारे रस्त्याच्या कडेला टाकले. मात्र, गिट्टीचे ढिगारे तसेच ठेवल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासही सहन करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्याने प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. शिवाय रस्त्यावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी सदर कंत्राटदाराने गिट्टीचे काही ढिगारे अर्धा किलोमीटरपर्यंत पसरविले आणि बाकीचा रस्ता जसा तसा ठेवला आहे इतकेच नव्हे तर ठोकळ गिट्टीऐवजी बारीक व कमी जाडीची गिट्टीही रस्त्यावर पसरविण्यात आली. याबाबत काही गावकऱ्यांनी तोंडी स्वरूपात वरिष्ठ स्तरावर तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने शाखा अभियंता ढवळे यांनी सदर रस्त्याच्या कामाची चौकशी केली होती. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याबाबत काहीच कारवाई करण्यात आली नाही. 

कंत्राटदार, अभियंत्यावर कारवाईची मागणी 

  • निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप आहे. कंत्राटदार व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जि. प. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. 
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर रस्ता व विविध विकास कामांच्या पर्यवेक्षणासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र वैरागड भागातील अनेक ठिकाणच्या कामांमध्ये गुणवत्ता दिसून येत नसल्याने संबंधित यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा