शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

गडचिरोली जिल्हा बँकेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार प्रदान; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत सन्मान सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:40 IST

गडचिरोली जिल्हा सहकारी बँक ५५ शाखांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या दुर्गम भागापर्यत ४ लाख ३० हजार ग्राहकांना बँकिंग सेवा देत आहे. विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बँकेने आपली सेवा अधिक लोकाभिमुख केल्याने ग्रामीण नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणे सुलभ झाले आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०१८-१९ या आर्थिक वर्षातील कै.वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने सोमवारी (दि.१०) फेब्रुवारी रोजी सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा झाला.गडचिरोली जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार व मुख्य व्यवस्थापक अरुण निंबेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जिल्हा सहकारी बँकांच्या श्रेणीमधून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार, तर सातारा जिल्हा सहकारी बँकेला द्वितीय आणि सिंधूदुर्ग सहकारी बँकेला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्टÑ राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष मुकूंद कळमकर, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे उपस्थित होते.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देशातील सहकार क्षेत्रात महाराष्ट्रात राज्याचा मोठा वाटा आहे. नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल भागातील नागरिक व शेतकºयांना कर्जपुरवठा करण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणाºया गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला, ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. राज्यातील काही जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. या बँकांनी गडचिरोली जिल्हा बँकेपासून धडा घेण्याची गरज असल्याचे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले. तसेच गडचिरोली जिल्हा बँकेची भक्कम आर्थिक स्थिती व तंत्रज्ञानाच्या वापराची त्यांनी प्रशंसा केली.गडचिरोली जिल्हा सहकारी बँक ५५ शाखांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या दुर्गम भागापर्यत ४ लाख ३० हजार ग्राहकांना बँकिंग सेवा देत आहे. विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बँकेने आपली सेवा अधिक लोकाभिमुख केल्याने ग्रामीण नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणे सुलभ झाले आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAjit Pawarअजित पवार