शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जिल्हाभरात अवकाळी पावसाचा जाेर; रविवारी अनेक तालुक्यांमध्ये हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2022 16:35 IST

मागील दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रविवारी पहाटे जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला.

गडचिराेली : रविवारी जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे कापूस उत्पादक व धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

मागील दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रविवारी पहाटे जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला. दुपारी तीननंतर अनेक भागात पावसाने हजेरी लावली. काही भागात तर दमदार पाऊस झाला. कापूस काढणीची कामे सुरू झाली आहेत. अशातच पावसाने हजेरी लावली. जो कापूस परिपक्व हाेऊन बाेंडावर आहे. तो गळून जमिनीवर पडण्याचा धाेका निर्माण झाला आहे. धानाच्या मळणीची कामे सुरू हाेती. मात्र, पावसामुळे धान मळणी थांबली आहे.

पुन्हा दाेन दिवस ढगाळ वातावरण

जिल्ह्यात पुन्हा दाेन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. यादरम्यान पाऊस काेसळण्याची शक्यता आहे. तसेच विजांचा कडकडाट हाेण्याची शक्यता असल्याने शेतकरी व नागरिकांनी शेतात काम करताना याेग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लाेखाेळी पिकाला बसणार फटका

यावर्षी जिल्ह्यात जवळपास ४९ हजार हेक्टर क्षेत्रावर लाखाेळी पिकाची लागवड करण्यात आली आहे. या पिकाला अजिबात सिंचनाची गरज भासत नाही. त्यामुळे हे पीक धान निघाल्यानंतर पेरले जाते. अवकाळी पावसाचे पाणी बांधित साचल्यास सदर पीक करपून जाते. हा धाेका आता निर्माण झाला आहे.

उत्पादित मालाचे संरक्षण करा : कृषी विभाग

हलक्या ते अति हलक्या स्वरुपाच्या अवकाळी पावसामुळे तसेच तापमानामध्ये अति घट झाल्यामुळे रब्बी हंगामातील धान पिकाच्या राेपांवर परिणाम दिसून येतो. तापमानात घट झाल्यामुळे धान राेपांची वाढ खुंटताना दिसून येते. त्याच्या व्यवस्थापनाकरिता रात्री धान पिकाच्या राेपांवर पॉलिथीन पसरवून ठेवावे जेणेकरून घटलेल्या तापमानाचा परिणाम होणार नाही. तसेच सकाळी पॉलिथीन काढून घ्यावी. त्याचप्रमाणे धान राेपांना रात्रीच्या वेळी पाणी द्यावे व सकाळी पाणी काढून टाकावे, जेणेकरून वाढ योग्य रितीने होईल.

सध्याच्या ढगाळ हवामानाचा परिणाम जिल्ह्यातील कापूस पिकांवरसुध्दा दिसून येण्याची शक्यता असल्यामुळे फुटलेल्या कापसाची वेचणी लवकरात लवकर करावी. कोरड्या ठिकाणी साठवणूक करावी. सध्याच्या ढगाळ हवामानाचा परिणाम कुक्कुटपालनावरही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कुक्कुटपालन व्यवस्थापनाकरिता तापमानातील घट भरून काढण्याच्या दृष्टीने कुक्कुटपालनातील पक्ष्यांना ऊब मिळण्याच्या दृष्टीने हॅलोजन बल्ब किंवा एअर हिटरची व्यवस्था करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली येथील जिल्हास्तरीय हवामान केंद्र यांनी केले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणGadchiroliगडचिरोलीRainपाऊस