शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

जिल्ह्यात अभूतपूर्व ‘कोरोना’बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST

गडचिरोली शहरातील रस्ते सकाळपासूनच निर्मनुष्य झाले होते. बसस्थानकात एकही प्रवाशी नसल्याने संपूर्ण बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. काही महत्त्वाच्या गावांमध्ये शनिवारी रात्री बस मुक्कामी होत्या. त्या बस रिकाम्या आल्या. आकस्मिक स्थितीत काही चालक व वाहकांची ड्युटी रविवारी लावण्यात आली होती. मात्र एकही प्रवाशी बसस्थानकावर न आल्याने सर्वांच्या नेमणुका रद्द करून त्यांना सुटी देण्यात आली.

ठळक मुद्देस्वयंस्फूर्तपणे पाळला बंद : निर्मनुष्य रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट अन् शांततेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वयंस्फूर्तीने कर्फ्यू पाळण्याबाबत पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवत रविवारी सकाळपासून रात्री ९ वाजेपर्यंत घराबाहेर पाऊल ठेवले नाही. त्यामुळे जिल्हाभरात खरोखरच कर्फ्यू लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.गर्दी टाळणे हा कोरोनापासून बचावाचा सर्वात चांगला प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गर्दी टाळण्याविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. प्रशासनामार्फत या कर्फ्यूबाबत जनजागृती केल्याने शहरांसोबतच ग्रामीण भागातही बंद पाळण्यात आला. गडचिरोली शहरातील रस्ते सकाळपासूनच निर्मनुष्य झाले होते. बसस्थानकात एकही प्रवाशी नसल्याने संपूर्ण बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. काही महत्त्वाच्या गावांमध्ये शनिवारी रात्री बस मुक्कामी होत्या. त्या बस रिकाम्या आल्या. आकस्मिक स्थितीत काही चालक व वाहकांची ड्युटी रविवारी लावण्यात आली होती. मात्र एकही प्रवाशी बसस्थानकावर न आल्याने सर्वांच्या नेमणुका रद्द करून त्यांना सुटी देण्यात आली. बसस्थानकावर दोन-चार कर्मचारी दिसून येत होते.गडचिरोली शहरातील पानठेले, चहाटपऱ्यां, औषधीची दुकाने व इतर सर्वच दुकाने बंद होती. नियमित भरणारी गुजरी व दर रविवारी भरणारा आठवडी बाजार सुध्दा भरला नाही. तेलंगणा ते छत्तीसगडमार्गे चालणारे ट्रक फक्त अधूनमधून येत होते. वाहने व प्रवाशी नसल्याने एका टोकावरून नजर टाकल्यास दुसऱ्या टोकापर्यंतचे रस्ते दिसून येत होते.कोरोनाना नियंत्रणासाठी जी यंत्रणा काम करीत आहे त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सायंकाळी अनेकांनी घराच्या पोर्चमध्ये येऊन टाळ्या आणि ताटे वाजविली. मुलांनी याचा विशेष आनंद घेतला.नागरिकांचे आभारदिवसभर घरात थांबून आपण कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. आपणाला मध्यरात्रीपासून अजून एक जबाबदारी पार पाडायची आहे. ती म्हणजे राज्यात १४४ कलम लागू झाले आहे. यासाठीही आपल्या सर्वांकडून सहकार्य अपेक्षित आहे. या सहकार्यासाठी आपले आभार.- दीपक सिंगला, जिल्हाधिकारीअसेच सहकार्य करागडचिरोली जिल्ह्यातील शहरीच नाही तर ग्रामीण भागातील नागरिकांनीही कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील नागरिक जागरूक असल्याचे यावरून लक्षात येते. यापुढेही प्रशासनाला असेच सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे.- डॉ.विजय राठोड, सीईओ, जि.प.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या