शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

विनाअनुदानित शाळा समितीचे धरणे आंदोलन

By admin | Updated: April 10, 2015 01:11 IST

पात्र ठरलेल्या शाळांना त्वरित अनुदान द्यावे, या मागणीसह इतरही मागण्यांसाठी गडचिरोली जिल्हा विना अनुदानित शाळा .....

गडचिरोली : पात्र ठरलेल्या शाळांना त्वरित अनुदान द्यावे, या मागणीसह इतरही मागण्यांसाठी गडचिरोली जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. धरणे आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विनाअनुदानित संस्थांची स्थापना करण्यात आली. संस्थाचालकांनी शालेय इमारती उभारून शैक्षणिक वातावरण तयार करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी जीवाचे रान केले. परंतु मागील १५ वर्षांपासून या शाळांना अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे शासनाचे हजारो कोटी रूपये वाचले आहेत. मात्र येथील कर्मचाऱ्यांची अत्यंत दैनावस्था झाली आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनी विरोधी पक्षात असताना विधानसभा व विधान परिषदेमध्ये त्यांचे प्रश्न मांडून सातत्याने पाठपुरावा करून दिला. आता मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. ही परिस्थिती आणखी काही वर्ष कायम राहिल्यास कर्जबाजारी शेतकऱ्या प्रमाणे शिक्षकही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे विनाअनुदानित शाळांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.दिवसभर धरणे आंदोलन केल्यानंतर आंदोलकाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने निवेदन सादर केले. त्याचबरोबर शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात चर्चाही केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विलास बल्लमवार, उपाध्यक्ष सुनील पोरेड्डीवार, सचिव नारायण धकाते, कोषाध्यक्ष शेखर उईके, संयोजक प्रकाश अर्जुनवार, नरेंद्र बोरकर, रवी ओल्लालवार, समशेर खॉ पठाण, जगदीश मेश्राम, अरूण मुक्कावार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)