शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनीसाठी महामार्गाचे काम दोन वर्षे लांबणीवर

By admin | Updated: September 7, 2016 02:15 IST

साकोली - वडसा - गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर वडसा ते आरमोरीदरम्यान वन विभागाचा राखीव जंगल तोडण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही.

नूतनीकरण कामासाठी निधी मंजूर : साकोली-वडसा-गडचिरोलीविलास चिलबुले आरमोरीसाकोली - वडसा - गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर वडसा ते आरमोरीदरम्यान वन विभागाचा राखीव जंगल तोडण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे पुढील दोन वर्षात या राष्ट्रीय महामार्गाचे काम होण्याची शक्यता नसल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन वर्षांपूर्वी साकोली-वडसा-गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग होणार अशी घोषणा करण्यात आली होती. या महामार्गाच्या कामाला डिसेंबरपासून सुरुवात होणार असल्याचे सुतोवाच करण्यात आले होते. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या रस्ते विकास विभाग गडचिरोली व भंडारा यांच्याकडे याबाबत माहिती घेतली असता, एक ते दीड वर्षात गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होणार नसल्याचे समजते. वडसा-आरमोरीच्या मधोमध वन विभागाचा राखीव जंगल तोडण्याची परवानगी अद्यापही मिळालेली नाही. महामार्गाच्या रस्त्यालगत शेतकरी, जमिनधारकांना, दुकानदारांना जमीन हस्तांतरण करण्याबाबत कोणताही करार झालेला नाही. जर प्रशासनाने महामार्गालगतच्या जमिनीची माहिती मागितली असली तरी या बाबीचे केवळ सर्वेक्षणच सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. अलिकडेच या महामार्गाच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर केला आहे. या महामार्गाचे नूतनीकरण भंडारा व गडचिरोली येथील राष्ट्रीय महामार्ग विभाग करणार आहेत. वडसा, आरमोरी, गडचिरोलीत होणार बायपासराष्ट्रीय महामार्ग म्हणून साकोली-वडसा-गडचिरोलीची घोषणा झाली आहे. या महामार्गावर येणाऱ्या वडसा, आरमोर, गडचिरोली या तिन्ही गावांमध्ये बायपास रस्ता तयार केला जाणार आहे. आरमोरी येथे बायपास मार्ग शहराच्या बाहेरून करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. वडसा येथेही दोन ते तीन प्रकारच्या बायपासबाबतचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार यावर विचार केला जाणार आहे. गडचिरोलीला सुद्धा बायपास काढता येतो काय, याविषयी चाचपणी करण्यात येत आहे. बायपास मार्ग झाला नाही, तर शहरातून होणारा रस्ता हा ११० फुटाचाच ठेवला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग १८० फुटाचा राहतो. मात्र घरांची पडझड होऊ नये यासाठी ही व्यवस्था करावी, असा लोकप्रतिनिधींचाही दबाव आहे. त्यातून हा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. शहरामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा सिमेंट काँक्रिटचा करण्यात येणार असल्याची माहिती असून साधारणत: १५० वर्ष टिकेल, असा दावा बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.