शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात दोन ठार;१० जखमी

By admin | Updated: June 11, 2014 00:01 IST

येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले असून १० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. एका अपघातात अपघातग्रस्त दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत.

आरमोरी : येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले असून १० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. एका अपघातात अपघातग्रस्त दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. नागभिडवरून चंद्रपूरकडे येत असताना एमएच ३४ एए ३०९० क्रमांकाच्या कारचे अरसोडा फाट्याजवळ जीवानी राईसमीलच्या समोर टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या बाजुला जाऊन पलटली. या अपघातात एकजण जागीच ठार तर ५ जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडला. यातील मृतकाचे नाव अंकूश उमाजी धंदरे (१५) रा. वासाळा, असे आहे. जखमींमध्ये निखील होमदेव देशमुख रा. नागभिड, हर्षल विनोद रोहणकर रा. अड्याळ ता. ब्रह्मपुरी, कल्पना उमाजी धंदरे (३८) रा. वासाळा, उमाजी नक्टू धंदरे (४५) रा. वासाळा, अर्पिता उमाजी धंदरे (११) रा. वासाळा, वाहनचालक संदीप मनोहर रोहणकर (४५) रा. नागभिड यांचा समावेश आहे. हे सर्व नागभिड येथे लग्नकार्य आटोपून वासाळाकडे परत जात होते. जखमींना आरमोरी येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. उमाजी नक्टू धंदरे यांना वगळून इतर सर्वांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दुसऱ्या अपघातात आरमोरीपासून ४ किमी अंतरावरील वैनगंगा नदीच्या पुलावर मोटारसायकल व कार यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत एक जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आरमोरीकडे दुचाकीस्वार ब्रह्मपुरीवरून आरमोरीकडे येत होते. तर कार आरमोरीवरून ब्रह्मपुरीकडे जात होती. दोन्ही वाहनांनी वैनगंगा नदीच्या पुलावर एकमेकांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहने जळून खाक झाली. या अपघातात दुचाकीवरील प्रशांत दिनकर गुरनुले (९) हा जागीच ठार झाला तर मानिक काशीराम कोडाप (२९) रा. बालापूर तळोधी, छाया वासुदेव वसाकी (४०) रा. बालापूर तळोधी, नोबेल लोमेश गुरनुले (१३) रा. मिनघरी ता. सिंदेवाही, सागर विलास गुरनुले (११) रा. मिनघरी हे चौघेजण जखमी आहेत. महत्वाचे म्हणजे हे पाचही जण एकाच दुचाकीवर पोर्ला येथे जात होते. जखमींना गडचिरोली येथील रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. सदर अपघात एवढा भिषण होता की, अपघात घडताच कार व दुचाकी या दोन्ही वाहनांनी पेट घेतला. लागलेल्या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली. पुलाच्या अगदी मधोमध घटना घडल्याने एक तास वाहतुक विस्कळीत झाली होती. आग विझविण्यासाठी देसाईगंज येथील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. माजी आमदार हरीराम वरखडे यांनी रूग्णालयात जाऊन विचारपूस केली. अधिक तपास आरमोरीचे ठाणेदार मोरे करीत आहेत. (प्रतिनिधी)