शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
5
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
6
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
7
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
8
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
9
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
10
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
11
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
12
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
13
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
14
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
16
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
17
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
18
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
19
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
20
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली

दोन अपघातात दोन ठार;१० जखमी

By admin | Updated: June 11, 2014 00:01 IST

येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले असून १० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. एका अपघातात अपघातग्रस्त दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत.

आरमोरी : येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले असून १० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. एका अपघातात अपघातग्रस्त दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. नागभिडवरून चंद्रपूरकडे येत असताना एमएच ३४ एए ३०९० क्रमांकाच्या कारचे अरसोडा फाट्याजवळ जीवानी राईसमीलच्या समोर टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या बाजुला जाऊन पलटली. या अपघातात एकजण जागीच ठार तर ५ जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडला. यातील मृतकाचे नाव अंकूश उमाजी धंदरे (१५) रा. वासाळा, असे आहे. जखमींमध्ये निखील होमदेव देशमुख रा. नागभिड, हर्षल विनोद रोहणकर रा. अड्याळ ता. ब्रह्मपुरी, कल्पना उमाजी धंदरे (३८) रा. वासाळा, उमाजी नक्टू धंदरे (४५) रा. वासाळा, अर्पिता उमाजी धंदरे (११) रा. वासाळा, वाहनचालक संदीप मनोहर रोहणकर (४५) रा. नागभिड यांचा समावेश आहे. हे सर्व नागभिड येथे लग्नकार्य आटोपून वासाळाकडे परत जात होते. जखमींना आरमोरी येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. उमाजी नक्टू धंदरे यांना वगळून इतर सर्वांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दुसऱ्या अपघातात आरमोरीपासून ४ किमी अंतरावरील वैनगंगा नदीच्या पुलावर मोटारसायकल व कार यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत एक जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आरमोरीकडे दुचाकीस्वार ब्रह्मपुरीवरून आरमोरीकडे येत होते. तर कार आरमोरीवरून ब्रह्मपुरीकडे जात होती. दोन्ही वाहनांनी वैनगंगा नदीच्या पुलावर एकमेकांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहने जळून खाक झाली. या अपघातात दुचाकीवरील प्रशांत दिनकर गुरनुले (९) हा जागीच ठार झाला तर मानिक काशीराम कोडाप (२९) रा. बालापूर तळोधी, छाया वासुदेव वसाकी (४०) रा. बालापूर तळोधी, नोबेल लोमेश गुरनुले (१३) रा. मिनघरी ता. सिंदेवाही, सागर विलास गुरनुले (११) रा. मिनघरी हे चौघेजण जखमी आहेत. महत्वाचे म्हणजे हे पाचही जण एकाच दुचाकीवर पोर्ला येथे जात होते. जखमींना गडचिरोली येथील रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. सदर अपघात एवढा भिषण होता की, अपघात घडताच कार व दुचाकी या दोन्ही वाहनांनी पेट घेतला. लागलेल्या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली. पुलाच्या अगदी मधोमध घटना घडल्याने एक तास वाहतुक विस्कळीत झाली होती. आग विझविण्यासाठी देसाईगंज येथील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. माजी आमदार हरीराम वरखडे यांनी रूग्णालयात जाऊन विचारपूस केली. अधिक तपास आरमोरीचे ठाणेदार मोरे करीत आहेत. (प्रतिनिधी)