शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, १२ लाखांचे होते बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 15:53 IST

बारा लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ते दोघेही एरिया कमिटी मेंबर पदावर कार्यरत होते.

गडचिरोलीनक्षल्यांच्या टेक्निकल टीममध्ये कार्यरत असलेल्या ६३ वर्षीय नक्षलीसह एका ३४ वर्षीय महिला नक्षलीने बुधवारी गडचिरोलीपोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. हे दोघेही वेगवेगळ्या दलममध्ये एरिया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर प्रत्येकी ६ लाखांचे इनाम राज्य शासनाने ठेवले होते.

रामसिंग उर्फ सीताराम बक्का आत्राम (६३ वर्षे) आणि माधुरी उर्फ भुरी उर्फ सुमन राजू मट्टामी (३४ वर्षे) अशी या दोन आत्मसमर्पितांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे यांनी पांढरा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंढे प्रामुख्याने उपस्थित होते. या दोघांनाही आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून त्यांच्या हुद्यानुसार प्रत्येकी ४.५ लाख रुपये रोख, घरकूल आणि रोजगार-स्वयंरोजगारासाठी पोलिसांकडून मदत केली जाणार आहे.

विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात सहभाग

रामसिंग हा मूळचा अहेरी तालुक्यातील अर्कापल्ली येथील रहिवासी आहे. मार्च २००५ ला तो अहेरी दलममध्ये भरती झाला होता. त्यानंतर पेरमिली दलम आणि २०१२ ते मार्च २०२२ पर्यंत भामरागड एरिया टेक्निकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. नक्षल्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्याचे काम तो करत होता. त्याच्यावर एक खून, एक चकमक व इतर १ असे ३ गुन्हे आहेत.

तर, माधुरी ऊर्फ भुरी ही एटापल्ली तालुक्यातील गट्टेपल्ली येथील मूळची रहिवासी आहे. नोव्हेंबर २००२ ला ती कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली. त्यानंतर भामरागड दलम आणि फेब्रुवारी २०१३ ते एप्रिल २०२२ पर्यंत पेरमिली दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर खुनाचे ४ गुन्हे, चकमकीचे २१, जाळपोळीचे ७ आणि इतर ५ असे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत.

... म्हणून आत्मसमर्पणाकडे वाढला कल

सध्या नक्षल्यांचा टीसीओसी सप्ताहाचा कालावधी सुरू आहे. या कालावधीत हिंसक कारवायांसाठी नक्षली आक्रमक होत असताना दोन नक्षलींनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल दलमसाठी हा झटका आहे. शासनाची आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत झालेला नक्षलींचा खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून अनेक जहाल नक्षली आत्मसमर्पणाच्या वाटेवर आले आहेत. आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाकडून पुनर्वसन घडवून आणल्यामुळे त्यांचा आत्मसमर्पणाकडे कल वाढला असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीgadchiroli-acगडचिरोलीPoliceपोलिस