शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
3
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
4
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
5
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
6
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
7
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
8
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
9
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
10
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
11
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
12
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
13
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
14
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
15
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
16
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
17
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
18
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
19
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
20
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...

आंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 4:19 PM

 चामोर्शी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजजवळील डोहात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि.२३ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

गडचिरोली -  चामोर्शी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजजवळील डोहात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि.२३ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मात्र ही घटना सायंकाळी उघडकीस आल्यानंतर राबविलेल्या शोधमोहिमेत गुरूवारी दुपारी १२ वाजता दोन्ही मृतदेह सापडले. राकेश प्रदीप रॉय (१५) व प्रताप पंकज मंडल (१६), दोघेही रा.जयनगर अशी मृतांची नावे आहेत.जयनगर लगतच्या वैैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या चिचडोह बॅरेजमधील गेटच्या खालील भागात असलेल्या नदीपात्रात पाच किशोरवयीन मित्र बुधवारी दुपारी १२ वाजता आंघोळीसाठी गेले होते. त्यामध्ये रणेन गणेश मंडल, सुब्रत सुशांत वैैष्णव, रजनीरतन साना, राकेश प्रदीप रॉय, प्रताप पंकज मंडल आदींचा समावेश होता. आंघोळीसाठी सर्वांनी आपले कपडे, चप्पल काठावर काढून पाण्यात प्रवेश केला. पाण्याचा अंदाज घेण्याच्या प्रयत्नात दोघेजण अतिशय खोल पाण्यात गेले व बुडायला लागले. तेव्हा जवळच असलेल्या तीन मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र राकेश व प्रताप हे जास्त खोल पाण्यात गेल्याने बुडाले. 

घाबरलेल्या सोबतच्या मित्रांनी या घटनेची वाच्यता केली नाही. मात्र सायंकाळी या घटनेची कुणकुण लागल्यानंतर ६ वाजता सदर माहिती पोलीस ठाणे व तहसीलदारांना देण्यात आली. त्यानंतर चिचडोह बॅरेजचे पाणी बंद करून रात्री ९ वाजता लाईटची व्यवस्था करून रात्रभर शोधकार्य राबविण्यात आले. गुरूवारी नवीन पथक बोलावून पहाटे ५.३० वाजतापासून मार्र्कंडादेव ते घटनास्थळापर्यंत मुलांना शोधण्याचे काम सुरू होते. याकरिता बंगाली व ढिवर समाजातील मासेमारांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बोटने आणि मासे पकडण्याच्या जाळीच्या सहाय्याने शोधकार्य सुरू होते. दुपारी १२ वाजता वैैनगंगा नदीपात्रातील २५ फुट खोल पाणी असलेल्या डोहात दोन्ही मृतदेह सापडले. चामोर्शी येथे पाणबुडी उपलब्ध नसल्याने शोधकार्य लांबले. दरम्यान गुरूवारी सकाळी ९ वाजता आ.डॉ. देवराव होळी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी  तहसीलदार अरूण येरचे, नायब तहसीलदार तनगुलवार, तलाठी डी.एस.शेडमाके, कालिदास मांडवगडे, पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, प्रीतम पुजारी, श्यामराव वडेट्टीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

दुचाकी व कपड्यांवरून घटना उघडकीस पाचपैकी दोन मित्र बुडाल्यानंतर उर्वरित तिघे मित्र अर्धा तास घटनास्थळी थांबले. पण नंतर घटनेची माहिती कोणालाही न सांगता ते परत जयनगर येथे गेले. दुपारी ३ वाजता गावातीलच काही युवक आंघोळीसाठी बॅरेजमध्ये गेले असता त्यांना मृत मुलांनी नेलेली दुचाकी, त्यांचे कपडे व चपला दिसून आल्या. दुचाकी ओळखून त्या युवकांनी गावात जाऊन माहिती दिली. त्यानंतर मृतकाच्या आईने सोबत गेलेल्या एका युवकास ‘माझा मुलगा कुठे आहे?’ असे विचारल्यानंतर झालेला प्रकार उघडकीस आला.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDeathमृत्यूnewsबातम्या