शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 17:24 IST

 चामोर्शी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजजवळील डोहात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि.२३ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

गडचिरोली -  चामोर्शी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजजवळील डोहात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि.२३ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मात्र ही घटना सायंकाळी उघडकीस आल्यानंतर राबविलेल्या शोधमोहिमेत गुरूवारी दुपारी १२ वाजता दोन्ही मृतदेह सापडले. राकेश प्रदीप रॉय (१५) व प्रताप पंकज मंडल (१६), दोघेही रा.जयनगर अशी मृतांची नावे आहेत.जयनगर लगतच्या वैैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या चिचडोह बॅरेजमधील गेटच्या खालील भागात असलेल्या नदीपात्रात पाच किशोरवयीन मित्र बुधवारी दुपारी १२ वाजता आंघोळीसाठी गेले होते. त्यामध्ये रणेन गणेश मंडल, सुब्रत सुशांत वैैष्णव, रजनीरतन साना, राकेश प्रदीप रॉय, प्रताप पंकज मंडल आदींचा समावेश होता. आंघोळीसाठी सर्वांनी आपले कपडे, चप्पल काठावर काढून पाण्यात प्रवेश केला. पाण्याचा अंदाज घेण्याच्या प्रयत्नात दोघेजण अतिशय खोल पाण्यात गेले व बुडायला लागले. तेव्हा जवळच असलेल्या तीन मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र राकेश व प्रताप हे जास्त खोल पाण्यात गेल्याने बुडाले. 

घाबरलेल्या सोबतच्या मित्रांनी या घटनेची वाच्यता केली नाही. मात्र सायंकाळी या घटनेची कुणकुण लागल्यानंतर ६ वाजता सदर माहिती पोलीस ठाणे व तहसीलदारांना देण्यात आली. त्यानंतर चिचडोह बॅरेजचे पाणी बंद करून रात्री ९ वाजता लाईटची व्यवस्था करून रात्रभर शोधकार्य राबविण्यात आले. गुरूवारी नवीन पथक बोलावून पहाटे ५.३० वाजतापासून मार्र्कंडादेव ते घटनास्थळापर्यंत मुलांना शोधण्याचे काम सुरू होते. याकरिता बंगाली व ढिवर समाजातील मासेमारांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बोटने आणि मासे पकडण्याच्या जाळीच्या सहाय्याने शोधकार्य सुरू होते. दुपारी १२ वाजता वैैनगंगा नदीपात्रातील २५ फुट खोल पाणी असलेल्या डोहात दोन्ही मृतदेह सापडले. चामोर्शी येथे पाणबुडी उपलब्ध नसल्याने शोधकार्य लांबले. दरम्यान गुरूवारी सकाळी ९ वाजता आ.डॉ. देवराव होळी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी  तहसीलदार अरूण येरचे, नायब तहसीलदार तनगुलवार, तलाठी डी.एस.शेडमाके, कालिदास मांडवगडे, पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, प्रीतम पुजारी, श्यामराव वडेट्टीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

दुचाकी व कपड्यांवरून घटना उघडकीस पाचपैकी दोन मित्र बुडाल्यानंतर उर्वरित तिघे मित्र अर्धा तास घटनास्थळी थांबले. पण नंतर घटनेची माहिती कोणालाही न सांगता ते परत जयनगर येथे गेले. दुपारी ३ वाजता गावातीलच काही युवक आंघोळीसाठी बॅरेजमध्ये गेले असता त्यांना मृत मुलांनी नेलेली दुचाकी, त्यांचे कपडे व चपला दिसून आल्या. दुचाकी ओळखून त्या युवकांनी गावात जाऊन माहिती दिली. त्यानंतर मृतकाच्या आईने सोबत गेलेल्या एका युवकास ‘माझा मुलगा कुठे आहे?’ असे विचारल्यानंतर झालेला प्रकार उघडकीस आला.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDeathमृत्यूnewsबातम्या