शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
3
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
4
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
7
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
8
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
9
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
11
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
12
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
13
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
14
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
15
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
16
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
17
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
18
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
19
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
20
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!

आंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 17:24 IST

 चामोर्शी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजजवळील डोहात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि.२३ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

गडचिरोली -  चामोर्शी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजजवळील डोहात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि.२३ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मात्र ही घटना सायंकाळी उघडकीस आल्यानंतर राबविलेल्या शोधमोहिमेत गुरूवारी दुपारी १२ वाजता दोन्ही मृतदेह सापडले. राकेश प्रदीप रॉय (१५) व प्रताप पंकज मंडल (१६), दोघेही रा.जयनगर अशी मृतांची नावे आहेत.जयनगर लगतच्या वैैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या चिचडोह बॅरेजमधील गेटच्या खालील भागात असलेल्या नदीपात्रात पाच किशोरवयीन मित्र बुधवारी दुपारी १२ वाजता आंघोळीसाठी गेले होते. त्यामध्ये रणेन गणेश मंडल, सुब्रत सुशांत वैैष्णव, रजनीरतन साना, राकेश प्रदीप रॉय, प्रताप पंकज मंडल आदींचा समावेश होता. आंघोळीसाठी सर्वांनी आपले कपडे, चप्पल काठावर काढून पाण्यात प्रवेश केला. पाण्याचा अंदाज घेण्याच्या प्रयत्नात दोघेजण अतिशय खोल पाण्यात गेले व बुडायला लागले. तेव्हा जवळच असलेल्या तीन मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र राकेश व प्रताप हे जास्त खोल पाण्यात गेल्याने बुडाले. 

घाबरलेल्या सोबतच्या मित्रांनी या घटनेची वाच्यता केली नाही. मात्र सायंकाळी या घटनेची कुणकुण लागल्यानंतर ६ वाजता सदर माहिती पोलीस ठाणे व तहसीलदारांना देण्यात आली. त्यानंतर चिचडोह बॅरेजचे पाणी बंद करून रात्री ९ वाजता लाईटची व्यवस्था करून रात्रभर शोधकार्य राबविण्यात आले. गुरूवारी नवीन पथक बोलावून पहाटे ५.३० वाजतापासून मार्र्कंडादेव ते घटनास्थळापर्यंत मुलांना शोधण्याचे काम सुरू होते. याकरिता बंगाली व ढिवर समाजातील मासेमारांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बोटने आणि मासे पकडण्याच्या जाळीच्या सहाय्याने शोधकार्य सुरू होते. दुपारी १२ वाजता वैैनगंगा नदीपात्रातील २५ फुट खोल पाणी असलेल्या डोहात दोन्ही मृतदेह सापडले. चामोर्शी येथे पाणबुडी उपलब्ध नसल्याने शोधकार्य लांबले. दरम्यान गुरूवारी सकाळी ९ वाजता आ.डॉ. देवराव होळी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी  तहसीलदार अरूण येरचे, नायब तहसीलदार तनगुलवार, तलाठी डी.एस.शेडमाके, कालिदास मांडवगडे, पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, प्रीतम पुजारी, श्यामराव वडेट्टीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

दुचाकी व कपड्यांवरून घटना उघडकीस पाचपैकी दोन मित्र बुडाल्यानंतर उर्वरित तिघे मित्र अर्धा तास घटनास्थळी थांबले. पण नंतर घटनेची माहिती कोणालाही न सांगता ते परत जयनगर येथे गेले. दुपारी ३ वाजता गावातीलच काही युवक आंघोळीसाठी बॅरेजमध्ये गेले असता त्यांना मृत मुलांनी नेलेली दुचाकी, त्यांचे कपडे व चपला दिसून आल्या. दुचाकी ओळखून त्या युवकांनी गावात जाऊन माहिती दिली. त्यानंतर मृतकाच्या आईने सोबत गेलेल्या एका युवकास ‘माझा मुलगा कुठे आहे?’ असे विचारल्यानंतर झालेला प्रकार उघडकीस आला.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDeathमृत्यूnewsबातम्या