शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

बारावीत जिल्ह्याचा निकाल सरासरी 95.32 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 05:00 IST

दोन वर्षाच्या कोरोनाकाळानंतर यावर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन झाली होती. त्यामुळे निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १३ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १२ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ६११ विद्यार्थ्यांना यश मिळाले नाही. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील ‘ टर्निंग पॉईंट ’ असणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. यात गडचिरोली जिल्ह्याचा सरासरी निकाल ९५.३२ टक्के लागला आहे. नागपूर मंडळातील सहा जिल्ह्यांमध्ये हा निकाल सर्वात कमी आहे. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या श्याम सुधीर झंजाळ या विद्यार्थ्याने ९६.६७ टक्के घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. गडचिरोलीच्या शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या समीक्षा योगेंद्र धानोरकर हिने ९२.६७ टक्के गुण घेऊन मुलींमधून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या चिराग जयदेव सोरते याने ९४.६७ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा येण्याचा बहुमान पटकावला, तर याच शाळेचा प्रतीक प्रकाश मंडल हा ९४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात गुणानुक्रमे तिसरा आला आहे.दोन वर्षाच्या कोरोनाकाळानंतर यावर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन झाली होती. त्यामुळे निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १३ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १२ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ६११ विद्यार्थ्यांना यश मिळाले नाही. 

६२ शाळांचा निकाल १०० टक्के-    जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी ६२ शाळांचा निकाल यावर्षी १०० टक्के राहिला. त्यात १० शासकीय आश्रमशाळांचा ही समावेश आहे. यावर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन असली तरी त्यांची शाळाच त्यांचे परीक्षा केंद्र होते. त्याचाही परिणाम निकालावर लागला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी टक्के म्हणजे २२.२२ टक्के निकाल एका शाळेचा लागला आहे.

श्याम म्हणतो, आयएएस व्हायचंयजिल्ह्यात सर्वप्रथम आलेल्या श्याम झंजाळ याला आधी डॉक्टर बनून नंतर आयएएसची तयारी करायची आहे. त्याला कोणतीही ट्युशन नव्हती. शाळेच्या व्यतिरिक्त तो घरी ६ ते ७ तास दररोज अभ्यास करायचा. याशिवाय त्याला खेळाची ही आवड असून तो क्रिकेट आणि स्वीमिंगला ही जातो. गिरोला येथील आश्रमशाळेवर शिक्षक असलेले त्याचे वडील, गृहिणी असलेली आई, आजी-आजोबांचे त्याला सतत प्रोत्साहन मिळत असल्याचे त्याने सांगितले.

निकालात मुली माघारल्याविशेष म्हणजे दरवर्षी गुणवत्तेत आणि एकूण निकालात मुलांच्या तुलनेत मुलीच आघाडीवर असतात. पण यावर्षी मुलांनी बाजी मारली. गुणवत्तेत जिल्ह्यातून आघाडीवर मुलेच आहेत. याशिवाय उत्तीर्ण विद्यार्थ्यात ही मुलांचे प्रमाण जास्त आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी विवेकानंद या एकाच शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात सर्वाधिक गुण घेतले आहेत. काही शाळांनी सीबीएसई बोर्ड लागू केल्याने इतर शाळांना गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळाली. काेराेना संकटामुळे मागील दाेन्ही परीक्षा ऑनलाईन पार पडल्या हाेत्या. दाेन वर्षानंतर यंदा ऑफलाईन परीक्षा झाली. शाळांचा निकाल फुगला आहे. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल