शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

बारावीत जिल्ह्याचा निकाल सरासरी 95.32 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 05:00 IST

दोन वर्षाच्या कोरोनाकाळानंतर यावर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन झाली होती. त्यामुळे निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १३ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १२ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ६११ विद्यार्थ्यांना यश मिळाले नाही. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील ‘ टर्निंग पॉईंट ’ असणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. यात गडचिरोली जिल्ह्याचा सरासरी निकाल ९५.३२ टक्के लागला आहे. नागपूर मंडळातील सहा जिल्ह्यांमध्ये हा निकाल सर्वात कमी आहे. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या श्याम सुधीर झंजाळ या विद्यार्थ्याने ९६.६७ टक्के घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. गडचिरोलीच्या शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या समीक्षा योगेंद्र धानोरकर हिने ९२.६७ टक्के गुण घेऊन मुलींमधून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या चिराग जयदेव सोरते याने ९४.६७ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा येण्याचा बहुमान पटकावला, तर याच शाळेचा प्रतीक प्रकाश मंडल हा ९४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात गुणानुक्रमे तिसरा आला आहे.दोन वर्षाच्या कोरोनाकाळानंतर यावर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन झाली होती. त्यामुळे निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १३ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १२ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ६११ विद्यार्थ्यांना यश मिळाले नाही. 

६२ शाळांचा निकाल १०० टक्के-    जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी ६२ शाळांचा निकाल यावर्षी १०० टक्के राहिला. त्यात १० शासकीय आश्रमशाळांचा ही समावेश आहे. यावर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन असली तरी त्यांची शाळाच त्यांचे परीक्षा केंद्र होते. त्याचाही परिणाम निकालावर लागला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी टक्के म्हणजे २२.२२ टक्के निकाल एका शाळेचा लागला आहे.

श्याम म्हणतो, आयएएस व्हायचंयजिल्ह्यात सर्वप्रथम आलेल्या श्याम झंजाळ याला आधी डॉक्टर बनून नंतर आयएएसची तयारी करायची आहे. त्याला कोणतीही ट्युशन नव्हती. शाळेच्या व्यतिरिक्त तो घरी ६ ते ७ तास दररोज अभ्यास करायचा. याशिवाय त्याला खेळाची ही आवड असून तो क्रिकेट आणि स्वीमिंगला ही जातो. गिरोला येथील आश्रमशाळेवर शिक्षक असलेले त्याचे वडील, गृहिणी असलेली आई, आजी-आजोबांचे त्याला सतत प्रोत्साहन मिळत असल्याचे त्याने सांगितले.

निकालात मुली माघारल्याविशेष म्हणजे दरवर्षी गुणवत्तेत आणि एकूण निकालात मुलांच्या तुलनेत मुलीच आघाडीवर असतात. पण यावर्षी मुलांनी बाजी मारली. गुणवत्तेत जिल्ह्यातून आघाडीवर मुलेच आहेत. याशिवाय उत्तीर्ण विद्यार्थ्यात ही मुलांचे प्रमाण जास्त आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी विवेकानंद या एकाच शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात सर्वाधिक गुण घेतले आहेत. काही शाळांनी सीबीएसई बोर्ड लागू केल्याने इतर शाळांना गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळाली. काेराेना संकटामुळे मागील दाेन्ही परीक्षा ऑनलाईन पार पडल्या हाेत्या. दाेन वर्षानंतर यंदा ऑफलाईन परीक्षा झाली. शाळांचा निकाल फुगला आहे. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल