शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

पीडित महिलेच्या न्यायासाठी एक खिडकी योजना हवी

By admin | Updated: January 6, 2015 23:00 IST

राज्यासह देशात महिलांवरील अत्याचार, लैंगिक शोषणाचे प्रकरण वाढत आहेत. अशा प्रकरणांमध्ये तत्काळ आरोपीस शिक्षा होण्याकरीता फॉस्ट ट्रॅक कोर्टची संख्या वाढायला हवी व न्याय प्रक्रिया

अभिनय खोपडे - गडचिरोलीराज्यासह देशात महिलांवरील अत्याचार, लैंगिक शोषणाचे प्रकरण वाढत आहेत. अशा प्रकरणांमध्ये तत्काळ आरोपीस शिक्षा होण्याकरीता फॉस्ट ट्रॅक कोर्टची संख्या वाढायला हवी व न्याय प्रक्रिया गतिमान होण्याची आवश्यकता आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मांडले. पोलीस विभागाच्यावतीने २ ते ९ जानेवारी या कालावधीत महिला सुरक्षा विषयक सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्यानिमित्ताने गडचिरोलीत त्या आल्या असताना त्यांनी ‘लोकमत’शी चर्चा केली. प्रश्न : अत्याचार पीडितांच्या न्यायासाठी विद्यमान व्यवस्थेत काही बदल व्हावेत काय?डॉ. मिरगे : महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात सद्य:स्थितीत तीन यंत्रणांकडे काम आहे. पहिल्यांदा पोलिसांकडे तक्रार करावी लागते. त्यानंतर वैद्यकीय तपासणीचे काम आरोग्य विभाग करतो व न्याय प्रक्रियेचे काम न्यायालयात चालते. तीन प्रक्रियेत प्रचंड वेळ खर्च होतो. या तिन्ही प्रक्रियांची एक खिडकी तयार व्हायला हवी, तेथे तक्रार केल्यानंतर सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी होणे आवश्यक आहे. असे झाल्यास अशा प्रकरणांमध्ये आरोपीस शिक्षाही लवकर होईल. तसेच फॉस्ट ट्रॅक कोर्टची संख्याही वाढण्याची आवश्यकता आहे. प्रश्न : महिला आयोगामार्फत जनजागृती कार्यक्रमाचा उद्देश काय?डॉ. मिरगे : लहान मुली, महिला यांच्यामध्ये कायदेशीर बाबीची जनजागृती झाल्यास भविष्यात अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आपल्याला काय करता येते, याची जाणीव त्यांना होते. त्यादृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने हे कार्यक्रम घेतले जात आहे. प्रश्न : महाविद्यालयांमध्ये विशाखा समिती गठित करण्याबाबत प्रचंड उदासिनता आहे?डॉ. मिरगे : सर्व महाविद्यालयांमध्ये विशाखा समिती गठित करणे बंधनकारक आहे. ही समिती गठन करून तिचे काम सुरू व्हायला हवे, आलेल्या तक्रारींचा निपटारा व्हायला हवा, या समितीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवायला हवे, दर तिन महिन्यांनी त्यांनी मिटिंग घेऊन आढावा घेतला. तर ही समिती चांगल्या पध्दतीने काम करू शकेल.प्रश्न : गडचिरोली जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी फार कमी प्रमाणात पोलिसांकडे येतात. डॉ. मिरगे : गडचिरोली जिल्ह्यात अशिक्षितपणा मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच दारिद्र्याचे प्रमाणही खूप आहे. आपली रोजी, रोटी बुडवून तक्रार करण्यासाठी पैसा खर्च करणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे गाव पंचायतीसारख्या ठिकाणीच बरेच प्रकरण दाबून टाकली जातात. अशा भागात सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेऊन पोलिसांपर्यंत प्रकरण आणले पाहिजे. अलीकडेच भामरागड तालुक्यातील संगिता मडावीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी चांगली कामगिरी केली. आरोपीला अटक केली.प्रश्न : महिला अत्याचाराबाबत काही तक्रारी खोट्या असल्याचाही आरोप होतो?डॉ. मिरगे : भादंविच्या ४९८, ३५४ सारख्या प्रकरणात काही तुरळक तक्रारी फॉल्स असू शकतात. प्रत्येक कायद्याचा कुठेना कुठे दुरूपयोग होतो. अशाही प्रकरणात ५-१० टक्के तक्रारी खोट्या असतील. परंतु ८० टक्के तक्रारीत न्याय मिळतो. ही समाधानाची बाब आहे, असेही त्यांनी सांगितले. मागील १५ वर्षांपासून आपण प्रशासनाच्या सहकार्यानेच पीडितांना न्याय देऊ शकलो आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.