शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यानंतर वृक्ष लागवड

By admin | Updated: September 8, 2015 03:41 IST

शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला २०१५-१६ या वर्षात ३४ लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट

गडचिरोली : शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला २०१५-१६ या वर्षात ३४ लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अर्धा पावसाळा संपल्यानंतर उद्दिष्ट देण्यात आले आहे. यावर्षी जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण कसे करावे, असा प्रश्न विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांसमोर पडला आहे. जंगलाचे प्रमाण कमी होत चालले असल्याने पर्यावरण असंतुलित होण्याचा धोका मागील काही दिवसांपासून वाढला आहे. वृक्ष लागवड करून ती जगविणे हाच एकमेव पर्याय असल्याचे लक्षात आल्यानंतर आघाडी शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत संपूर्ण राज्यात १०० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जात होते. आघाडी शासनाच्या कालावधीत हे उद्दिष्ट पर्यावरण दिनाच्या पूर्वीच दिले जात होते. मात्र सध्या सत्तेत असलेल्या भाजपा शासनाने सदर योजना सुरू ठेवावी की बंद करावी या पेचात सापडली होती. त्यामुळे पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी यावर कोणताही निर्णय झाला नाही. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मा पाऊस पडला. जलसाठ्यांमध्ये १० ते १५ टक्के पाणी शिल्लक आहे. सदर जलसाठा डिसेंबर महिन्याच्या अंती संपुष्टात येणार आहे. मानवासाठी पाणी मिळणार नाही. त्यातच वृक्षांसाठी पाणी कुठून आणणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. वृक्ष लागवडीचा आढावा दरवर्षी घेतला जातो. त्यामुळे वृक्षांची लागवड न झाल्यास संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. उशीरा उद्दिष्ट प्राप्त झाल्याने प्रशासनसुध्दा पेचात सापडले आहे. (नगर प्रतिनिधी)कोरड्या दुष्काळाने अडचण वाढलीजिल्ह्यात यावर्षी ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. २४ आॅगस्ट रोजी जिल्ह्याला शतकोटी वृक्ष लागवड योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले. जेव्हापासून उद्दिष्ट मिळाले, तेव्हापासून जिल्ह्यात थेंबभरही पाऊस पडला नाही. दिवसभर कडाक्याची ऊन पडत असल्याने रोवलेले धान पीक कसे जगवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. संपूर्ण जिल्हाभरात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत वृक्ष लागवड करणार कोण व ते जगवायचे कसे असा प्रश्न निर्माण होत आहे. केवळ एक लाख रोपट्यांची निर्मिती४रोपट्यांची निर्मिती करण्याचे काम गडचिरोली जिल्ह्यात सोनापूर, वाकडी, कृष्णनगर, रामगड, कसनसूर या पाच ठिकाणच्या शासकीय रोपवाटीकांमध्ये केले जाते. या पाचही रोपवाटीकांनी यावर्षी केवळ १ लाख ३ हजार १०७ वृक्ष निर्माण केल्या आहेत. यातील बहुतांश वृक्ष १५ आॅगस्ट रोजी शाळांनी लावली आहेत. काही वृक्ष नागरिक स्वत: खरेदी करून लावतात. त्यामुळे शासकीय रोपवाटीकांमध्येही रोपटे मिळणे कठीण होणार आहे.आॅक्टोबरमध्ये २१ टक्केच वृक्ष जिवंत४याच योजनेंतर्गत २०१२-१३ मध्ये १२ लाख ५५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. लागवड झालेल्या वृक्षांची आॅक्टोबर २०१४-१५ मध्ये पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान केवळ २ लाख ६५ हजार वृक्ष जिवंत असल्याचे आढळून आले. एका वर्षाच्या कालावधीत सुमारे १० लाख झाडे मरण पावली. त्यानंतरही किती झाडे जगली, हा प्रश्नच आहे.