शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

बदली झालेले कर्मचारी भारमुक्त नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:39 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : राज्य शासनाच्या ९ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने २७ ते ३१ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : राज्य शासनाच्या ९ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने २७ ते ३१ जुलै २०२१ दरम्यान कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया समुपदेशनाने पार पडली. या बदली प्रक्रियेत १५ टक्केच्या नियमानुसार जवळपास २५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी रिलिव्हर न आल्याने त्यांना भारमुक्त करण्यात आले नाही. परिणामी बदली हाेऊनही जवळपास सव्वाशे कर्मचारी जुन्याच आस्थापनेच्या ठिकाणी काम करीत आहे.

जि.प.प्रशासनाने २७ ते ३१ जुलैदरम्यान विविध विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया समुपदेशनाने करण्याची कार्यवाही जि.प.च्या राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृहात पार पाडण्यात आली. २८ जुलैला महिला व बालकल्याण, सिंचन, बांधकाम, पशुसंवर्धन व कृषी आदी पाच विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. २९ जुलैला आराेग्य विभाग, यांत्रिकी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच ३० जुलै राेजी आराेग्य विभागातील आराेग्य सहायक, औषध निर्माण अधिकारी, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ व आराेग्य पर्यवेक्षकांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या. तसेच ३१ जुलै राेजी पंचायत विभाग, शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या बदल्या करण्यात आल्या. याच कालावधीत ग्रामसेवकांच्याही बदल्या करण्यात आल्या.

१५ टक्केच्या नियमानुसार जि.प.अंतर्गत एकूण २५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यापैकी निम्मे कर्मचारी बदलीच्या नवीन ठिकाणी रुजू झाले आहे. ५० टक्के म्हणजे १२५ कर्मचारी अजूनही नवीन ठिकाणी रुजू हाेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याचे कारण संबंधित अधिकाऱ्यांनी रिलिव्हर न आल्याने बदली हाेऊनही कर्मचाऱ्यांना साेडले नाही. परिणामी १०० वर कर्मचारी स्थानांतरण हाेऊनही अजूनही रुजू हाेऊ शकले नाही. गटविकास अधिकाऱ्यांकडून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना भारमुक्त करण्यास दिरंगाई हाेत आहे.

बाॅक्स...

जि.प. सीईओंच्या आदेशाची अवहेलना

n बदली झालेल्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना १० ऑगस्ट २०२१ पर्यंत भारमुक्त करावयाचे हाेते. तसेच ग्रामसेवकांना ३१ ऑगस्टपर्यंत भारमुक्त करायचे हाेते. मात्र बीडीओ रिलिव्हर आला नाही, या कारणावरून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही भारमुक्त केले नाही. परिणामी बदलीच्या नवीन ठिकाणी रुजू हाेण्याकरिता १०० वर कर्मचाऱ्यांना गेल्या १५ दिवसांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी सीईओंच्या आदेशाला खाे मिळत आहे.

n जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या स्वाक्षरीने कर्मचाऱ्यांचे बदली आदेश काढण्यात आले. त्यामध्ये बदली कर्मचाऱ्यांचे नाव, सध्याचे कार्यरत ठिकाण व स्थानांतरण झालेले ठिकाण आदीसह भारमुक्तीच्या दिनांकाचा उल्लेख आहे.

बाॅक्स...

पाच तालुक्याला पसंती नाही

जिल्हा परिषदेच्या विविध विभागासह महसूल तसेच वन व इतर सर्व विभागाचे कर्मचारी सुगम भागात नाेकरी करण्यासाठी पसंती देतात. तर अहेरी, सिराेंचा, एटापल्ली, भामरागड, काेरची या दुर्गम तालुक्यात कर्मचारी सेवा देण्यास फारसे तयार हाेत नाही. बदली झाली तरी प्रतिनियुक्ती घेऊन पुन्हा शहरी व सुगम भागात येतात.