शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

बदली झालेले कर्मचारी भारमुक्त नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:39 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : राज्य शासनाच्या ९ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने २७ ते ३१ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : राज्य शासनाच्या ९ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने २७ ते ३१ जुलै २०२१ दरम्यान कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया समुपदेशनाने पार पडली. या बदली प्रक्रियेत १५ टक्केच्या नियमानुसार जवळपास २५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी रिलिव्हर न आल्याने त्यांना भारमुक्त करण्यात आले नाही. परिणामी बदली हाेऊनही जवळपास सव्वाशे कर्मचारी जुन्याच आस्थापनेच्या ठिकाणी काम करीत आहे.

जि.प.प्रशासनाने २७ ते ३१ जुलैदरम्यान विविध विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया समुपदेशनाने करण्याची कार्यवाही जि.प.च्या राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृहात पार पाडण्यात आली. २८ जुलैला महिला व बालकल्याण, सिंचन, बांधकाम, पशुसंवर्धन व कृषी आदी पाच विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. २९ जुलैला आराेग्य विभाग, यांत्रिकी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच ३० जुलै राेजी आराेग्य विभागातील आराेग्य सहायक, औषध निर्माण अधिकारी, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ व आराेग्य पर्यवेक्षकांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या. तसेच ३१ जुलै राेजी पंचायत विभाग, शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या बदल्या करण्यात आल्या. याच कालावधीत ग्रामसेवकांच्याही बदल्या करण्यात आल्या.

१५ टक्केच्या नियमानुसार जि.प.अंतर्गत एकूण २५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यापैकी निम्मे कर्मचारी बदलीच्या नवीन ठिकाणी रुजू झाले आहे. ५० टक्के म्हणजे १२५ कर्मचारी अजूनही नवीन ठिकाणी रुजू हाेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याचे कारण संबंधित अधिकाऱ्यांनी रिलिव्हर न आल्याने बदली हाेऊनही कर्मचाऱ्यांना साेडले नाही. परिणामी १०० वर कर्मचारी स्थानांतरण हाेऊनही अजूनही रुजू हाेऊ शकले नाही. गटविकास अधिकाऱ्यांकडून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना भारमुक्त करण्यास दिरंगाई हाेत आहे.

बाॅक्स...

जि.प. सीईओंच्या आदेशाची अवहेलना

n बदली झालेल्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना १० ऑगस्ट २०२१ पर्यंत भारमुक्त करावयाचे हाेते. तसेच ग्रामसेवकांना ३१ ऑगस्टपर्यंत भारमुक्त करायचे हाेते. मात्र बीडीओ रिलिव्हर आला नाही, या कारणावरून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही भारमुक्त केले नाही. परिणामी बदलीच्या नवीन ठिकाणी रुजू हाेण्याकरिता १०० वर कर्मचाऱ्यांना गेल्या १५ दिवसांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी सीईओंच्या आदेशाला खाे मिळत आहे.

n जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या स्वाक्षरीने कर्मचाऱ्यांचे बदली आदेश काढण्यात आले. त्यामध्ये बदली कर्मचाऱ्यांचे नाव, सध्याचे कार्यरत ठिकाण व स्थानांतरण झालेले ठिकाण आदीसह भारमुक्तीच्या दिनांकाचा उल्लेख आहे.

बाॅक्स...

पाच तालुक्याला पसंती नाही

जिल्हा परिषदेच्या विविध विभागासह महसूल तसेच वन व इतर सर्व विभागाचे कर्मचारी सुगम भागात नाेकरी करण्यासाठी पसंती देतात. तर अहेरी, सिराेंचा, एटापल्ली, भामरागड, काेरची या दुर्गम तालुक्यात कर्मचारी सेवा देण्यास फारसे तयार हाेत नाही. बदली झाली तरी प्रतिनियुक्ती घेऊन पुन्हा शहरी व सुगम भागात येतात.