शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्या सुसाट पण ज्येष्ठांची सवलत जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वेसेवा बहाल करण्यात आल्या. गतवर्षी डिसेंबरमध्ये रेल्वेगाड्यांचा विशेष दर्जाही काढण्यात येऊन त्या नियमित गाड्या म्हणून धावू लागल्या आहेत. तथापि, आरक्षित तिकिटांवर प्रवास करण्याची अट मात्र अजूनही लागूच आहे. खिडक्यांवरील तिकीट विक्री अद्यापही सुरू झालेली नाही. याशिवाय कोरोनाकाळापूर्वी रेल्वेच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात मिळणारी सवलत अद्याप बंदच आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : कोरोना संसर्गाची तिसरी लाटही ओसरत आहे. रेल्वेची प्रवासी वाहतूक आता पूर्णपणे सुरळीत झाली आहे. कोरोना काळात धावणाऱ्या गाड्यांचा विशेष दर्जा काढून त्या नियमित झाल्या असल्या तरी कोरोनाकाळापूर्वी रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर मिळणारी ३० टक्क्यांची सवलत अजूनही बंद आहे.  त्यामुळे अनेकांच्या खिशाला झळ बसत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वेसेवा बहाल करण्यात आल्या. गतवर्षी डिसेंबरमध्ये रेल्वेगाड्यांचा विशेष दर्जाही काढण्यात येऊन त्या नियमित गाड्या म्हणून धावू लागल्या आहेत. तथापि, आरक्षित तिकिटांवर प्रवास करण्याची अट मात्र अजूनही लागूच आहे. खिडक्यांवरील तिकीट विक्री अद्यापही सुरू झालेली नाही. याशिवाय कोरोनाकाळापूर्वी रेल्वेच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात मिळणारी सवलत अद्याप बंदच आहे. 

किती मिळते सवलत?-    रेल्वेच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना मूळ भाड्याच्या तीस टक्के सवलत देण्यात येते. ही सवलत सर्वच प्रकारच्या श्रेणींमध्ये लागू आहे.-    एखाद्या गाडीत प्रवास करण्यासाठी प्रवाशाला १०० रुपये तिकीट असेल तर ज्येष्ठ नागरिकांना केवळ ७० रुपये तिकीट मोजावे लागते.

विशेष रेल्वेचा दर्जा काढला, तरी सवलत बंदच

कोरोना काळात ठप्प असलेल्या रेल्वेगाड्या पुन्हा सुरू केल्यानंतर त्या गाड्या काही महिने विशेष दर्जा म्हणून चालविण्यात आल्या. या गाड्यांच्या क्रमांकापूर्वी शून्य लावण्यात आला होता. आता क्रमांकापूर्वीचा शून्य काढून या गाड्या नियमित म्हणून सुरू करण्यात आल्या आहेत. तथापि, रेल्वेत पूर्वी मिळणाऱ्या बहुतांश सवलती बंद आहेत. याकडे रेल्वेने लक्ष देण्याची गरज आहे. 

ज्येष्ठांना फटका 

काेराेना लाटेचा फटका ज्येष्ठ नागरिकांनाही बसला. काेराेना कालावधीत शासनाने सामान्य नागरिकांसाठी अनेक याेजना सुरू केल्या. मात्र, ज्येष्ठांसाठी रेल्वेत असलेली ३० टक्के तिकीट सवलत बंद केली. हा ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय आहे. आता काेराेनाची लाट ओसरत चालली तरी तिकीट सवलत बंदच आहे. - मधुकर मानकर, ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिकांचे देशाच्या विकासात फार माेठे याेगदान आहे. त्यामुळे त्यांना सुविधा देणे आवश्यक आहे. मात्र, शासन याकडे लक्ष देत नाही. ३० टक्के प्रवास सवलत लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे. - तुकाराम शेंडे, ज्येष्ठ नागरिक

 

टॅग्स :railwayरेल्वे