शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र घाटातून रेती तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:12 IST

राखीव वनक्षेत्रात पर्यावरणाला हानी पोहोचू नये, यासाठी शासनाने रेती व गौण खनिज खननावर बंदी घातली आहे. यासाठी मागील पाच वर्षांपासून तालुक्यातील बांडे नदीच्या आलदंडी घाटाचा लिलाव महसूल विभागाकडून केला जात नाही.

ठळक मुद्देशासनाचा महसूल बुडतोय : राखीव वनक्षेत्र असल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : राखीव वनक्षेत्रात पर्यावरणाला हानी पोहोचू नये, यासाठी शासनाने रेती व गौण खनिज खननावर बंदी घातली आहे. यासाठी मागील पाच वर्षांपासून तालुक्यातील बांडे नदीच्या आलदंडी घाटाचा लिलाव महसूल विभागाकडून केला जात नाही. परंतु या घाटावरून खुलेआम अवैधरित्या रेती तस्करी होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. शिवाय पर्यावरणालाही हानी पोहोचत आहे.एटापल्ली तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या गट्टा आलदंडी नदी घाटावरून रेतीची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. परंतु या प्रकाराकडे वन व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बांडे नदी राखीव वनक्षेत्रात येत असल्याने या नदीवरील आलदंडी रेतीघाटाचा लिलाव करण्यास मागील पाच वर्षांपासून महसूल विभागाने प्रतिबंध घातले. परंतु प्रतिबंध घालूनही काहीच उपयोग दिसून येत नाही. या घाटावरून अवैधरित्या रेती तस्करी दिवसागणिक वाढत आहे. यंदा रेतीघाटांच्या लिलावासाठी महसूल विभागामार्फत जाहिरात देण्यात आली. परंतु अद्यापही प्रक्रिया पार पडली नाही.तालुक्यात आलदंडी घाट महत्त्वपूर्ण घाट आहे. या घाटावरून दररोज अनेक वाहने रेती भरून नेली जातात. तालुक्यात अनेक ठिकाणी खासगी व कंत्राटदारांची बांधकामे सुरू आहेत. या कामांवर येथील रेतीचा वापर सुरू आहे. परंतु या प्रकाराकडे वन व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अवैध रेती तस्करी करणाऱ्या लोकांचे फावले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.शासन उद्देशाला हरताळबांडे नदी राखीव वनक्षेत्रात येत असल्याने या नदीच्या आलदंडी घाटावर वनविभागाकडून सीमारेषा आखण्यात आली. राखीव वनक्षेत्रातील रेती व गौण उपजांची तस्करी होऊ नये व पर्यावरणाला हानी पोहोचू नये, हा उद्देश या मागील आहे. उद्देश चांगला असला तरी या उद्देशाला रेती तस्करांकडून हरताळ फासल्या जात आहे. अवैध रेती तस्करी रोखण्यात महसूल व वन विभागाला अपयश येत असेल तर येथील आलदंडी घाटाचा लिलाव करून दरवर्षी बुडणारा महसूल वाचवावा, अशी प्रतिक्रिया जनसामान्यात उमटत आहे.

टॅग्स :sandवाळू