शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
2
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
3
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
4
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
5
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
6
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
7
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
8
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
9
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
10
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
11
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
12
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
13
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
14
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
15
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
16
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
17
Laxmi Pujan 2025: स्थिर लक्ष्मी हवी? लक्ष्मीपूजन करताना झाडू आणि खडे मीठाने करा 'हा' खास उपाय!
18
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
19
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
20
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम

गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला विशेष अधिकार द्यावे; सरपंच संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 14:55 IST

Gadchiroli : सीईओंमार्फत शासनाला पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील विविध समस्या तसेच गावाच्या विकासासंदर्भात विविध मागण्या तसेच सरपंच व उपसरपंच यांच्या समस्या लवकर मार्गी लावाव्यात. सदर मागण्या लवकर निकाली न काढल्यास १६ ऑगस्टपासून ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय सरपंच परिषदेने दिला.

सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सरपंचांनी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांना बुधवारी निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.

निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने रद्द केलेले १५ लाख रुपयांपर्यंतचे काम ग्रामपंचायतींनी न करण्याचे अधिकार शासन निर्णय काढून पूर्ववत करावे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने सुप्रीम कोर्टात प्रगती आणावी. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात यावी, आमदार, खासदारांप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक विकास निधी उभा करून सरपंचांना १० लाख रुपयांपर्यंतची कामे करण्याचे अधिकार प्रदान करावे. ग्रामपंचायत स्तरावरीत सर्व समित्यांचे अध्यक्षपद सरपंच यांना बहाल करावे. स्थानिक स्वराज्य संस्था या क्षेत्रातून सरपंच प्रतिनिधींसाठी दोन जागा राखीव कराव्यात.

निवेदन देताना अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर, सरपंच विलास उसेंडी, सरपंच विलास बावणे, तसेच राजेश लिंगायत, सतीश गुरनुले, प्रियंका कुमरे, रत्नमाला सेलोटे, शिल्पा कोल्हे, अनिता पदा, अविनाश कन्नाके, तुषार मडावी, विनोद मल्लेवार उपस्थित होते.

ग्रा. पं. परिक्षेत्रातील कामांचे अधिकार द्यावेरेतीघाट असलेल्या ग्रामपंचायतींना घाट लिलाव करण्याचे अधिकार बहाल करावे. गौणखनिज व मुद्रांक शुल्क नियमित ग्रामपंचायतींना वितरित करण्यात यावे, नागरी सुविधा, जनसुविधा, ठक्कर बाप्पा योजना व दलितवस्ती सुधार योजनेची कामे ग्रामपंचायतींनी सादर केलेल्या कृती आराखड्यानुसार ग्रामपंचायतीला देण्यात यावे, ग्रामपंचायतीच्या परिक्षेत्रात केल्या जाणाऱ्या विकासकामाला ग्रामपंचायतीला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार प्रदान करावे. सरपंच, उपसरपंच यांना शासकीय कामाकरिता बस प्रवास मोफत द्यावा.

जिल्हास्तरावर सरपंच भवन निर्माण करावेवर्षातून दोन वेळा रेल्वे प्रवास, मंत्रालयात जाण्याकरिता मोफत करावा. जिल्हास्तरावर सरपंच भवन निर्माण करावे, मोदी आवास योजनेचे देयके त्वरित देण्यात यावे. या व इतर अनेक मागण्यांचा समावेश असलेले निवेदन सरपंच परिषदेच्या वतीने देण्यात आले. सदर मागण्यांचा विचार न केल्यास १६ ऑगस्टपासून सर्व सरपंच ग्रामपंचायतीला टाळे लावून बेमुदत बंद पाळला जाईल, असा इशारा देण्यात आला. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीgram panchayatग्राम पंचायत