शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जिल्ह्यात वाघ, हत्तींचा धुमाकूळ; पालकमंत्री, वनमंत्री कुठे आहेत? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 12:46 IST

वनसंरक्षकांविरुद्ध ३०२ चा गुन्हा नोंदवा, काँग्रेसची तक्रार

गडचिरोली : जिल्ह्यात हत्तीची व नरभक्षक वाघांच्या हल्ल्यात बळींचे सत्र सुरू असल्याने काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. निष्पाप लोकांचे बळी जात आहेत; पण गडचिरोलीबद्दल कळवळा दाखविणारे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार कुठे आहेत, असा सवाल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. वनसंरक्षक व उपवनसंक्षकांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली असून, याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात २६ नोव्हेंबरला तक्रार दिली आहे.

गडचिरोली तालुक्यातील हिरापूर व भगवानपूर येथे दोन शेतकऱ्यांना वाघाने ठार केल्याची घटना दि. २४ नोव्हेंबरला उघडकीस आली. त्यानंतर २५ नोव्हेंबरला मरेगावात धान पिकाचे संरक्षण करण्यास गेलेल्या मनोज प्रभाकर येरमे (३८) या शेतकऱ्याला रानटी हत्तीने पायाखाली चिरडून ठार केले. या घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले. २६ नोव्हेंबरला ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. यात मरेगावच्या घटनेला वनसंरक्षक व उपवनसंरक्षक जबाबदार असल्याचा दावा केला असून, याबाबत खुनाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखान पठाण, नेताजी गावतुरे, माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, अब्दुल पंजवाणी, वामनराव सावसाकडे, भारत येरमे, दिवाकर निसार, दत्तात्रय खरवडे, संजय चन्ने, तालुकाध्यक्ष वसंत राऊत उपस्थित होते.

सध्या धान कापणी, मळणीची कामे वेगाने सुरू आहेत. अशावेळी वाघ व हत्तींनी उपद्रव सुरू केला आहे. रोज एक बळी जात आहे, अशा परिस्थितीत शासन व प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे, हे दुर्दैवी आहे. अद्ययावत ड्रोन कॅमेरे नाहीत, प्रशिक्षित वनकर्मचारी नाहीत, त्यामुळे आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार आहात. यातून सरकारची असंवेदनशीलता समोर येत आहे.

- डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार व प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस

आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार?

जिल्ह्यात वाघ व हत्तींनी जगणे मुश्कील केले आहे. घराबाहेर पडताना मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वन विभागाने कुठलाही पुढाकार घेतला नाही. अद्ययावत ड्रोन कॅमेरे नाहीत, प्रशिक्षित वनकर्मचारी नाहीत, त्यामुळे आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार आहात, असा जळजळीत सवाल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसGadchiroliगडचिरोली