शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

जिल्ह्यात वाघ, हत्तींचा धुमाकूळ; पालकमंत्री, वनमंत्री कुठे आहेत? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 12:46 IST

वनसंरक्षकांविरुद्ध ३०२ चा गुन्हा नोंदवा, काँग्रेसची तक्रार

गडचिरोली : जिल्ह्यात हत्तीची व नरभक्षक वाघांच्या हल्ल्यात बळींचे सत्र सुरू असल्याने काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. निष्पाप लोकांचे बळी जात आहेत; पण गडचिरोलीबद्दल कळवळा दाखविणारे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार कुठे आहेत, असा सवाल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. वनसंरक्षक व उपवनसंक्षकांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली असून, याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात २६ नोव्हेंबरला तक्रार दिली आहे.

गडचिरोली तालुक्यातील हिरापूर व भगवानपूर येथे दोन शेतकऱ्यांना वाघाने ठार केल्याची घटना दि. २४ नोव्हेंबरला उघडकीस आली. त्यानंतर २५ नोव्हेंबरला मरेगावात धान पिकाचे संरक्षण करण्यास गेलेल्या मनोज प्रभाकर येरमे (३८) या शेतकऱ्याला रानटी हत्तीने पायाखाली चिरडून ठार केले. या घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले. २६ नोव्हेंबरला ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. यात मरेगावच्या घटनेला वनसंरक्षक व उपवनसंरक्षक जबाबदार असल्याचा दावा केला असून, याबाबत खुनाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखान पठाण, नेताजी गावतुरे, माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, अब्दुल पंजवाणी, वामनराव सावसाकडे, भारत येरमे, दिवाकर निसार, दत्तात्रय खरवडे, संजय चन्ने, तालुकाध्यक्ष वसंत राऊत उपस्थित होते.

सध्या धान कापणी, मळणीची कामे वेगाने सुरू आहेत. अशावेळी वाघ व हत्तींनी उपद्रव सुरू केला आहे. रोज एक बळी जात आहे, अशा परिस्थितीत शासन व प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे, हे दुर्दैवी आहे. अद्ययावत ड्रोन कॅमेरे नाहीत, प्रशिक्षित वनकर्मचारी नाहीत, त्यामुळे आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार आहात. यातून सरकारची असंवेदनशीलता समोर येत आहे.

- डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार व प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस

आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार?

जिल्ह्यात वाघ व हत्तींनी जगणे मुश्कील केले आहे. घराबाहेर पडताना मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वन विभागाने कुठलाही पुढाकार घेतला नाही. अद्ययावत ड्रोन कॅमेरे नाहीत, प्रशिक्षित वनकर्मचारी नाहीत, त्यामुळे आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार आहात, असा जळजळीत सवाल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसGadchiroliगडचिरोली