शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

विकास दौडमध्ये जिल्ह्यात धावले हजारो आदिवासी युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:22 IST

जिल्हा पोलीस दलातर्फे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्रस्तरावर ‘आदिवासी विकास दौड’ आयोजित करण्यात आली होती. यात विजेत्या ठरलेल्या ४०० स्पर्धकांची अंतिम स्पर्धा गडचिरोली येथे पार पडली.

ठळक मुद्देविजेत्यांना बक्षीस : गडचिरोलीतील अंतिम स्पर्धेत ४०० युवकांचा सहभाग, पोलीस विभागातर्फे ठिकठिकाणी आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस दलातर्फे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्रस्तरावर ‘आदिवासी विकास दौड’ आयोजित करण्यात आली होती. यात विजेत्या ठरलेल्या ४०० स्पर्धकांची अंतिम स्पर्धा गडचिरोली येथे पार पडली. विजेत्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले.पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्रस्तरावर मागील महिनाभरापासून विकास दौड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये प्रथम आलेल्यांना गडचिरोली येथील अंतिम दौडमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती. अंतिम दौड स्पर्धा इंदिरा गांधी चौकापासून सुरूवात झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते दौड स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरविण्यात आले.मुलांमधून आकाश देवाजी शेंडे प्रथम, रितीत अजय पंचबुध्दे द्वितीय, राकेश नारायण लोहंबळे तृतीय, नागेश रमनय्या पसावे, वसंत शंकर गुरणे, अजय देवू लेकामी या तिघांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. मुलींमधून शुभांगी किरंगे प्रथम, काजल शंकर भर्रे द्वितीय, वनिता हिचामी तृतीय, निर्मला गावडे, निरूता लालसू पोटावी, सुशी शंकर हलामी यांना प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले. इतर स्पर्धकांमध्ये महेंद्र मुरारी कचलाम प्रथम, नारसिंग रमेश पावरा द्वितीय, निखील संजय वैरागडे तृतीय, संदीप विनोद उईके, कुलदीप ललित जांभुळे, तृप्ती कुमरे, विना गावडे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. सीआरपीएफ जवानांमधून सत्येंद्र कुमार यादव, एम. कोरीयास्वामी, एस. भुपती यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. इतर स्पर्धकांमधून रूपा गोटा, शैला मंगरू कुसराम, चंद्रकांत धुर्वे, तुषार शंकर गावतुरे यांना विशेष प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.‘नक्षलवाद्यांच्या नादी लागून बहुमोल जीवन बर्बाद करू नका’तरूणांनो कष्ट करा अन् स्वत:चे पोट भरा. नक्षलवाद्यांच्या नादी लागून आपले बहुमोल जीवन बर्बाद करू नका, असे भावनिक आवाहन २० जुलै २०१९ च्या पोलीस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या रूपी नरोटे हिचे वडील महारू नरोटे यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, रूपीला बालवयातच नक्षलवादी बळजबरीने घेऊन गेले. तिचे नाव सुशीला ठेवले. नक्षलवाद्यांसोबत गेल्यापासून ती फक्त दोनवेळा घरी आली. तिला आमच्यासोबत राहण्याचा सल्ला दिला. मात्र तिने माझे ऐकले नाही. दुसऱ्यांदा आली तेव्हा तिला आत्मसमर्पण योजनेविषयी माहिती दिली. मात्र तेव्हा सुध्दा ऐकली नाही. नक्षलवाद्यांमुळे आपली मुलगी मारली गेली. आमच्या म्हातारपणाचा आधार हिरावल्या गेला. नक्षलवादी लहान मुलांना बळजबरीने पालकांच्या सहमतीशिवाय नक्षल दलममध्ये सहभागी करतात. बालवयातच मुलांची आई-वडिलांसोबत असलेली नाळ तोडतात. निरागस बालपण व शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतात. त्यामुळे ही मुले अशिक्षित राहिल्याने बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतात. युवकांनी नक्षलवाद्यांसोबत जाऊन स्वत:चे जीवन बर्बाद करू नये, त्याऐवजी स्वत:चा व्यवसाय करावा किंवा नोकरी करून जीवन सुकर करावे, असे आवाहन सुशीलाचे वडिल महारू नरोटे यांनी केले. दलममध्ये गेलेल्या आदिवासी तरूणांनी नवजीवन योजनेचा लाभ घेऊन विकासाच्या मूळ प्रवाहात येण्यासाठी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे, असे आवाहन सुध्दा केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी