शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना समितीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 16:05 IST

कायमसाठी लढा : कस्तुरबा गांधी विद्यालयातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार न्याय ?

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून सेवेत नियमित करण्याच्या प्रतीक्षेत होते. याबाबत विविध कंत्राटी कर्मचारी संघटनांकडून पाठपुरावा सुरू होता. २२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश दिले. मात्र, अजूनपर्यंत समिती स्थापन झाली नाही. अधिकाऱ्यांनी समिती गठीत करून तत्काळ अहवाल तयार करण्यावर काम सुरू करावे, अशी मागणी मावळा संघटनेने केली आहे.

सदर समिती सदरच्या विविध पदांवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीतील एकूण वेतनावर तसेच सेवेत कायम केल्यानंतर विविध स्वरुपात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या वेतनासंबंधी, निर्वाहभत्ता व इतर रकमेच्या अनुषंगाने आवश्यक तरतुदींचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणार आहे.

दरम्यान, राज्यात २००८ पासून निर्मित ४२ कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालयातील चारशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलने व निवेदनाच्या माध्यमातून राज्य सरकारला मागण्या केल्या. मुलींच्या शाळांमधील ८० टक्के कर्मचारी महिला असल्याने राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिला कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून त्यांना पगारवाढ देण्याची मागणी केली आहे.

सर्व कर्मचाऱ्यांचे पगार इतर ठिकाणी समकक्ष पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांएवढे करणे, अर्ध्यापेक्षा जास्त रिक्त असलेल्या जागा तत्काळ भरण्यात याव्यात. आदी मागण्या केल्या आहेत. मुलींचे शिक्षण पूर्ण करण्याकरिता २००६ साली नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये सुरू केली आहेत. राज्यात गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा व इतर ५ तालुक्यांसह पालघर, नंदुरबार, बीड, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, नाशिक या जिल्ह्यातील दुर्गम भागात अशा ४३ शाळा आहेत, या शाळातील मुख्याध्यापकांना पंचवीस हजार, तर इतर कर्मचारी यांना त्यापेक्षा कमी पगार मानधन तत्त्वावर मिळतो. मात्र, ना महागाई भत्ता मिळत, ना वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनवाढ मिळत,अशी परिस्थिती आहे. 

"कस्तुरबा गांधी मुलींच्या निवासी शाळांतील २००८ पासूनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित केल्यास राज्य शासनावर ४ ते ५ कोटी, तर केंद्र शासनावर फक्त ६ ते ७ कोटींचा भार वाढणार आहे. जे अधिकारी मुद्दामहून दिरंगाई करतील, त्यांच्याविरोधात मावळा संघटना विविध प्रकारे मैदानात उतरेल."- राहुलदेव मनवर, मावळा संघटना, उपाध्यक्ष 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली