शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

एक हजार घरकुलांच्या कामांना प्रारंभच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:06 IST

सर्वसामान्य व गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी हजारावर घरकूल मंजूर केले जातात.

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना : लाभार्थी व यंत्रणेची उदासीनता

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : सर्वसामान्य व गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी हजारावर घरकूल मंजूर केले जातात. मात्र अनुदान मिळूनही लाभार्थी घरकुलाचे काम करण्यास दिरंगाई करीत आहेत. तसेच यंत्रणेचीही उदासीनता यात दिसून येत असल्याने घरकुलाचे काम चालू वर्षात मंदावले आहे. सन २०१७-१८ या वर्षातील तब्बल १ हजार ३६ घरकुलाच्या कामांना प्रारंभच झाला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण ३ हजार १९६ घरकूल मंजूर करण्यात आले. यामध्ये अहेरी तालुक्यात ५३५, आरमोरी तालुक्यात २३२, भामरागड ५४, चामोर्शी २९९, देसाईगंज १८२, धानोरा १८२, एटापल्ली १२०, गडचिरोली १७८, कोरची १५०, कुरखेडा ४१४, मुलचेरा १८७ व सिरोंचा तालुक्यात ६६३ घरकुलांचा समावेश आहे. मंजूर झालेल्या एकूण घरकुलांपैकी २ हजार १६० घरकूल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली. यामध्ये अहेरी तालुक्यातील २२४ लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले.आरमोरी तालुक्यातील १५१, भामरागड ३०, चामोर्शी २३१, देसाईगंज १४४, धानोरा १११, एटापल्ली ६०, गडचिरोली १५४, कोरची १२३, कुरखेडा ३९५, मुलचेरा १५१ व सिरोंचा तालुक्यातील ३८६ लाभार्थ्यांचा समावेश आहे. अद्यापही २९५ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करणे बाकी आहे.सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील एकही घरकूल अद्यापही पूर्ण झाले नाही. महागडे बांधकाम साहित्य व आर्थिक परिस्थिती हलाखीची व इतर कारणामुळे लाभार्थी घरकुलाचे काम गतीने करताना दिसून येत नाही. संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभार्थ्यांकडे पोहोचून त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र या योजनेच्या कामाला गडचिरोली जिल्ह्यात अपेक्षित गती अद्यापही मिळाल्याचे दिसून येत नाही.लाभार्थ्यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळवजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने सदर योजनेंतर्गत मंजूर झालेल्या ७५ टक्के लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात अदा करण्यात आली आहे. उर्वरित २५ टक्के लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करावयाची आहे. ही रक्कम मिळावी यासाठी संबंधित लाभार्थी आवश्यक ते कागदपत्र जुळविण्याच्या कामात लागले आहे. काही लाभार्थी बँकांमध्ये खाते उघडत आहेत. बहुतांश लाभार्थ्यांना आवश्यक असलेले कागदपत्र संबंधित विभागाकडून लवकर मिळत नसल्याने अनुदान वाटपाच्या प्रक्रियेत विलंब होत आहे. घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रयत्न करीत आहे.