शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

यावर्षी जिल्ह्यातील रेशीम टसर शेती अस्मानी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 16:01 IST

हवामान बदलाचा परिणाम : चार महिन्यांचा हिरावणार रोजगार

प्रदीप बोडणे लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड :गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांच्या ज्या भागात येन, अंजनची झाडे आहेत. त्या जंगलात या भागातील ढीवर समाज बांधव परंपरागतरित्या मोठ्या प्रमाणात रेशीम शेती करतात. आता शासनाच्या सुविधेमुळे शेती फायद्याची ठरू लागली असल्याने रेशीम शेतीचे क्षेत्र वाढले आहे. पण, या वर्षात सततच्या ढगाळ वातावरणामुळे रेशीम शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, यंदा टसर शेती अस्मानी संकटात सापडली आहे.

पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील ढीवर समाज बांधव मोठ्या प्रमाणात रेशीम शेती करतात. आरमोरी तालुक्यातील थोटेबोडी, मॅडबोडी, नागरवाई, कुरखेडा तालुक्यांतील कढोली, जांभळी, गांगुली परिसराच्या गावातील ढीवर समाज परंपरागत शेतीचा व्यवसाय करतात. रेशीम शेतीसाठी लागणारे अंडीपुंज पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या आरमोरी येथील रेशीम केंद्रातून आणतात.

रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अंडीपुंज सवलतीच्या दरात विकत मिळतात. ही अंडीपुंज जंगलातील येन किंवा अंजनाच्या झाडावर ठेवून त्यापासून होणारे अंडी कोश तयार करते. या वर्षात अंडीपुंज झाडावर उत्पन्नासाठी टाकल्यापासून वातावरणातील अति उष्णपणा, कधी थंडी या वातावरणातील बदलामुळे अंडीपुंज्यातून अंडी तयार झाल्यानंतर कोश निर्माण करण्यापूर्वी अनेकदा मरून पडल्या आहेत.  या वर्षात कमी कोश निर्माण झाले आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून, यंदाची टसर रेशीम शेती तोट्याची होत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

"या वर्षातील अती पाऊस आणि त्यामुळे टसर शेती उशिरा झाली. त्यानंतर मात्र ऑक्टोबर हिंटने चांगलेच हैराण केले. वातावरणात अतिउष्णपणामुळे, अंडी पुंजाच्या अळ्यांची वाढ झाली नाही. कोश तयार झाले नाही." - तुळशीराम सोनबावणे, शेतकरी, कढोली.

"रेशीम शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला, तरी त्याच्यावर उपाययोजना झाल्यास शेती फायद्याची ठरते. पण, रेशीम टसर महामंडळाकडून आवश्यक द्रावणाचा पुरवठा न झाल्याने अनेक अळ्या मरण पावल्या."- जितेंद्र भोयर, शेतकरी, कढोली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली