शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

तीनही मतदार संघात काट्याच्या लढती

By admin | Updated: October 11, 2014 23:07 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन विधानसभा मतदान संघात काट्याच्या लढती होण्याची चिन्ह आहे. बऱ्याच वर्षानंतर चार ते पाच पक्ष प्रथमच मैदानात उतरल्याने

चर्चांना जोर : पक्षांतरामुळे वातावरण तापलेगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन विधानसभा मतदान संघात काट्याच्या लढती होण्याची चिन्ह आहे. बऱ्याच वर्षानंतर चार ते पाच पक्ष प्रथमच मैदानात उतरल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. ६७ आरमोरी विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व काँग्रेस असा तिरंगी सामना आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी शुक्रवारी समर्थकांसह काँग्रेस पक्ष सोडल्याने आता या मतदार संघात भारतीय जनता पक्षाचा प्रचार जोर धरू लागला आहे. पोरेड्डीवार समर्थकांकडून या प्रचारात विशेष लक्ष घातले जात आहे. शिवसेनेचे परंपरागत मतदार असल्यामुळे त्यांचाही उमेदवार प्रचारात आघाडी घेऊन आहे. काँग्रेस पक्षाचे परंपरागत मतदार व मागास वर्गीय समाज व तसेच मुस्लिम समाजाच्या भरवशावर काँग्रेस लढतीत रंग भरण्याचे काम करीत आहे. ६८ गडचिरोली विधानसभा मतदार संघात बहुरंगी लढत होईल, असे चित्र आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये सामना आहे. भारिप बहुजन महासंघ, बसपा, मनसे आदी उमेदवारही जोरदार प्रचाराला लागले आहे. येथे अनेक गैर आदिवासी मतदारांनी बहिष्काराचा इशारा दिला आहे. मात्र या मतदारांना समजाविण्याचे राजकीय पक्षांकडून सुरू आहे. चामोर्शी तालुक्यात काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाच्या प्रचारात रंग भरत असल्याची चर्चा आहे. शहरी भागात मात्र साऱ्याच पक्षांचा प्रचार दमदारपणे सुरू आहे. शहराच्या स्लम भागात काही राजकीय पक्षांकडून नगदी पैसांचेही वाटप घरोघरी करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र मतदार राजा योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी शहरी भागात तरी सज्ज आहे. ६९ अहेरी विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत आहे. मात्र या लढतीत निकाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या मताधिक्यावर अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, भाजपकडून अम्ब्रीशराव आत्राम, अपक्ष म्हणून माजी आ. दीपक आत्राम यांच्यात लढत आहे. मुलचेरा तालुक्याच्या बंगाली समाज बहुल भागात साऱ्याच उमेदवारांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या भागात आदिवासी मतदार मोठ्या संख्येने असल्याने आदिवासींचे आरक्षणात धनगरांना स्थान देण्याच्या प्रश्नावरून येथे प्रचार तापला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा फायदा येथे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)