शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

‘ते’ बेपत्ता सात युवक-युवती नक्षल चकमकीतच ठार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 17:30 IST

सात युवक-युवती पोलीस-नक्षल चकमकीतच ठार झाल्याची दाट शक्यता समोर येत आहे.

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कसनासूर येथे गेल्या २२ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीपासून बेपत्ता झालेले नक्षल कमांडर साईनाथ याच्या गट्टेपल्ली या गावातील सात युवक-युवती पोलीस-नक्षल चकमकीतच ठार झाल्याची दाट शक्यता समोर येत आहे. ते सर्वजण नक्षल चळवळीशी जुळलेले होते, अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. 

या चकमकीत नक्षल कमांडर साईनाथ हासुद्धा मारल्या गेला. चकमकीनंतर तीन-चार दिवसपर्यंत काही नक्षल्यांचे मृतदेह जंगलात तर काहींचे इंद्रावती नदीत मिळाले होते. त्या चकमकीतील एकूण ३४ जणांपैकी २० जणांची ओळख पटली नाही. त्या ओळख न पटलेल्या मृतदेहांमध्ये गट्टेपल्लीतील बेपत्ता युवक-युवतींचाही समावेश असल्याचे म्हटले जात आहे.  नक्षल चकमकीपासून गट्टेपल्ली येथील इरपा वृत्ते मडावी (२३), मंगेश बकलू आत्राम (२६), रासो पोचा मडावी (२२), मंगेश चुंडू मडावी (१९), अनिता पेडू गावडे (२१), नुसे पेडू मडावी (२३) हे सहा युवक व युवती बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिसात दाखल केली आहे. याशिवाय रासो चुकू मडावी ही १५ वर्षाची अल्पवयीन मुलगीही बेपत्ता आहे. त्यामुळे तिचे अपहरण झाल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यापैकीच एक असलेली बुज्जी करवे उसेंडी (१७) ही युवतीही चकमकीत ठार झाली असून तिची ओळख पटवून पालकांनी त्याच वेळी तिचा मृतदेह ताब्यात घेतला होता. आठपैकी एक युवती नक्षल्यांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाली याचा अर्थ बेपत्ता असलेले बाकी सात युवक-युवतीही त्यावेळी नक्षल्यांसोबतच होते व तेसुद्धा त्याच चकमकीत मारले गेले असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

विशेष म्हणजे चकमकीनंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या काही साहित्य व डायरीत आठ जणांचे नक्षली पोषाख शिवण्यासाठी माप दिल्याची नोंद आढळली आहे.  यावरून ते सर्वजण नक्षल कमांडर साईनाथच्या सहकार्याने नक्षल चळवळीत रूजू झाले असण्याची शक्यता वाढत असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

डीएनए चाचणीतून होणार स्पष्टचकमकीनंतर ४ ते ५ दिवसानंतर काही मृतदेह इंद्रावती नदीत आढळले. परंतू मास्यांनी त्या मृतदेहांची दुरवस्था केल्याने ते ओळखण्याच्या स्थितीत नव्हते. मात्र त्यांचे डीएनए घेऊन ते बेपत्ता लोकांच्या कुटुंबियांच्या डीएनएशी जुळतात का याची चाचणी घेतली जात आहे. त्यातून चकमकीत ठार झालेले ते अज्ञात व्यक्ती गट्टेपल्लीतील बेपत्ता युवक-युवतीच होते किंवा नाही हे स्पष्ट होईल.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली