शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांमध्ये धान्याचा तुटवडा कायम

By admin | Updated: August 28, 2015 00:14 IST

यावर्षी पहिल्यांदाच अन्नधान्य खरेदी करण्याचे अधिकार प्रकल्प कार्यालयाला देण्यात आले आहेत.

गडचिरोली : यावर्षी पहिल्यांदाच अन्नधान्य खरेदी करण्याचे अधिकार प्रकल्प कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रकल्प कार्यालयाने निविदा मागितल्या आहेत. मात्र अजूनपर्यंत निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने आश्रमशाळांना अन्नधान्याचा पुरवठा झाला नाही. परिणामी अनेक आश्रमशाळांमध्ये अन्नधान्याचा तुटवडा जाणवत असून विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करताना मुख्याध्यापक व अधीक्षकांना कसरत करावी लागत आहे. शाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटला. तरीही आश्रमशाळांना धान्याचा पुरवठा केला नाही. त्यामुळे मागील वर्षी शिल्लक असलेले धान्य व भाजीसाठी उपयोगी असलेले साहित्य वापरून दीड महिना स्वयंपाक करण्यात आला. सहा महिन्यांपूर्वी पुरविलेले काही धान्य व भाजीसाठी उपयोगी साहित्य खराबही झाले आहेत. काही आश्रमशाळांमध्ये अन्नधान्याचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. तर काही आश्रमशाळांमधील धान्य १५ दिवसांपूर्वीच संपले आहे. त्यामुळे संबंधित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करून देताना मुख्याध्यापक, अधीक्षक व स्वयंपाकी यांची फारमोठी पंचाईत होत आहे. आश्रमशाळेतील ही विदारक परिस्थिती बघून काही पालकवर्ग आपल्या पाल्यांना आश्रमशाळांमधून घरीत नेत आहेत.आकस्मिक परिस्थितीत अन्नधान्य खरेदी करण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. मात्र आदिवासी विकास विभागाने ठरवून दिलेले अन्नधान्य खरेदीचे दर मागील वर्षीचे आहेत. त्यामुळे या किंमतीत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यास कोणताच दुकानदार तयार होत नाही. मागील एक महिन्यांपासून आश्रमशाळांमध्ये अन्नधान्याचे संकट निर्माण झाले आहे. मात्र निविदा प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नसल्याने हे संकट कायम आहे. अन्नधान्याची टंचाई लक्षात घेऊन काही विद्यार्थी शाळा सोडून जात आहेत. त्यामुळे शाळा ओस पडण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)