शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

आश्रमशाळांमध्ये धान्याचा तुटवडा कायम

By admin | Updated: August 28, 2015 00:14 IST

यावर्षी पहिल्यांदाच अन्नधान्य खरेदी करण्याचे अधिकार प्रकल्प कार्यालयाला देण्यात आले आहेत.

गडचिरोली : यावर्षी पहिल्यांदाच अन्नधान्य खरेदी करण्याचे अधिकार प्रकल्प कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रकल्प कार्यालयाने निविदा मागितल्या आहेत. मात्र अजूनपर्यंत निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने आश्रमशाळांना अन्नधान्याचा पुरवठा झाला नाही. परिणामी अनेक आश्रमशाळांमध्ये अन्नधान्याचा तुटवडा जाणवत असून विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करताना मुख्याध्यापक व अधीक्षकांना कसरत करावी लागत आहे. शाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटला. तरीही आश्रमशाळांना धान्याचा पुरवठा केला नाही. त्यामुळे मागील वर्षी शिल्लक असलेले धान्य व भाजीसाठी उपयोगी असलेले साहित्य वापरून दीड महिना स्वयंपाक करण्यात आला. सहा महिन्यांपूर्वी पुरविलेले काही धान्य व भाजीसाठी उपयोगी साहित्य खराबही झाले आहेत. काही आश्रमशाळांमध्ये अन्नधान्याचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. तर काही आश्रमशाळांमधील धान्य १५ दिवसांपूर्वीच संपले आहे. त्यामुळे संबंधित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करून देताना मुख्याध्यापक, अधीक्षक व स्वयंपाकी यांची फारमोठी पंचाईत होत आहे. आश्रमशाळेतील ही विदारक परिस्थिती बघून काही पालकवर्ग आपल्या पाल्यांना आश्रमशाळांमधून घरीत नेत आहेत.आकस्मिक परिस्थितीत अन्नधान्य खरेदी करण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. मात्र आदिवासी विकास विभागाने ठरवून दिलेले अन्नधान्य खरेदीचे दर मागील वर्षीचे आहेत. त्यामुळे या किंमतीत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यास कोणताच दुकानदार तयार होत नाही. मागील एक महिन्यांपासून आश्रमशाळांमध्ये अन्नधान्याचे संकट निर्माण झाले आहे. मात्र निविदा प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नसल्याने हे संकट कायम आहे. अन्नधान्याची टंचाई लक्षात घेऊन काही विद्यार्थी शाळा सोडून जात आहेत. त्यामुळे शाळा ओस पडण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)