शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

आश्रमशाळांमध्ये धान्याचा तुटवडा कायम

By admin | Updated: August 28, 2015 00:14 IST

यावर्षी पहिल्यांदाच अन्नधान्य खरेदी करण्याचे अधिकार प्रकल्प कार्यालयाला देण्यात आले आहेत.

गडचिरोली : यावर्षी पहिल्यांदाच अन्नधान्य खरेदी करण्याचे अधिकार प्रकल्प कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रकल्प कार्यालयाने निविदा मागितल्या आहेत. मात्र अजूनपर्यंत निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने आश्रमशाळांना अन्नधान्याचा पुरवठा झाला नाही. परिणामी अनेक आश्रमशाळांमध्ये अन्नधान्याचा तुटवडा जाणवत असून विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करताना मुख्याध्यापक व अधीक्षकांना कसरत करावी लागत आहे. शाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटला. तरीही आश्रमशाळांना धान्याचा पुरवठा केला नाही. त्यामुळे मागील वर्षी शिल्लक असलेले धान्य व भाजीसाठी उपयोगी असलेले साहित्य वापरून दीड महिना स्वयंपाक करण्यात आला. सहा महिन्यांपूर्वी पुरविलेले काही धान्य व भाजीसाठी उपयोगी साहित्य खराबही झाले आहेत. काही आश्रमशाळांमध्ये अन्नधान्याचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. तर काही आश्रमशाळांमधील धान्य १५ दिवसांपूर्वीच संपले आहे. त्यामुळे संबंधित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करून देताना मुख्याध्यापक, अधीक्षक व स्वयंपाकी यांची फारमोठी पंचाईत होत आहे. आश्रमशाळेतील ही विदारक परिस्थिती बघून काही पालकवर्ग आपल्या पाल्यांना आश्रमशाळांमधून घरीत नेत आहेत.आकस्मिक परिस्थितीत अन्नधान्य खरेदी करण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. मात्र आदिवासी विकास विभागाने ठरवून दिलेले अन्नधान्य खरेदीचे दर मागील वर्षीचे आहेत. त्यामुळे या किंमतीत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यास कोणताच दुकानदार तयार होत नाही. मागील एक महिन्यांपासून आश्रमशाळांमध्ये अन्नधान्याचे संकट निर्माण झाले आहे. मात्र निविदा प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नसल्याने हे संकट कायम आहे. अन्नधान्याची टंचाई लक्षात घेऊन काही विद्यार्थी शाळा सोडून जात आहेत. त्यामुळे शाळा ओस पडण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)