शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

ना रस्ता बनला, ना लोहखाणीचे काम सुरू झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

गील वर्षी १६ जानेवारी २०१९ ला सकाळी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर एटापल्लीपासून चार कि.मी अंतरावर गुरूपल्ली ते कर्रेम यादरम्यान एटापल्लीवरु न आलापल्ली जाणारी बस व आलापल्लीवरून सुरजागडकडे लोहदगड आणण्यासाठी जाणारा ट्रक यांच्यात धडक होऊन बसमधील चार जण जागीच ठार झाले होते. यामध्ये दोन महिलांसह एक पुरु ष कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश होता. अनेक जण जखमीही झाले होते.

ठळक मुद्देगुरूपल्ली अपघाताची वर्षपूर्ती : बेरोजगारीने होरपळतोय तालुका, पालकमंत्र्यांचे आश्वासनही विरले हवेत

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : लोहदगड वाहतुकीकरीता येणारा ट्रक आणि एसटी बसच्या गुरूपल्लीजवळ झालेल्या अपघाताला गुरूवारी (दि.१६) एक वर्ष पूर्ण होत आहे. या अपघातात चौघे जण जागीच ठार झाल्याने एटापल्लीत मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनात अनेक मागण्या होत्या. त्यात एटापल्ली-आलापल्ली या मार्गाचे नुतनीकरण करण्याची मुख्य मागणी होती. या रस्ताचे काम आठ दिवसात काम केले जाईल, असे आश्वासन तत्कालीन पालकमत्र्यांनी दिले होती. परंतु एक वर्ष लोटूनही ना रस्ताचे काम सुरू झाले, ना सुरजागड पहाडीवरील लोहखाणीचे काम सुरू झाले. बेरोजगारीने होरपळत असलेल्या या तालुक्यासाठी ही बाब चांगलीच जिव्हारी लागली आहे.मागील वर्षी १६ जानेवारी २०१९ ला सकाळी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर एटापल्लीपासून चार कि.मी अंतरावर गुरूपल्ली ते कर्रेम यादरम्यान एटापल्लीवरु न आलापल्ली जाणारी बस व आलापल्लीवरून सुरजागडकडे लोहदगड आणण्यासाठी जाणारा ट्रक यांच्यात धडक होऊन बसमधील चार जण जागीच ठार झाले होते. यामध्ये दोन महिलांसह एक पुरु ष कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश होता. अनेक जण जखमीही झाले होते. त्यातील एका मुलीचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला.हा अपघात सुरजागड लोहपहाडीवरील दगड वाहतुकीच्या ट्रकमुळे झाल्याने अपघातानंतर लगेच नागरीकांनी आक्र मक होवुन कायदा हातात घेत लोहदगड वाहतुकीसाठी जाणारे तब्बल १५ ट्रक जाळले तर अनेक ट्रकच्या काचा फोडल्या. अपघातात ठार झालेले एटापल्ली येथील वनपाल अंबादे यांचा मृतदेह एटापल्ली वन तपासणी नाक्याजवळ ठेवुन दोन दिवस विविध मागण्यांकरीता आंदोलन झाले. या आंदोलनाला तत्कालीन माजी आमदार धर्मरावबाबा आत्राम, दीपक आत्राम यांनी पाठीबा दिला. तसेच तत्कालीन पालकमंत्री अब्रिशराव आत्राम यांनी आंदोलन मंडपात भेट देवुन आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यासह ८ दिवसात एटापल्ली-आलापल्ली रस्त्याचे काम सुरु करू, असेही आश्वासन दिले. मात्र तब्बल एक वर्ष लोटले तरी त्यापैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही. नक्षलवाद्यांनी तीन वर्षापूर्वी ८० वाहने जाळल्यानंतर अवघ्या महिनाभरात पोलिसांनी हिंमत देत पुन्हा काम सुरू केले होते, पण यावेळी वर्ष लोटले तरी काम ठप्प आहे. १६ आॅगस्ट २०१९ पासून एटापल्ली येथे पुन्हा आठ दिवस आंदोलन झाले. एटापल्ली-आलापल्ली नवीन रस्त्याचे काम आणि सायन्स कॉलेज सुरू करण्याची मागणी लावून धरण्यात आली. त्या आंदोलनाला पाच महिने लोटले, पण एकही मागणी पूर्ण झालेली नाही.१५ दिवसात कामाला सुरूवात- धर्मरावबाबादि. १३ जानेवारीला एटापल्ली येथे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तालुकास्तरीय बाल क्रीडा कार्यक्र मात बोलताना एटापल्ली-आलापल्ली मार्गाचे काम १५ दिवसानंतर सुरु होणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा परिषद शाळेत सायन्स शाखा सुरु करण्याकरीता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मात्र सुरजागड पहाडीवरी लोहखाणीच्या कामाबाबत त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही.सुरजागड लोह प्रकल्पाच्या कामाला नक्षल्यांचा विरोध असल्याने लॉयड्स मेटल्स कंपनीचे नक्षलवाद्यांनी बरेच नुकसान केले. त्यानंतर या कामाला पोलीस संरक्षण देण्यात आले. मात्र गुरूपल्लीच्या अपघातापासून हे काम पुन्हा बंद झाले. काही जण हा प्रकल्पच नको म्हणतात, तर दुसरीकडे तालुक्यातील बेरोजगार प्रकल्पाचे काम सुरू करण्याची मागणी करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात