शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

रब्बीसाठी सवलतीचे बियाणे नाही

By admin | Updated: November 9, 2016 02:26 IST

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला १३ वने ७ टक्के वन महसूल अनुदानातून यंदा केवळ दोन लाख रूपयांची तरतूद करण्यात आली.

शेतकरी अडचणीत : जि.प.च्या कृषी विभागाकडे निधीचा अभावगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला १३ वने ७ टक्के वन महसूल अनुदानातून यंदा केवळ दोन लाख रूपयांची तरतूद करण्यात आली. या अल्पशा निधीतून जि.प.च्या कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामात ५० टक्के अनुदानावर २२ क्विंटल तूर बियाण्यांचे शेतकऱ्यांना वाटप केले. मात्र आता जि.प.च्या कृषी विभागाकडे रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलतीतील बियाणे पुरविण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने बियाणे उपलब्ध झाले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुके मिळून रब्बी पिकांचे सर्वसाधारण हेक्टर क्षेत्र एकूण २३ हजार ४०० इतके आहे. यंदा सन २०१६-१७ च्या वर्षात जि.प.च्या कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी ५ हजार २८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित म्हणून नियोजन केले. रब्बी हंगामासाठी शासनाकडे ५ हजार ९८२ क्विंटल बियाण्यांची मागणी केली असून जिल्ह्याच्या काही कृषी केंद्रात सदर बियाणे उपलब्ध आहेत. मात्र ही बियाणे शेतकऱ्यांना सवलतीत दिली जात नाही. जि.प.च्या कृषी विभागामार्फत दरवर्षी पाच लाखावर निधीतून गरीब शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर खरीप व रब्बी या दोन्ही हंगामासाठी बियाणे पुरविले जात होती. मात्र सन २०१६-१७ च्या जि.प.च्या अर्थसंकल्पात कृषी विभागाच्या तरतूदीस कात्री लावण्यात आल्यामुळे सवलतीत बियाणे मिळण्याची शेतकऱ्यांची आशा मावळली आहे. १३ वने ७ टक्के वन महसूल अनुदानांतर्गत जि.प.च्या कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामात ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना तेलवर्गीय बियाणे पुरविण्याची योजना कार्यान्वित केली होती. या योजनेंतर्गत खरीप हंगामात २२ क्विंटल तूर बियाणे व पाच लाख रूपयातून सवलतीत १४९ क्विंटल सोयाबिन बियाणे शेतकऱ्यांना पुरविली. मात्र रब्बी हंगामासाठी निधी उपलब्ध नसल्याने जि.प.च्या कृषी विभागाला ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना बियाणे पुरविणे शक्य झाले नाही. गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र एक हजार हेक्टर असून यंदा १ हजार ५४५ हेक्टर क्षेत्रात कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. ज्वारीचे सर्वसाधारण हेक्टर क्षेत्र ६ हजार ५०० असून कृषी विभागाने ७ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. हरभरा पिकाचे २ हजार ८०० सर्वसाधारण हेक्टर क्षेत्र असून ७ हजार ६६० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पंचायत समिती कार्यालयात शेतकऱ्यांच्या चकराआरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात हरभरा, मूग, उडीद, भूईमूग, वाटाणा आदी रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सदर पिकांच्या लागवडीसाठी जि.प. मार्फत सवलतीतील बियाणे उचलण्यासाठी अनेक शेतकरी पंचायत समिती कार्यालयात वारंवार चकरा मारीत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी थेट जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.कृषी केंद्रात साडेतीन हजार क्विंटल बियाणे उपलब्धरब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिकांच्या बियाण्यांसाठी धावपळ करावी लागू नये, याकरिता जि.प.च्या कृषी विभागाने आधीच नियोजन करून रब्बी पिकांच्या बियाण्यांची शासनाकडे मागणी केली. आतापर्यंत जिल्ह्याच्या अनेक कृषी केंद्रात साडेतीन हजार क्विंटल वर हरभरा, मूग, उडीद व इतर बियाणे उपलब्ध झाली आहेत. विक्रीसाठी बियाणे ठेवण्यात आली आहे. रब्बी हंगामातील मागणीनुसार उर्वरित बियाणे येत्या पाच-सहा दिवसात जिल्हाभरातील कृषी केंद्रांवर पोहोचणार असल्याची माहिती जि.प. कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.