शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

नगदी उत्पन्नाच्या आशेने मिरची लागवडीकडे वाढला कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 15:57 IST

वैरागड परिसरातील शेती अनुकूल : २०० हेक्टरवर बहरणार पीक

लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : मिरची हा स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक असल्याने या घटकाला सर्वत्र मागणी होत असते. मिरची नगदी पीक म्हणून ओळखले जाते. आरमोरी, कुरखेडा तालुक्यात मिरची पिकाचे सर्वाधिक लागवड क्षेत्र आहे. मागील वर्षीपासून लाल व हिरव्या मिरचीला बाजारात चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे मिरची पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. जळपास २०० हेक्टरवर मिरची पिकाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

आरमोरी तालुक्यातील वैरागड, मोहझरी, सुकाळा, मानापूर, कोसरी व इतर आठ-दहा गावात मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कुरखेडा तालुक्यातील मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ मालेवाडा येथे आहे. पण अलीकडे या भागात पीक पद्धतीत बदल करून मिरची ऐवजी मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन जाते. मका पिकाचा पेरा वाढला असता तरी मिरची पिकाचे उत्पादन घटले नाही.

या भागात मिरची पिकाचे उत्पादन केवळ लाल मिरचीसाठी केले जाते. कारण बाजारात हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरचीला अधिक भाव असतो आणि हे नगदी पैशाचे पीक आहे. ज्या काळात आजच्या इतक्या सिंचन सुविधा नव्हत्या त्या काळात मोट, नाडा लावून मिरची पिकाला सिंचनाची सोय केली जात होती. नंतर ऑइल इंजिन आले आता तर विद्युत कृषी पंपाने सिंचनाची सोय झाल्याने सिंचन सुविधा सुलभ झाली व मिरचीचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढले. रबी हंगामातील इतर पिकांचे क्षेत्रसुद्धा वाढत आहे. 

लाल मिरचीला अधिक भावहिरव्या मिरचीच्यात तुलनेत लाल मिरचीचा भाव टिकून राहते. भाव कमी असल्यास शेतकरी लाल मिरचीची विक्री काही काळ थांबवू शकतात. त्यामुळे वैरागड परिसरातील अनेक शेतकरी लाल मिरचीच लागवड करतात. फारच कमी शेतकरी हिरव्या मिरचीची लागवड करीत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :farmingशेतीGadchiroliगडचिरोली