शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

...तर रब्बीची पेरणी होणार अशक्यप्राय; हंगाम यावर्षी वाया जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:41 IST

सौर कृषिपंप लावण्याकरता विलंब : मागणीमध्ये अचानक वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : धानाचे पीक निघाले असून, रब्बी पिकांच्या पेरणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप लावून घेण्यासाठी महावितरण व मेडाकडे तगादा लावला आहे. मात्र विविध कारणे सांगून कंपन्या सौर कृषिपंप लावून देण्यास विलंब करीत आहेत. त्यामुळे रब्बी पिकांचा हंगाम यावर्षी वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासनाने मागेल त्याला सौर कृषिपंप देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना सौर कृषिपंप मंजूर केले आहेत. अर्ज स्वीकारणे व मंजूर करण्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण पार पाडत आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्याने पैसे भरून एजन्सी निवडायची असते. जी एजन्सी निवडली त्याच एजन्सीने सौर कृषिपंप लावून देणे गरजेचे आहे.

पावसाळ्याच्या कालावधीत सौर कृषिपंप लावून देण्यास एजन्सी तयार होत्या. मात्र अनेकांच्या विहिरीजवळ जाणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात पंप लावण्यास सांगितले. पंप लावून देण्यासाठी आता अचानक मागणी वाढली आहे. त्यामुळे पंप लावून देताना कंपनीच्या एजंटची तारंबळ उडत आहे. आता रब्बीच्या पिकांची पेरणी सुरू झाली आहे. पुन्हा जास्तीत जास्त १५ दिवस पेरणी करता येणार आहे. त्यानंतर मात्र रब्बी पिकांच्या पेरणीचा कालावधी निघून जाणार आहे. सौर कृषिपंप न बसल्याने रब्बीची पेरणी शक्य होणार नाही. अचानक मागणी वाढली हे जरी खरे असले तरी कंपन्यांनी पंप लावणाऱ्या मजुरांची संख्या वाढविण्याची गरज आहे. 

निवडणुकीचे कारण विधानसभेची निवडणूक असल्याने सौर कृषीपंपाबाबतच्या काही प्रशासकीय बाबी पूर्ण होण्यास उशीर लागत असल्याचे कारण सांगीतले जात होते. आता मात्र निवडणूक संपली आहे. उर्वरीत अर्ज मार्गी लागतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :CropपीकGadchiroliगडचिरोली