शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

...तर रब्बीची पेरणी होणार अशक्यप्राय; हंगाम यावर्षी वाया जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:41 IST

सौर कृषिपंप लावण्याकरता विलंब : मागणीमध्ये अचानक वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : धानाचे पीक निघाले असून, रब्बी पिकांच्या पेरणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप लावून घेण्यासाठी महावितरण व मेडाकडे तगादा लावला आहे. मात्र विविध कारणे सांगून कंपन्या सौर कृषिपंप लावून देण्यास विलंब करीत आहेत. त्यामुळे रब्बी पिकांचा हंगाम यावर्षी वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासनाने मागेल त्याला सौर कृषिपंप देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना सौर कृषिपंप मंजूर केले आहेत. अर्ज स्वीकारणे व मंजूर करण्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण पार पाडत आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्याने पैसे भरून एजन्सी निवडायची असते. जी एजन्सी निवडली त्याच एजन्सीने सौर कृषिपंप लावून देणे गरजेचे आहे.

पावसाळ्याच्या कालावधीत सौर कृषिपंप लावून देण्यास एजन्सी तयार होत्या. मात्र अनेकांच्या विहिरीजवळ जाणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात पंप लावण्यास सांगितले. पंप लावून देण्यासाठी आता अचानक मागणी वाढली आहे. त्यामुळे पंप लावून देताना कंपनीच्या एजंटची तारंबळ उडत आहे. आता रब्बीच्या पिकांची पेरणी सुरू झाली आहे. पुन्हा जास्तीत जास्त १५ दिवस पेरणी करता येणार आहे. त्यानंतर मात्र रब्बी पिकांच्या पेरणीचा कालावधी निघून जाणार आहे. सौर कृषिपंप न बसल्याने रब्बीची पेरणी शक्य होणार नाही. अचानक मागणी वाढली हे जरी खरे असले तरी कंपन्यांनी पंप लावणाऱ्या मजुरांची संख्या वाढविण्याची गरज आहे. 

निवडणुकीचे कारण विधानसभेची निवडणूक असल्याने सौर कृषीपंपाबाबतच्या काही प्रशासकीय बाबी पूर्ण होण्यास उशीर लागत असल्याचे कारण सांगीतले जात होते. आता मात्र निवडणूक संपली आहे. उर्वरीत अर्ज मार्गी लागतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :CropपीकGadchiroliगडचिरोली