शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

विभागांमध्ये समन्वय नसल्यानेच राष्ट्रीय महामार्गांचे काम रखडले; आ. धर्मरावबाबा आत्राम यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 14:34 IST

निधी मंजूर होऊनही काम थांबलेले

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांसह छत्तीसगड, तेलंगाणाला जोडणाऱ्या आष्टी ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी टप्पेनिहाय निधी उपलब्ध आहे; परंतु महामार्ग प्राधिकरण, वनविभाग यांच्यात समन्वय नाही. त्यामुळेच हे काम रखडलेले असून, त्याचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे, असा आरोप आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी येथे पत्रपरिषदेत केला.

४० ते ५० वर्षांपूर्वी तयार झालेल्या त्या मार्गाची त्यावेळची क्षमता १० टन भारवाहनाची होती; पण आज सुरजागड लोहखाणीसह सर्वच प्रकारची जड वाहतूक छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून होते. त्यामुळे या मार्गाची पुनर्बांधणी करून योग्य क्षमतेचा मार्ग बनविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा

दि. १६ ते २३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेतून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. आता ८ ऑक्टोबरपासून दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये परिवार संवाद यात्रा काढत असून, त्याची सुरुवात सिरोंचा येथून केली जाणार असल्याची माहिती धर्मरावबाबा यांनी यावेळी दिली.

आलापल्ली बायपाससाठी सर्वेक्षण झाले

  • आलापल्ली येथे लवकरात लवकर बायपास मार्ग तयार करून सुरजागड लोहखनिजाची वाहतूक त्या मार्गाने वळवावी. सर्व प्रकारच्या ओव्हरलोड परिवहन विभागाने ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी यावेळी धर्मरावबाबा यांनी केली.
  • जिल्ह्याच्या उत्तर भागात वाघाचे अलीकडे २६ बळी झाले. त्यातील २४ लोकांना अद्याप शासकीय मदत मिळाली नाही. विजेची समस्याही वाढली आहे. नक्षलग्रस्त भागात भारनियमन करता येत नसताना महावितरणची मनमानी सुरू आहे; पण या भागातील लोकप्रतिनिधी गावात येतच नसल्याची खंत नागरिकांनी आपल्याजवळ व्यक्त केल्याचे ते म्हणाले.
टॅग्स :PoliticsराजकारणMLAआमदारGadchiroliगडचिरोलीroad transportरस्ते वाहतूक