शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे कातडी भाजतेय; 'सनबर्न' पासून वाचण्याचा एकमेव उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 17:15 IST

खबरदारी हाच प्रतिबंधात्मक उपाय : आठवडाभरापासून तापमान वाढ; दुपारी बाहेर जाणे टाळावे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रखर उन्हामध्ये सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांचे प्रमाण (यूव्ही इन्डेक्स) हे जास्त प्रमाणात असते. अतिनील किरणांच्या जास्तकाल संपर्कात आल्यास त्वचेसंबंधी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यालाच 'सनबर्न' असेही म्हणतात.

सध्या जिल्ह्यातील तापमान वाढलेले असल्याने यापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सनबर्न म्हणजे त्वचेवर येणारी जळजळ, जी सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे होते. सनबर्न झाल्यावर त्वचा लाल होते, जळजळ होते आणि कधीकधी पाण्याने भरलेले फोड येतात. यापासून लहान मुलांचा बचाव करावा. त्यांना दुपारच्या सुमारास घराबाहेर पडू देऊन नये. 

४४ अंश सेल्सिअसवर जिल्ह्यातील तापमान पोहोचले आहे. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणे धोकादायक ठरू शकते 

१५ मिनिटांच्या उन्हात सनबर्नचा धोकातीव्र उन्हात १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ उभे राहिल्यास सनबर्न होण्याचा धोका बळावतो. त्यामुळे नागरिकांनी बाहेर सावलीखाली राहावे. उन्हात राहू नये. 

सनबर्न म्हणजे काय ?सूर्याच्या अतिउष्ण किरणाचा थेट त्वचेवर परिणाम होतो. त्यातून त्वचेवर खाज येते. लालसरपणा येतो. जळजळ होण्यास सुरुवात होते. वेदना जाणवतात. अस्वस्थता निर्माण होते. काहीवेळा त्वचेवर फोड येतात. त्यात पुरळ येते. अशावेळी तापदेखील येतो. उलट्या होतात. अशावेळी संबंधितांना सावलीत घेऊन थंट हवेत ठेवल्यानंतर त्यावर उपचार होतो. 

हायड्रेटेड राहावे लागणारदर दीड तासाने पाणी प्यावे, ताज्या फळांचा सर घ्यावा, नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक, जीवनसत्त्व व खनिजयुक्त संतुलित आहार घ्यावा, यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

"तीव्र उन्हामुळे जसा उष्माघाताचा धोका असतो, अगदी तसाच सनबर्नमुळे त्वचा भाजण्याचाही धोका असतो. त्वचेला धोका पोहोचू नये यासाठी तीव्र उन्हात जाऊ नये. पाणी पीत राहावे. आहाराकडे लक्ष द्यावे."- डॉ. शरयू हेमके, त्वचारोगतज्ज्ञ

टॅग्स :Sun strokeउष्माघातSummer Specialसमर स्पेशलGadchiroliगडचिरोली