शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
4
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
5
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
6
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
7
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
8
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
9
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
10
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
11
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
13
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
14
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
15
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
16
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
18
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
19
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
20
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा

याेजनेचे 6 हजार मिळण्यासाठी आता 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 05:00 IST

शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत चार महिन्याला दाेन हजार रूपये असे वर्षातून तीन वेळा सहा हजार रूपये संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात. संबंधित व्यक्तीची ओळख पटावी, यासाठी शासनाने ई-केवायसी करणे आवश्यक केले आहे.  आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी साेयीचे झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : पीएम किसान सन्मान याेजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आवश्यक करण्यात आली आहे. ई-केवायसी करण्याची मुदत ३१ मेपर्यंत हाेती. मात्र आता शासनाने तब्बल दाेन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत ई-केवायसी करता येणार आहे. शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत चार महिन्याला दाेन हजार रूपये असे वर्षातून तीन वेळा सहा हजार रूपये संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात. संबंधित व्यक्तीची ओळख पटावी, यासाठी शासनाने ई-केवायसी करणे आवश्यक केले आहे.  सुरुवातीच्या कालावधीत पीएम किसान याेजनेची साईट व्यवस्थित काम करीत नसल्याने केवायसी करण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू हाेते. मे महिन्यात मात्र अनेकांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. मात्र काही शेतकरी अजूनही शिल्लक आहेत. देशभराचा विचार करत शासनाने मुदतवाढ दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी साेयीचेसुरूवातीला ३१ मार्चपर्यंत केवायसीची मुदत हाेती. त्यानंतर ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली. पुन्हा आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी साेयीचे झाले आहे.

१ लाख ५२ हजार ६०९ शेतकऱ्यांना लाभजिल्ह्यात १ लाख ५५ हजार ४५५ शेतकऱ्यांनी नाेंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ५२ हजार ६०९ शेतकऱ्यांना या याेजनेचा लाभ दिला जात आहे. नाेंदणीचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे, पाेलीस विभागाच्या वतीने शिबिर घेऊन नाेंदणी केली जात आहे. त्यामुळे दुर्गम भागातील शेतकरी या याेजनेचे लाभार्थी हाेत आहेत.

केवायसीसाठी शेतकऱ्यांची कसरत

अनेक शेतकऱ्यांच्या आधारकार्डासाेबत माेबाईल क्रमांक लिंक नाही. त्यामुळे त्यांना सीएससी सेंटरमध्ये जाऊन बायाेमेट्रिक केवायसी करावी लागत आहे. त्यासाठी शहरात जावे लागत आहे. काहीजणांचे अंगठे जुळत नसल्याने ई-केवायसी करण्यात फार माेठी अडचणी येत आहे.  - रघुनाथ बारापात्रे, शेतकरी

केवायसी करूनही काही शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने या याेजनेबाबत तक्रार कुठे करायची, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडते. त्यामुळे काही शेतकरी अजुनही या याेजनेच्या लाभापासून वंचित आहेत. तालुकास्तरावर कर्मचारी नियुक्त करावे.    - वासुदेव शेंडे, शेतकरी

४० टक्के शेतकऱ्यांची केवायसी नाहीदुर्गम भागातील शेतकऱ्यांना अजूनही ई-केवायसीबाबत माहिती नाही. तसेच मध्यंतरी साईट बंद असल्याने ई-केवायसी करणे शक्य नव्हते. जिल्ह्यात एकूण १ लाख ५५ हजार ४५५ शेतकऱ्यांची नाेंदणी झाली आहे. त्यापैकी ३१ मेपर्यंत जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना