शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

याेजनेचे 6 हजार मिळण्यासाठी आता 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 05:00 IST

शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत चार महिन्याला दाेन हजार रूपये असे वर्षातून तीन वेळा सहा हजार रूपये संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात. संबंधित व्यक्तीची ओळख पटावी, यासाठी शासनाने ई-केवायसी करणे आवश्यक केले आहे.  आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी साेयीचे झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : पीएम किसान सन्मान याेजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आवश्यक करण्यात आली आहे. ई-केवायसी करण्याची मुदत ३१ मेपर्यंत हाेती. मात्र आता शासनाने तब्बल दाेन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत ई-केवायसी करता येणार आहे. शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत चार महिन्याला दाेन हजार रूपये असे वर्षातून तीन वेळा सहा हजार रूपये संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात. संबंधित व्यक्तीची ओळख पटावी, यासाठी शासनाने ई-केवायसी करणे आवश्यक केले आहे.  सुरुवातीच्या कालावधीत पीएम किसान याेजनेची साईट व्यवस्थित काम करीत नसल्याने केवायसी करण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू हाेते. मे महिन्यात मात्र अनेकांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. मात्र काही शेतकरी अजूनही शिल्लक आहेत. देशभराचा विचार करत शासनाने मुदतवाढ दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी साेयीचेसुरूवातीला ३१ मार्चपर्यंत केवायसीची मुदत हाेती. त्यानंतर ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली. पुन्हा आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी साेयीचे झाले आहे.

१ लाख ५२ हजार ६०९ शेतकऱ्यांना लाभजिल्ह्यात १ लाख ५५ हजार ४५५ शेतकऱ्यांनी नाेंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ५२ हजार ६०९ शेतकऱ्यांना या याेजनेचा लाभ दिला जात आहे. नाेंदणीचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे, पाेलीस विभागाच्या वतीने शिबिर घेऊन नाेंदणी केली जात आहे. त्यामुळे दुर्गम भागातील शेतकरी या याेजनेचे लाभार्थी हाेत आहेत.

केवायसीसाठी शेतकऱ्यांची कसरत

अनेक शेतकऱ्यांच्या आधारकार्डासाेबत माेबाईल क्रमांक लिंक नाही. त्यामुळे त्यांना सीएससी सेंटरमध्ये जाऊन बायाेमेट्रिक केवायसी करावी लागत आहे. त्यासाठी शहरात जावे लागत आहे. काहीजणांचे अंगठे जुळत नसल्याने ई-केवायसी करण्यात फार माेठी अडचणी येत आहे.  - रघुनाथ बारापात्रे, शेतकरी

केवायसी करूनही काही शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने या याेजनेबाबत तक्रार कुठे करायची, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडते. त्यामुळे काही शेतकरी अजुनही या याेजनेच्या लाभापासून वंचित आहेत. तालुकास्तरावर कर्मचारी नियुक्त करावे.    - वासुदेव शेंडे, शेतकरी

४० टक्के शेतकऱ्यांची केवायसी नाहीदुर्गम भागातील शेतकऱ्यांना अजूनही ई-केवायसीबाबत माहिती नाही. तसेच मध्यंतरी साईट बंद असल्याने ई-केवायसी करणे शक्य नव्हते. जिल्ह्यात एकूण १ लाख ५५ हजार ४५५ शेतकऱ्यांची नाेंदणी झाली आहे. त्यापैकी ३१ मेपर्यंत जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना