शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नदीपात्राचे झाले वाळवंट; पाण्याचे प्रवाह बदलले, गौण खनिजाची लयलूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2023 08:50 IST

Gadchiroli News नवीन वाळूधाेरणानुसार वाळूचा उपसा, वाहतूक व ग्राहकांना वाळू भरून देण्याचेच काम निविदाधारक कंत्राटदार करणार असल्याने यावर्षी तरी नद्यांमधून अवैध उपसा हाेणार नाही, याची जबाबदारी प्रशासन घेईल काय, असा प्रश्न आहे.

गाेपाल लाजूरकर

गडचिराेली : नदीपात्रातील वाळूगटाचा ताबा घेतल्यानंतर कंत्राटदारांकडून राजराेसपणे अवैधरित्या माेठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला केला जाताे. यात पर्यावरण विभागाच्या नियमांनासुद्धा तिलांजली दिली जाते. हा सर्व प्रकार दरवर्षी कंत्राटदारांकडून सर्वत्र घडवून आणला जात हाेता; परंतु नवीन वाळूधाेरणानुसार वाळूचा उपसा, वाहतूक व ग्राहकांना वाळू भरून देण्याचेच काम निविदाधारक कंत्राटदार करणार असल्याने यावर्षी तरी नद्यांमधून अवैध उपसा हाेणार नाही, याची जबाबदारी प्रशासन घेईल काय, असा प्रश्न आहे.

नवीन वाळू धाेरणानुसार शासनच वाळूची विक्री करणार हे स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ उपसा,वाहतूक व वाळू भरून देण्याची जबाबदारी निविदाधारक करतील; परंतु ह्या प्रक्रियेतही पारदर्शकता राहील की, संबंधित निविदाधारकांकडून वाळू खरेदी करणाऱ्या ग्राहकांची आर्थिक लूट हाेईल, यासह अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात घाेळका करीत आहेत.

शेतकरी घाटांच्या नावाने राजराेसपणे उपसा

गडचिराेली जिल्ह्यात २० च्या आसपास शेतकरी वाळू घाटांवरून वाळू उपसण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली हाेती. सदर घाटांमध्ये गडचिराेली तालुक्यातील साखरा, बाेदली व आंबेशिवणी येथील घाटांचा समावेश हाेता. सध्या येथील एक घाट बंद झाला असला तरी अद्यापही राजराेसपणे वाळूचा उपसा केला जात आहे. ५ हजार ब्राॅसची मंजुरी मिळवा अन् २० हजार ब्राॅस वाळूचा उपसा करा, असा प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. या कंत्राटदारावर कारवाई करण्यासह अधिकाऱ्यांचे हात थरथरतात की काय, असा प्रश्न आहे.

 

नियमबाह्य वाळू उपशाने बदलले प्रवाह

नदी पात्रातील वाळू थराची जाडी कायम राहावी यासाठी बेंच मार्क निश्चित करून बेंच मार्कच्या खाली कोणत्याही परिस्थितीत वाळूचे उत्खनन करता येणार नाही, निश्चित केलेले बेंच मार्क पडणार नाहीत, तसेच नदी पात्रातील वाळूच्या थराच्या आधारे आजूबाजूच्या विहिरीतील पाण्याची पातळी कमी होणार नाही. याबाबत योग्य दक्षता निविदाधारकाने घेणे आवश्यक आहे. रेल्वे पुलाच्या व रस्ते पुलाच्या कोणत्याही बाजूने ६०० मीटर अंतराच्या आत वाळूचे उत्खनन करता येणार नाही. हे सर्व नियम पाळले जात नसल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह बदलताे.

 

हे नियम पाळणार काय?

सार्वजनिक पाणवठा / पाणीपुरवठा व्यवस्था असलेल्या ठिकाणापासून १०० मीटर अथवा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा निश्चित करेल तेवढ्या अंतरापलिकडे उत्खनन करणे आवश्यक आहे. रस्ते किंवा पायवाट म्हणून वापरण्यात येणाऱ्या जमिनीतून वाळू काढता येणार नाही. पर्यावरण विभागाच्या अनुमतीमध्ये परवानगी दिलेल्या खोलीपेक्षा जास्त खोल उत्खनन केल्याचे निदर्शनास आल्यास निविदाधारकाडून घेण्यात आलेली अनामत रक्कम जप्त करण्यात येऊन, निविदा रद्द करण्यात यावी, तसेच हे उत्खनन अवैध ठरवून कारवाई करण्यात यावी, असे शासन निर्णयात नमूद आहे. त्यामुळे हे नियम पाळले जातील काय, असाही प्रश्न आहे.

टॅग्स :sandवाळू