शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

वैनगंगेच्या पुराचा दाब, ओढे-नाले होतात फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 17:45 IST

आष्टी परिसरातील आठ गावांना दरवर्षी फटका: शेतीचे अतोनात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी :गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या वैनगंगा नदीला पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसतो. त्यात शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होते. पशुधनाची जीवितहानी होते.

आष्टीजवळून बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पात्र फार मोठे आहे. या नदीलगत कढोली, जयरामपूर, इल्लूर, ठाकरी, चपराळा, गणपूर, आष्टी, अनखोडा आदी गावे आहेत. मध्य प्रदेशात आलेल्या पावसाचे पाणी संजय सरोवर व गोसेखुर्द धरणात साठवून ठेवले जाते. धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्यास संजय सरोवर व गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे पावसाळ्यात अर्धी भरून असलेल्या वैनगंगा नदीला लवकरच पूर येतो. आष्टीजवळच्या पुलावर ५ फूट पाणी वाढल्यास पुराचे पाणी कढोली, जयरामपूर, इल्लूर, ठाकरी, गणपूर, चपराळा आदी गावांतील शेतात शिरते. त्यामुळे धानाचे पीक पूर्ण पाण्याखाली येत असल्याने धान सडून जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते.

आष्टीच्या विश्रामगृहाजवळील शेती पाण्याखाली येते. वैनगंगेच्या पुराच्या दाबामुळे अनखोडा नाल्यावर पाणी चढते. त्यामुळे नाल्यालगत असलेल्या शेतात पाणी भरून राहते. त्यामुळे या परिसरातील धान, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

टॅग्स :ashti-acआष्टीGadchiroliगडचिरोली