शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेच्या पुराचा दाब, ओढे-नाले होतात फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 17:45 IST

आष्टी परिसरातील आठ गावांना दरवर्षी फटका: शेतीचे अतोनात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी :गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या वैनगंगा नदीला पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसतो. त्यात शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होते. पशुधनाची जीवितहानी होते.

आष्टीजवळून बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पात्र फार मोठे आहे. या नदीलगत कढोली, जयरामपूर, इल्लूर, ठाकरी, चपराळा, गणपूर, आष्टी, अनखोडा आदी गावे आहेत. मध्य प्रदेशात आलेल्या पावसाचे पाणी संजय सरोवर व गोसेखुर्द धरणात साठवून ठेवले जाते. धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्यास संजय सरोवर व गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे पावसाळ्यात अर्धी भरून असलेल्या वैनगंगा नदीला लवकरच पूर येतो. आष्टीजवळच्या पुलावर ५ फूट पाणी वाढल्यास पुराचे पाणी कढोली, जयरामपूर, इल्लूर, ठाकरी, गणपूर, चपराळा आदी गावांतील शेतात शिरते. त्यामुळे धानाचे पीक पूर्ण पाण्याखाली येत असल्याने धान सडून जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते.

आष्टीच्या विश्रामगृहाजवळील शेती पाण्याखाली येते. वैनगंगेच्या पुराच्या दाबामुळे अनखोडा नाल्यावर पाणी चढते. त्यामुळे नाल्यालगत असलेल्या शेतात पाणी भरून राहते. त्यामुळे या परिसरातील धान, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

टॅग्स :ashti-acआष्टीGadchiroliगडचिरोली