शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

वैनगंगेच्या पुराचा दाब, ओढे-नाले होतात फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 17:45 IST

आष्टी परिसरातील आठ गावांना दरवर्षी फटका: शेतीचे अतोनात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी :गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या वैनगंगा नदीला पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसतो. त्यात शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होते. पशुधनाची जीवितहानी होते.

आष्टीजवळून बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पात्र फार मोठे आहे. या नदीलगत कढोली, जयरामपूर, इल्लूर, ठाकरी, चपराळा, गणपूर, आष्टी, अनखोडा आदी गावे आहेत. मध्य प्रदेशात आलेल्या पावसाचे पाणी संजय सरोवर व गोसेखुर्द धरणात साठवून ठेवले जाते. धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्यास संजय सरोवर व गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे पावसाळ्यात अर्धी भरून असलेल्या वैनगंगा नदीला लवकरच पूर येतो. आष्टीजवळच्या पुलावर ५ फूट पाणी वाढल्यास पुराचे पाणी कढोली, जयरामपूर, इल्लूर, ठाकरी, गणपूर, चपराळा आदी गावांतील शेतात शिरते. त्यामुळे धानाचे पीक पूर्ण पाण्याखाली येत असल्याने धान सडून जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते.

आष्टीच्या विश्रामगृहाजवळील शेती पाण्याखाली येते. वैनगंगेच्या पुराच्या दाबामुळे अनखोडा नाल्यावर पाणी चढते. त्यामुळे नाल्यालगत असलेल्या शेतात पाणी भरून राहते. त्यामुळे या परिसरातील धान, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

टॅग्स :ashti-acआष्टीGadchiroliगडचिरोली