शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रात महाविद्यालयातील पटसंख्या वर्षभरात २० हजारांनी घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:46 IST

Gadchiroli : विद्यापीठ कॅम्पसमध्ये विविध कोर्सेसला प्रवेशासाठी विद्यार्थी मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रात मुक्त विद्यापीठ आणि दूरस्थ शिक्षण अभ्यास केंद्रांमुळे विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील पटसंख्या गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० हजारांनी घटली आहे. 

विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, इंदिरा गांधी हिंदी विश्वविद्यालय, वर्धा, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठाचे अभ्यास केंद्रे सुरू आहेत. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयाच्या पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संख्येवर फार गंभीर परिणाम होत असून विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. या विद्यापीठाची एकूण विद्यार्थी संख्या मागील वर्षाच्या तुलनेत २० हजारांनी कमी झालेली आहे. त्यामुळे महाविद्यालयातील अनेक शैक्षणिक तुकड्या बंद होऊन शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत, असे प्राध्यापकांच्या संघटनेने म्हटले आहे. कुलगुरू व इतर अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन दुरुस्त शिक्षण केंद्राला मंजुरी देऊ नये, यासाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

अभ्यासकेंद्रांना परवानगी देऊ नयेगोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये मुक्त विद्यापीठ, दूरस्थ शिक्षण तसेच इतर विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रांना परवानगी न देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे आणि सचिव डॉ. विवेक गोर्लावार यांनी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

या तीन विद्यापीठाने पूर्वपरवानगीबाबत ठराव केले पारितपटसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अधिसभेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांना जिल्हाबंदी केली. तसेच विद्यापीठ परिक्षेत्रात अभ्यास केंद्रे उघडताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याबाबत ठराव अधिसभेत पास केलेला आहे.

प्राधिकरणाने काय दिला अभिप्राय?गोंडवाना विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयाअंतर्गत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून याबाबत विद्यापीठाच्या विद्या परिषद, सिनेट व व्यवस्थापन परिषदेमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याबाबत उपरोक्त प्राधिकरणाने अभिप्राय दिला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर विद्यार्थ्यांअभावी भविष्यात अनेक महाविद्यालय बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीuniversityविद्यापीठ