शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

तलावानेच केले शेकडाे हेक्टर शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 05:00 IST

नवेगाव माल येथील गावतलाव पुरातन आहे. तलावाच्या आतील भागात शेती आहे. त्यामुळे आतील भागात शेतजमीन असलेले शेतकरी तलावात मुबलक पाणी साचू देत नाही. तलाव पाळ ही गवती जागेत असून तलावातील आतील भागात शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. वीस वर्षांपूर्वी तलावातील आतील जमिनी लागवडीखाली पाहिजे त्या प्रमाणात नव्हत्या. आता मात्र आतील भागात असलेल्या शेतजमिनी लागवडीखाली आल्या असल्याने तलावातील पाणी जाण्यासाठी मार्ग नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नवेगाव (माल) येथील गावतलावाची पाळ फुटून तलावामागील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे आवत्या व धान प-ह्यांमध्ये गाळ साचून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  नवेगाव माल येथील गावतलाव पुरातन आहे. तलावाच्या आतील भागात शेती आहे. त्यामुळे आतील भागात शेतजमीन असलेले शेतकरी तलावात मुबलक पाणी साचू देत नाही. तलाव पाळ ही गवती जागेत असून तलावातील आतील भागात शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. वीस वर्षांपूर्वी तलावातील आतील जमिनी लागवडीखाली पाहिजे त्या प्रमाणात नव्हत्या. आता मात्र आतील भागात असलेल्या शेतजमिनी लागवडीखाली आल्या असल्याने तलावातील पाणी जाण्यासाठी मार्ग नाही. अधूनमधून दरवर्षी तलाव पाळ फुटत असते. सध्या हे तलाव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. महसूल विभाग याकडे लक्ष देत नाही. केवळ भेटी देऊन वेळ मारून निघून जाते. तलावातील ओव्हरफ्लोचे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने तलाव पाळ फुटून नुकसान सहन करण्याची दुर्दैवी पाळी शेतकऱ्यांवर येत असते. कधी रोवणी झाल्यावर तलाव फुटत असते. त्यामुळे तलावामागील शेतकऱ्यांचे नुकसान होते. तलाव पाळ फुटल्यावर शेतकरी वर्गणी गोळा करून पाळीची दुरुस्ती करीत असतात. मात्र तलाव मजबुतीकरणाकडे संबंधित विभाग लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी उपसरपंच चरणदास चौधरी, तंमुस अध्यक्ष बाबुराव चौधरी, छबिलदास चौधरी, पोचू कोहपरे, तुकड्यादास कोहपरे, बंडू चौधरी, टूमदेव डायकी, आत्माराम चौधरी, मंगलदास चौधरी, प्रवीण चौधरी, विलास कोहपरे, नकटू भिवनकर, पुरुषोत्तम डायकी, प्रेमाजी चौधरी, भैय्याजी चौधरी, मारोती दिघोरे, वासुदेव चौधरी, मारोती चौधरी यांनी केली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती