शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वैरागडमधील ऐतिहासिक ठेवा जपण्याकडे दुर्लक्ष; १०० विहिरींचे गाव ही ओळख होतेय लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 16:19 IST

शिवकालीन ‘हातीगुंफा’ शिलालेखात वैरागडचा उल्लेख सापडतो.

प्रदीप बोडणे

वैरागड (गडचिरोली) : सोळाव्या शतकातील बाजारपेठेचे गाव असणाऱ्या वैरागड येथे पूर्वी हिऱ्याची खाण होती. या खाणीच्या संरक्षणार्थ तत्कालीन राजाने किल्ला बांधला होता. या किल्ल्यात आणि गावाच्या सीमावर्ती भागात मजबूत धाटणीच्या गोलाकार, त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी अशा विविध आकाराच्या १०० विहिरी आहेत. काळाच्या ओघात त्यातील बहुतांश विहिरी नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे ‘१०० विहिरींचे गाव’ अशी या गावाची ओळख आता नष्ट होऊ पाहात आहे.

आरमोरी या तालुक्याच्या ठिकाणापासून १५ कि.मी. अंतरावर पूर्वेला वैरागड हे गाव आहे. येथे ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वर मंदिर, गोरजाई मंदिर, आदिशक्ती देवीची मूर्ती आणि इतर हेमाडपंथी मंदिरे आहेत. या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शिवकालीन ‘हातीगुंफा’ शिलालेखात वैरागडचा उल्लेख सापडतो.

हिऱ्याच्या खाणीला संस्कृतमध्ये वज्रगर असे म्हणतात. त्याचा अपभ्रंश होऊन वैरागड असे नाव प्रचलित झाल्याचे सांगितले जाते. तत्कालीन संयुक्त मध्यप्रदेश राज्यात या भागाचा समावेश होता. त्यावेळी चंद्रपूर, वैरागड, राजनांदगाव या मोठ्या बाजारपेठा होत्या. वैरागडमधील भौगोलिक खुणा लक्षात घेता येथे मोठे गाव असावे असे लक्षात येते. गावाच्या सीमावर्ती भागात १०० ते २०० फुटांवर विहिरी आढळून येतात.

पर्यटकांसाठी आकर्षण

वैरागड किल्ल्याच्या १२ एकरात सभोवती बुरूज, तट आहेत. मधल्या परिसरात आज ८ विहिरी आहेत. त्या विहिरी त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, अष्टकोनी व गोलाकार आहे. त्यात एक पायऱ्यांची विहीरसुद्धा आहे. या पायऱ्यांच्या विहिरीची बरीच पडझड झाली आहे. पण या विहिरींची जपणूक करण्याकडे पुरातत्त्व विभागाचे लक्ष नाही. बांधकामासाठी पाण्याची गरज असल्याने गेल्यावर्षी एका विहिरीची पुरातत्त्व विभागाने दुरुस्ती केली. या विहिरी किल्ला पाहायला येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

वारसा जपण्याची गरज

गावातील विहिरींची संख्या मोठी असून एका चौकात उभे राहिल्यास थोड्याच अंतरावर ४ ते ५ विहिरी दृष्टीत पडतात. विहिरींची बांधणी योग्य असल्याने त्या अजूनही सुस्थितीत आहेत. त्यांचे पाणीही गोड आहे. पण बोअरवेलसह पाण्याचे इतर स्रोत निर्माण झाल्याने या विहिरींच्या पाण्याचा वापर क्वचितच होतो. वापर नसल्याने त्यात कचराही जमला आहे. काही विहिरी तर कचऱ्याने बुजूनही गेल्या आहेत. कलाकुसरीचा उत्तम नमुना असलेल्या या विहिरींचा ठेवा जपल्यास गावाची ओळख कायम राहण्यासोबत पर्यटकांनाही त्यांचे आकर्षण राहील.

टॅग्स :SocialसामाजिकhistoryइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण