शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

वैरागडमधील ऐतिहासिक ठेवा जपण्याकडे दुर्लक्ष; १०० विहिरींचे गाव ही ओळख होतेय लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 16:19 IST

शिवकालीन ‘हातीगुंफा’ शिलालेखात वैरागडचा उल्लेख सापडतो.

प्रदीप बोडणे

वैरागड (गडचिरोली) : सोळाव्या शतकातील बाजारपेठेचे गाव असणाऱ्या वैरागड येथे पूर्वी हिऱ्याची खाण होती. या खाणीच्या संरक्षणार्थ तत्कालीन राजाने किल्ला बांधला होता. या किल्ल्यात आणि गावाच्या सीमावर्ती भागात मजबूत धाटणीच्या गोलाकार, त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी अशा विविध आकाराच्या १०० विहिरी आहेत. काळाच्या ओघात त्यातील बहुतांश विहिरी नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे ‘१०० विहिरींचे गाव’ अशी या गावाची ओळख आता नष्ट होऊ पाहात आहे.

आरमोरी या तालुक्याच्या ठिकाणापासून १५ कि.मी. अंतरावर पूर्वेला वैरागड हे गाव आहे. येथे ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वर मंदिर, गोरजाई मंदिर, आदिशक्ती देवीची मूर्ती आणि इतर हेमाडपंथी मंदिरे आहेत. या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शिवकालीन ‘हातीगुंफा’ शिलालेखात वैरागडचा उल्लेख सापडतो.

हिऱ्याच्या खाणीला संस्कृतमध्ये वज्रगर असे म्हणतात. त्याचा अपभ्रंश होऊन वैरागड असे नाव प्रचलित झाल्याचे सांगितले जाते. तत्कालीन संयुक्त मध्यप्रदेश राज्यात या भागाचा समावेश होता. त्यावेळी चंद्रपूर, वैरागड, राजनांदगाव या मोठ्या बाजारपेठा होत्या. वैरागडमधील भौगोलिक खुणा लक्षात घेता येथे मोठे गाव असावे असे लक्षात येते. गावाच्या सीमावर्ती भागात १०० ते २०० फुटांवर विहिरी आढळून येतात.

पर्यटकांसाठी आकर्षण

वैरागड किल्ल्याच्या १२ एकरात सभोवती बुरूज, तट आहेत. मधल्या परिसरात आज ८ विहिरी आहेत. त्या विहिरी त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, अष्टकोनी व गोलाकार आहे. त्यात एक पायऱ्यांची विहीरसुद्धा आहे. या पायऱ्यांच्या विहिरीची बरीच पडझड झाली आहे. पण या विहिरींची जपणूक करण्याकडे पुरातत्त्व विभागाचे लक्ष नाही. बांधकामासाठी पाण्याची गरज असल्याने गेल्यावर्षी एका विहिरीची पुरातत्त्व विभागाने दुरुस्ती केली. या विहिरी किल्ला पाहायला येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

वारसा जपण्याची गरज

गावातील विहिरींची संख्या मोठी असून एका चौकात उभे राहिल्यास थोड्याच अंतरावर ४ ते ५ विहिरी दृष्टीत पडतात. विहिरींची बांधणी योग्य असल्याने त्या अजूनही सुस्थितीत आहेत. त्यांचे पाणीही गोड आहे. पण बोअरवेलसह पाण्याचे इतर स्रोत निर्माण झाल्याने या विहिरींच्या पाण्याचा वापर क्वचितच होतो. वापर नसल्याने त्यात कचराही जमला आहे. काही विहिरी तर कचऱ्याने बुजूनही गेल्या आहेत. कलाकुसरीचा उत्तम नमुना असलेल्या या विहिरींचा ठेवा जपल्यास गावाची ओळख कायम राहण्यासोबत पर्यटकांनाही त्यांचे आकर्षण राहील.

टॅग्स :SocialसामाजिकhistoryइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण