शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

वैरागडमधील ऐतिहासिक ठेवा जपण्याकडे दुर्लक्ष; १०० विहिरींचे गाव ही ओळख होतेय लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 16:19 IST

शिवकालीन ‘हातीगुंफा’ शिलालेखात वैरागडचा उल्लेख सापडतो.

प्रदीप बोडणे

वैरागड (गडचिरोली) : सोळाव्या शतकातील बाजारपेठेचे गाव असणाऱ्या वैरागड येथे पूर्वी हिऱ्याची खाण होती. या खाणीच्या संरक्षणार्थ तत्कालीन राजाने किल्ला बांधला होता. या किल्ल्यात आणि गावाच्या सीमावर्ती भागात मजबूत धाटणीच्या गोलाकार, त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी अशा विविध आकाराच्या १०० विहिरी आहेत. काळाच्या ओघात त्यातील बहुतांश विहिरी नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे ‘१०० विहिरींचे गाव’ अशी या गावाची ओळख आता नष्ट होऊ पाहात आहे.

आरमोरी या तालुक्याच्या ठिकाणापासून १५ कि.मी. अंतरावर पूर्वेला वैरागड हे गाव आहे. येथे ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वर मंदिर, गोरजाई मंदिर, आदिशक्ती देवीची मूर्ती आणि इतर हेमाडपंथी मंदिरे आहेत. या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शिवकालीन ‘हातीगुंफा’ शिलालेखात वैरागडचा उल्लेख सापडतो.

हिऱ्याच्या खाणीला संस्कृतमध्ये वज्रगर असे म्हणतात. त्याचा अपभ्रंश होऊन वैरागड असे नाव प्रचलित झाल्याचे सांगितले जाते. तत्कालीन संयुक्त मध्यप्रदेश राज्यात या भागाचा समावेश होता. त्यावेळी चंद्रपूर, वैरागड, राजनांदगाव या मोठ्या बाजारपेठा होत्या. वैरागडमधील भौगोलिक खुणा लक्षात घेता येथे मोठे गाव असावे असे लक्षात येते. गावाच्या सीमावर्ती भागात १०० ते २०० फुटांवर विहिरी आढळून येतात.

पर्यटकांसाठी आकर्षण

वैरागड किल्ल्याच्या १२ एकरात सभोवती बुरूज, तट आहेत. मधल्या परिसरात आज ८ विहिरी आहेत. त्या विहिरी त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, अष्टकोनी व गोलाकार आहे. त्यात एक पायऱ्यांची विहीरसुद्धा आहे. या पायऱ्यांच्या विहिरीची बरीच पडझड झाली आहे. पण या विहिरींची जपणूक करण्याकडे पुरातत्त्व विभागाचे लक्ष नाही. बांधकामासाठी पाण्याची गरज असल्याने गेल्यावर्षी एका विहिरीची पुरातत्त्व विभागाने दुरुस्ती केली. या विहिरी किल्ला पाहायला येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

वारसा जपण्याची गरज

गावातील विहिरींची संख्या मोठी असून एका चौकात उभे राहिल्यास थोड्याच अंतरावर ४ ते ५ विहिरी दृष्टीत पडतात. विहिरींची बांधणी योग्य असल्याने त्या अजूनही सुस्थितीत आहेत. त्यांचे पाणीही गोड आहे. पण बोअरवेलसह पाण्याचे इतर स्रोत निर्माण झाल्याने या विहिरींच्या पाण्याचा वापर क्वचितच होतो. वापर नसल्याने त्यात कचराही जमला आहे. काही विहिरी तर कचऱ्याने बुजूनही गेल्या आहेत. कलाकुसरीचा उत्तम नमुना असलेल्या या विहिरींचा ठेवा जपल्यास गावाची ओळख कायम राहण्यासोबत पर्यटकांनाही त्यांचे आकर्षण राहील.

टॅग्स :SocialसामाजिकhistoryइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण