शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

युवतीची प्रियकराकडून गळा दाबून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 05:00 IST

ऑगस्ट २०२१ मध्ये ऐश्वर्या हिला संदीप ऊर्फ दुर्गेश रेखलाल पटले याने हरदोली शिवारातील वैनगंगा नदीकिनारी असलेल्या पंप हाउस येथे नेले. तिथे त्याने ऐश्वर्याचे डोके दोन-तीन वेळा भिंतीवर आपटून तिला खाली पाडले. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. नंतर तुषार व संदीप यांनी मिळून तिचा मृतदेह पंप हाउसच्या विहिरीत फेकून दिला. तिची बॅग तिथेच झुडपात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तब्बल दहा महिन्यांपूर्वी गायब झालेल्या युवतीच्या हत्येला अखेर वाचा फुटली आहे. तिच्या प्रियकरानेच आपल्या मित्राच्या मदतीने तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. सदर युवती कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील रहिवासी होती. या प्रकरणात प्रियकराला हत्येसाठी मदत करणाऱ्या मित्राला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली असून, प्रियकर मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेवाडा येथील ऐश्वर्या दिगंबर खोब्रागडे (२०) ही ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे फार्मसी कॉलेजला शिक्षण घेत होती. यादरम्यान १० ऑगस्ट २०२१ला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी ब्रह्मपुरी पोलिसांकडे केली होती. सदर मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे देसाईगंज येथील तुषार ऊर्फ तरुण राजू बुज्जेवार याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने ऐश्वर्याच्या गायब होण्यामागील रहस्य उघड केले.घटनास्थळावरून मुलीचा मृतदेह काढण्यात आला. तिची बॅगही झुडूपातून काढली. युवतीचे साहित्य, चप्पल आणि जीन्स पॅन्टवरून वडीलांनी तिची ओळख पटविली. 

प्रियकराला सोडवायचा होता तिचा ससेमिरा या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप पटले याचे देसाईगंजमध्ये वेल्डिंगचे दुकान आहे. ऐश्वर्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्यामुळे तिने त्याला लग्नाची गळ घातली. पण संदीप तिला टाळत होता. ऐश्वर्या आपला पिच्छा सोडत नाही हे पाहून त्याने तिचा ससेमिरा कायमचा सोडविण्यासाठी तिलाच संपवण्याचे ठरविले.

भिंतीवर डोके आपटले; नंतर गळा आवळलाआरोपी तुषार बुज्जेवार याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये ऐश्वर्या हिला संदीप ऊर्फ दुर्गेश रेखलाल पटले याने हरदोली शिवारातील वैनगंगा नदीकिनारी असलेल्या पंप हाउस येथे नेले. तिथे त्याने ऐश्वर्याचे डोके दोन-तीन वेळा भिंतीवर आपटून तिला खाली पाडले. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. नंतर तुषार व संदीप यांनी मिळून तिचा मृतदेह पंप हाउसच्या विहिरीत फेकून दिला. तिची बॅग तिथेच झुडपात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दाेन्ही आराेपींवर विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस