शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

जिल्ह्यात आता फक्त ६९.४९ टक्केच वनक्षेत्र; वनक्षेत्र झपाट्याने घटतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:47 IST

४२ वर्षांत ७ टक्क्यांनी घट : वृक्षतोडीचा परिणाम; १०,०१५.४८ वर्ग किमीवर जंगल

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यापासून विभाजनानंतर जिल्ह्यात एकूण भूभागापैकी ७६ टक्के जंगल होते. जिल्ह्यातील वनाची ही टक्केवारी आबालवृद्धांना जणूकाही तोंडपाठच होती; परंतु बेसुमार वृक्षतोड, वनावरील अतिक्रमण यासह वाढलेले शहरीकरण आदी कारणांमुळे वनक्षेत्र झपाट्याने घटले. डिसेंबर २०२४ मध्ये जाहीर झालेल्या २०२३ च्या वन सर्व्हेक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आता ६९.४९ टक्केच जंगल आहे. म्हणजेच ४२ वर्षांत तब्बल ७ टक्क्यांनी वनक्षेत्र कमी झालेले आहे.

जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४ हजार ४१२ चौ. कि.मी. आहे. जिल्हा निर्मितीनंतर येथे एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी ७६ टक्के जंगल होते. बहुतांश गावे जंगलातच होती. अगदी गावाला लागूनच जंगल होते. या वनजमिनीवर लोकांचे अतिक्रमण वाढले. अनेकांनी उपजीविकेसाठी जमिनीचा वापर केल्याने जंगल गावापासून दूर पळू लागले. जिल्ह्यातील दरवर्षी घटणारे जंगल वाढविणे व ते कायम राखण्याचे आव्हान वन विभागासह सामान्य नागरिकांपुढेसुद्धा आहे. 

०.७८ टक्क्यांनी दोन वर्षांत वृद्धीभारतीय वन सर्व्हेक्षण विभागाने जाहीर केलेल्या २०२१ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील वनांचे प्रमाण ६८.७१ टक्के होते. त्यानंतर २०२३ चा अहवाल डिसेंबर २०२४ मध्ये जाहीर केला यात ०.७८ टक्के वाढ होत जंगलाचे प्रमाण ६९.४९ टक्क्यांपर्यंत वाढले. मात्र ही वाढलेली टक्केवारी मूळ जंगलाच्या प्रमाणात घटीत गणली जाते. १०,०१५.४८ वर्ग किमीवर जंगल शिल्लक असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. 

नैसर्गिक जंगल तोडून वृक्षारोपण काय कामाचे नैसर्गिकरित्या असलेले झुडपी, काटेरी जंगल तोडून त्या त्या ठिकाणी कृत्रिमरित्या वृक्ष लागवड केली जाते. हा प्रकार निसर्ग प्रेमींच्या पचनी पडणारा नाही. नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या झाडांना वाढवण्याची गरज भासत नाही. जिल्ह्यात वृक्षारोपणाच्या नावावर निधी मुरवण्यासाठी झाडांची लागवड केली जात आहे. मात्र, ही योजना सपशेल फसवी व डोळ्यांत धूळ झोकणारी आहे.

वृक्षतोड रोखण्यासाठी उपाययोजना तोकडी ग्रामीण भागात सरपणासाठी वृक्षांची तोड केली जाते. गावखेड्यातील नागरिक वृक्षांची तोड करणार नाहीत, यासाठी २० ते २५ वर्षांपूर्वीच गॅस सिलिंडर वाटपासारख्या योजना राबविणे गरजेचे होते. परंतु सदर योजना उशिरा अंमलात आणल्या गेल्या. वृक्षतोड बंद व्हावी यासाठी शासनाने आतापर्यंत राबविलेल्या योजना तोकड्या ठरलेल्या आहेत

"जिल्ह्यात वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून तिचा उपयोग वहिवाटीसाठी केला जात आहे. शिवाय रस्ते, तलाव, मोठमोठे प्रकल्पसुद्धा यावर उभारले जात असल्याने वनांचे प्रमाण घटत आहे. यासाठी मानवच जबाबदार आहे. घटलेले जंगल पूर्ववत करणे आव्हानात्मक आहे." - प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :forestजंगलGadchiroliगडचिरोली