शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

जिल्ह्यात आता फक्त ६९.४९ टक्केच वनक्षेत्र; वनक्षेत्र झपाट्याने घटतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:47 IST

४२ वर्षांत ७ टक्क्यांनी घट : वृक्षतोडीचा परिणाम; १०,०१५.४८ वर्ग किमीवर जंगल

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यापासून विभाजनानंतर जिल्ह्यात एकूण भूभागापैकी ७६ टक्के जंगल होते. जिल्ह्यातील वनाची ही टक्केवारी आबालवृद्धांना जणूकाही तोंडपाठच होती; परंतु बेसुमार वृक्षतोड, वनावरील अतिक्रमण यासह वाढलेले शहरीकरण आदी कारणांमुळे वनक्षेत्र झपाट्याने घटले. डिसेंबर २०२४ मध्ये जाहीर झालेल्या २०२३ च्या वन सर्व्हेक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आता ६९.४९ टक्केच जंगल आहे. म्हणजेच ४२ वर्षांत तब्बल ७ टक्क्यांनी वनक्षेत्र कमी झालेले आहे.

जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४ हजार ४१२ चौ. कि.मी. आहे. जिल्हा निर्मितीनंतर येथे एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी ७६ टक्के जंगल होते. बहुतांश गावे जंगलातच होती. अगदी गावाला लागूनच जंगल होते. या वनजमिनीवर लोकांचे अतिक्रमण वाढले. अनेकांनी उपजीविकेसाठी जमिनीचा वापर केल्याने जंगल गावापासून दूर पळू लागले. जिल्ह्यातील दरवर्षी घटणारे जंगल वाढविणे व ते कायम राखण्याचे आव्हान वन विभागासह सामान्य नागरिकांपुढेसुद्धा आहे. 

०.७८ टक्क्यांनी दोन वर्षांत वृद्धीभारतीय वन सर्व्हेक्षण विभागाने जाहीर केलेल्या २०२१ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील वनांचे प्रमाण ६८.७१ टक्के होते. त्यानंतर २०२३ चा अहवाल डिसेंबर २०२४ मध्ये जाहीर केला यात ०.७८ टक्के वाढ होत जंगलाचे प्रमाण ६९.४९ टक्क्यांपर्यंत वाढले. मात्र ही वाढलेली टक्केवारी मूळ जंगलाच्या प्रमाणात घटीत गणली जाते. १०,०१५.४८ वर्ग किमीवर जंगल शिल्लक असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. 

नैसर्गिक जंगल तोडून वृक्षारोपण काय कामाचे नैसर्गिकरित्या असलेले झुडपी, काटेरी जंगल तोडून त्या त्या ठिकाणी कृत्रिमरित्या वृक्ष लागवड केली जाते. हा प्रकार निसर्ग प्रेमींच्या पचनी पडणारा नाही. नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या झाडांना वाढवण्याची गरज भासत नाही. जिल्ह्यात वृक्षारोपणाच्या नावावर निधी मुरवण्यासाठी झाडांची लागवड केली जात आहे. मात्र, ही योजना सपशेल फसवी व डोळ्यांत धूळ झोकणारी आहे.

वृक्षतोड रोखण्यासाठी उपाययोजना तोकडी ग्रामीण भागात सरपणासाठी वृक्षांची तोड केली जाते. गावखेड्यातील नागरिक वृक्षांची तोड करणार नाहीत, यासाठी २० ते २५ वर्षांपूर्वीच गॅस सिलिंडर वाटपासारख्या योजना राबविणे गरजेचे होते. परंतु सदर योजना उशिरा अंमलात आणल्या गेल्या. वृक्षतोड बंद व्हावी यासाठी शासनाने आतापर्यंत राबविलेल्या योजना तोकड्या ठरलेल्या आहेत

"जिल्ह्यात वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून तिचा उपयोग वहिवाटीसाठी केला जात आहे. शिवाय रस्ते, तलाव, मोठमोठे प्रकल्पसुद्धा यावर उभारले जात असल्याने वनांचे प्रमाण घटत आहे. यासाठी मानवच जबाबदार आहे. घटलेले जंगल पूर्ववत करणे आव्हानात्मक आहे." - प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :forestजंगलGadchiroliगडचिरोली