शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आला दिवाळीचा सण माेठा, यावर्षी आनंदाला नाही ताेटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2022 21:32 IST

यावर्षी मात्र काेराेनाचे संकट नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्त आहेत. शेतातील पिकांची स्थितीही उत्तम आहे. केंद्र शासनाने नुकतेच दाेन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले, तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यातही रक्कम जमा करण्यात आली आहे. परिणामी ‘दिवाळीचा सण माेठा, यावर्षी आनंदाला नाही ताेटा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील दाेन वर्षांतील दिवाळीवर काेराेनाचा प्रभाव हाेता. त्यामुळे हा सण साजरा करताना गर्दी झाल्यास नागरिकांच्या मनात अनामिक भीती निर्माण हाेत हाेती. यावर्षी मात्र काेराेनाचे संकट नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्त आहेत. शेतातील पिकांची स्थितीही उत्तम आहे. केंद्र शासनाने नुकतेच दाेन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले, तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यातही रक्कम जमा करण्यात आली आहे. परिणामी ‘दिवाळीचा सण माेठा, यावर्षी आनंदाला नाही ताेटा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यादिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन करतात. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी, भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. आश्विन शुद्ध चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी करतात. तिसऱ्या दिवशी  लक्ष्मीपूजन राहते. दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा धर्मनिष्ठ व उदार बळीराजाने यज्ञ करून प्रतिकारशक्ती मिळवली होती. भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. 

दिवाळी बघून पाऊस झाला गायब  -    आठ दिवसांपूर्वी जिल्ह्याला परतीच्या पावसाने झाेडपून काढले हाेते. हा पाऊस दिवाळीपर्यंत मुक्काम ठाेकणार काय, अशी शंका उपस्थित केली जात हाेती. मात्र, पाऊस परत गेेला आहे. त्यामुळे वातावरण आल्हाददायक आहे. नागरिकांना दिवाळीचा आनंद लुटता येणार आहे. 

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा -   चाैदा वर्षांचा वनवास संपल्यानंतर प्रभू रामचंद्र हे अयाेध्येत परतले ताे दिवस दिवाळीचा. या दिवशी अयाेध्येतील नागरिकांनी घरांसमाेर दीप लावून आनंदाेत्सव साजरा केला हाेता. त्यावेळी निश्चितच फटाके नव्हते. आता मात्र दिवाळीसाठी माेठ्या प्रमाणात फटाके फाेडले जातात. यामुळे ध्वनी व वायू प्रदूषण हाेते. फटाक्यांमुळे काही जणांचा जीव जातो. ही बाब लक्षात घेऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याकडे पुढाकार घेण्याची गरज आहे. 

बाजारपेठेत चार दिवसांपासून गर्दी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने सण अग्रिम रक्कम दिली आहे. खासगी कंपन्यांनी बाेनस दिला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यातही पैसे जमा झाले आहेत. प्रत्येकाच्या खिशात पैसा आला असल्याने विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मागील चार दिवसांपासून नागरिकांची गर्दी उसळली आहे.

कापूस व साेयाबीन काढणीस सुरुवात -    दिवाळी हा सण साेबत लक्ष्मी घेऊन येते असे मानले जाते. मागील आठ दिवसांपासून कापूस काढणीला सुरुवात झाली आहे. साेयाबीन व कमी कालावधीच्या धानाची काढणी पूर्ण झाली आहे. या उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरी लक्ष्मी येण्यास सुरुवात झाली आहे.  

साेयाबीन कापणीसाठी गेलेले मजूर परतले

-    दसऱ्यानंतर जिल्हाभरातील हजाराे मजूर यवतमाळ, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये साेयाबीन कापणीसाठी गेले हाेते. 

-    हे मजूर आता दिवाळीनिमित्त गावाकडे परत आले आहेत. मजुरीच्या पैशातून दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022