शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आला दिवाळीचा सण माेठा, यावर्षी आनंदाला नाही ताेटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2022 21:32 IST

यावर्षी मात्र काेराेनाचे संकट नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्त आहेत. शेतातील पिकांची स्थितीही उत्तम आहे. केंद्र शासनाने नुकतेच दाेन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले, तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यातही रक्कम जमा करण्यात आली आहे. परिणामी ‘दिवाळीचा सण माेठा, यावर्षी आनंदाला नाही ताेटा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील दाेन वर्षांतील दिवाळीवर काेराेनाचा प्रभाव हाेता. त्यामुळे हा सण साजरा करताना गर्दी झाल्यास नागरिकांच्या मनात अनामिक भीती निर्माण हाेत हाेती. यावर्षी मात्र काेराेनाचे संकट नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्त आहेत. शेतातील पिकांची स्थितीही उत्तम आहे. केंद्र शासनाने नुकतेच दाेन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले, तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यातही रक्कम जमा करण्यात आली आहे. परिणामी ‘दिवाळीचा सण माेठा, यावर्षी आनंदाला नाही ताेटा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यादिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन करतात. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी, भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. आश्विन शुद्ध चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी करतात. तिसऱ्या दिवशी  लक्ष्मीपूजन राहते. दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा धर्मनिष्ठ व उदार बळीराजाने यज्ञ करून प्रतिकारशक्ती मिळवली होती. भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. 

दिवाळी बघून पाऊस झाला गायब  -    आठ दिवसांपूर्वी जिल्ह्याला परतीच्या पावसाने झाेडपून काढले हाेते. हा पाऊस दिवाळीपर्यंत मुक्काम ठाेकणार काय, अशी शंका उपस्थित केली जात हाेती. मात्र, पाऊस परत गेेला आहे. त्यामुळे वातावरण आल्हाददायक आहे. नागरिकांना दिवाळीचा आनंद लुटता येणार आहे. 

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा -   चाैदा वर्षांचा वनवास संपल्यानंतर प्रभू रामचंद्र हे अयाेध्येत परतले ताे दिवस दिवाळीचा. या दिवशी अयाेध्येतील नागरिकांनी घरांसमाेर दीप लावून आनंदाेत्सव साजरा केला हाेता. त्यावेळी निश्चितच फटाके नव्हते. आता मात्र दिवाळीसाठी माेठ्या प्रमाणात फटाके फाेडले जातात. यामुळे ध्वनी व वायू प्रदूषण हाेते. फटाक्यांमुळे काही जणांचा जीव जातो. ही बाब लक्षात घेऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याकडे पुढाकार घेण्याची गरज आहे. 

बाजारपेठेत चार दिवसांपासून गर्दी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने सण अग्रिम रक्कम दिली आहे. खासगी कंपन्यांनी बाेनस दिला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यातही पैसे जमा झाले आहेत. प्रत्येकाच्या खिशात पैसा आला असल्याने विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मागील चार दिवसांपासून नागरिकांची गर्दी उसळली आहे.

कापूस व साेयाबीन काढणीस सुरुवात -    दिवाळी हा सण साेबत लक्ष्मी घेऊन येते असे मानले जाते. मागील आठ दिवसांपासून कापूस काढणीला सुरुवात झाली आहे. साेयाबीन व कमी कालावधीच्या धानाची काढणी पूर्ण झाली आहे. या उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरी लक्ष्मी येण्यास सुरुवात झाली आहे.  

साेयाबीन कापणीसाठी गेलेले मजूर परतले

-    दसऱ्यानंतर जिल्हाभरातील हजाराे मजूर यवतमाळ, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये साेयाबीन कापणीसाठी गेले हाेते. 

-    हे मजूर आता दिवाळीनिमित्त गावाकडे परत आले आहेत. मजुरीच्या पैशातून दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022