शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

हत्तींनी बैलाला चिखलात तुडवून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2022 23:04 IST

तलवारगडधील घटनेनंतर जंगली हत्तींच्या कळपाने गांगीन, प्रतापगडच्या दिशेने आगेकुच केली. या हत्तींनी गांगीनमधील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हिरालाल चमरू नैताम यांच्या बैलाला पायाने तुडवून चिखलात गाडले. मृत बैलाचे चिखलात पूर्णपणे माखलेले पाय तेवढे ओळखायला येत होते. बैलाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे साधारण २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. 

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील तलवारगडमधील वृद्धाला जीवानिशी मारल्यानंतर जंगली हत्तींनी गांगीन या गावातील शेतकऱ्याच्या एका बैलाला चक्क पायांनी तुडवून चिखलात गाडले. या प्रकारामुळे शेतकरीवर्ग आणखीच भयभीत झाला आहे. तलवारगडधील घटनेनंतर जंगली हत्तींच्या कळपाने गांगीन, प्रतापगडच्या दिशेने आगेकुच केली. या हत्तींनी गांगीनमधील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हिरालाल चमरू नैताम यांच्या बैलाला पायाने तुडवून चिखलात गाडले. मृत बैलाचे चिखलात पूर्णपणे माखलेले पाय तेवढे ओळखायला येत होते. बैलाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे साधारण २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. जंगली हत्तींनी शेतीच्या व घराच्या केलेल्या नुकसानीमुळे वन विभागाने स्थानिक पातळीवर जाऊन पंचनामे करणे गरजेचे आहे; पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाकडे हेलपाटे मारावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करणे, कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, स्टॅम्प पेपर घ्यायला लावणे ही कामे सांगून शेतकऱ्यांच्या जखमेवर वन विभागाचे कर्मचारी मीठ चोळत असल्याची भावना काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना वनविभागाने अशा पद्धतीने त्रास देऊ नये, अशी अपेक्षा केली जात आहे. वनविभागाने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवून आवश्यक असलेली कागदपत्रे स्थानिक पातळीवर उपलब्ध करून पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

एका दिवसात पार केले ४० किलोमीटरचे अंतरगांगीन प्रतापगड येथे नुकसान केल्यानंतर हे हत्ती कुठे गेले आहेत याचा शोध लागत नसल्याने मुरुमगाव, मालेवाडा आणि बेळगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले होते. हत्तींचा माग काढला तेव्हा ते रात्रभरातून ३० ते ४० किलोमीटर अंतर चालून पुराडा वनपरिक्षेत्रातील लवारीच्या जंगलात असल्याची माहिती पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोले यांनी दिली. मंगळवारी कुठेही जंगली हत्तींनी नुकसान केल्याची घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘त्या’ आदिवासी वृद्धाचा मृतदेह २४ तास गावातच पडून

मुरुमगाव वनपरिक्षेत्रातील तलवारगड या गावामध्ये शुक्रवारी सायंकाळी हत्तींनी पायाने तुडवून ठार केलेल्या धनसिंग टेकाम (७१ वर्ष) यांचा मृतदेह २४ तास गावातच पडून राहिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम बंगालवरून आलेली हुल्ला टीम वेळेवर कार्यरत असती, तर वृद्धाचा मृतदेह गावात पडून राहिला नसता. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. - मुरुमगावचे आरएफओ अविनाश भडांगे यांनी सांगितले की, हत्तीपासून बचाव करीत गावात जाणे अडचणीचे असल्यामुळे उशीर झाला. मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाकडून २० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव तयार करीत आहे. हुल्ला टीमचे सदस्य फक्त सातच लोक असल्याने हत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे गडचिरोली व वडसा डिव्हिजनसाठी वेगवेगळ्या दोन टीम देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग