शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

हत्तींनी बैलाला चिखलात तुडवून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2022 23:04 IST

तलवारगडधील घटनेनंतर जंगली हत्तींच्या कळपाने गांगीन, प्रतापगडच्या दिशेने आगेकुच केली. या हत्तींनी गांगीनमधील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हिरालाल चमरू नैताम यांच्या बैलाला पायाने तुडवून चिखलात गाडले. मृत बैलाचे चिखलात पूर्णपणे माखलेले पाय तेवढे ओळखायला येत होते. बैलाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे साधारण २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. 

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील तलवारगडमधील वृद्धाला जीवानिशी मारल्यानंतर जंगली हत्तींनी गांगीन या गावातील शेतकऱ्याच्या एका बैलाला चक्क पायांनी तुडवून चिखलात गाडले. या प्रकारामुळे शेतकरीवर्ग आणखीच भयभीत झाला आहे. तलवारगडधील घटनेनंतर जंगली हत्तींच्या कळपाने गांगीन, प्रतापगडच्या दिशेने आगेकुच केली. या हत्तींनी गांगीनमधील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हिरालाल चमरू नैताम यांच्या बैलाला पायाने तुडवून चिखलात गाडले. मृत बैलाचे चिखलात पूर्णपणे माखलेले पाय तेवढे ओळखायला येत होते. बैलाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे साधारण २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. जंगली हत्तींनी शेतीच्या व घराच्या केलेल्या नुकसानीमुळे वन विभागाने स्थानिक पातळीवर जाऊन पंचनामे करणे गरजेचे आहे; पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाकडे हेलपाटे मारावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करणे, कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, स्टॅम्प पेपर घ्यायला लावणे ही कामे सांगून शेतकऱ्यांच्या जखमेवर वन विभागाचे कर्मचारी मीठ चोळत असल्याची भावना काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना वनविभागाने अशा पद्धतीने त्रास देऊ नये, अशी अपेक्षा केली जात आहे. वनविभागाने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवून आवश्यक असलेली कागदपत्रे स्थानिक पातळीवर उपलब्ध करून पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

एका दिवसात पार केले ४० किलोमीटरचे अंतरगांगीन प्रतापगड येथे नुकसान केल्यानंतर हे हत्ती कुठे गेले आहेत याचा शोध लागत नसल्याने मुरुमगाव, मालेवाडा आणि बेळगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले होते. हत्तींचा माग काढला तेव्हा ते रात्रभरातून ३० ते ४० किलोमीटर अंतर चालून पुराडा वनपरिक्षेत्रातील लवारीच्या जंगलात असल्याची माहिती पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोले यांनी दिली. मंगळवारी कुठेही जंगली हत्तींनी नुकसान केल्याची घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘त्या’ आदिवासी वृद्धाचा मृतदेह २४ तास गावातच पडून

मुरुमगाव वनपरिक्षेत्रातील तलवारगड या गावामध्ये शुक्रवारी सायंकाळी हत्तींनी पायाने तुडवून ठार केलेल्या धनसिंग टेकाम (७१ वर्ष) यांचा मृतदेह २४ तास गावातच पडून राहिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम बंगालवरून आलेली हुल्ला टीम वेळेवर कार्यरत असती, तर वृद्धाचा मृतदेह गावात पडून राहिला नसता. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. - मुरुमगावचे आरएफओ अविनाश भडांगे यांनी सांगितले की, हत्तीपासून बचाव करीत गावात जाणे अडचणीचे असल्यामुळे उशीर झाला. मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाकडून २० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव तयार करीत आहे. हुल्ला टीमचे सदस्य फक्त सातच लोक असल्याने हत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे गडचिरोली व वडसा डिव्हिजनसाठी वेगवेगळ्या दोन टीम देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग