शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींनी बैलाला चिखलात तुडवून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2022 23:04 IST

तलवारगडधील घटनेनंतर जंगली हत्तींच्या कळपाने गांगीन, प्रतापगडच्या दिशेने आगेकुच केली. या हत्तींनी गांगीनमधील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हिरालाल चमरू नैताम यांच्या बैलाला पायाने तुडवून चिखलात गाडले. मृत बैलाचे चिखलात पूर्णपणे माखलेले पाय तेवढे ओळखायला येत होते. बैलाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे साधारण २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. 

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील तलवारगडमधील वृद्धाला जीवानिशी मारल्यानंतर जंगली हत्तींनी गांगीन या गावातील शेतकऱ्याच्या एका बैलाला चक्क पायांनी तुडवून चिखलात गाडले. या प्रकारामुळे शेतकरीवर्ग आणखीच भयभीत झाला आहे. तलवारगडधील घटनेनंतर जंगली हत्तींच्या कळपाने गांगीन, प्रतापगडच्या दिशेने आगेकुच केली. या हत्तींनी गांगीनमधील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हिरालाल चमरू नैताम यांच्या बैलाला पायाने तुडवून चिखलात गाडले. मृत बैलाचे चिखलात पूर्णपणे माखलेले पाय तेवढे ओळखायला येत होते. बैलाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे साधारण २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. जंगली हत्तींनी शेतीच्या व घराच्या केलेल्या नुकसानीमुळे वन विभागाने स्थानिक पातळीवर जाऊन पंचनामे करणे गरजेचे आहे; पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाकडे हेलपाटे मारावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करणे, कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, स्टॅम्प पेपर घ्यायला लावणे ही कामे सांगून शेतकऱ्यांच्या जखमेवर वन विभागाचे कर्मचारी मीठ चोळत असल्याची भावना काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना वनविभागाने अशा पद्धतीने त्रास देऊ नये, अशी अपेक्षा केली जात आहे. वनविभागाने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवून आवश्यक असलेली कागदपत्रे स्थानिक पातळीवर उपलब्ध करून पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

एका दिवसात पार केले ४० किलोमीटरचे अंतरगांगीन प्रतापगड येथे नुकसान केल्यानंतर हे हत्ती कुठे गेले आहेत याचा शोध लागत नसल्याने मुरुमगाव, मालेवाडा आणि बेळगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले होते. हत्तींचा माग काढला तेव्हा ते रात्रभरातून ३० ते ४० किलोमीटर अंतर चालून पुराडा वनपरिक्षेत्रातील लवारीच्या जंगलात असल्याची माहिती पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोले यांनी दिली. मंगळवारी कुठेही जंगली हत्तींनी नुकसान केल्याची घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘त्या’ आदिवासी वृद्धाचा मृतदेह २४ तास गावातच पडून

मुरुमगाव वनपरिक्षेत्रातील तलवारगड या गावामध्ये शुक्रवारी सायंकाळी हत्तींनी पायाने तुडवून ठार केलेल्या धनसिंग टेकाम (७१ वर्ष) यांचा मृतदेह २४ तास गावातच पडून राहिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम बंगालवरून आलेली हुल्ला टीम वेळेवर कार्यरत असती, तर वृद्धाचा मृतदेह गावात पडून राहिला नसता. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. - मुरुमगावचे आरएफओ अविनाश भडांगे यांनी सांगितले की, हत्तीपासून बचाव करीत गावात जाणे अडचणीचे असल्यामुळे उशीर झाला. मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाकडून २० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव तयार करीत आहे. हुल्ला टीमचे सदस्य फक्त सातच लोक असल्याने हत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे गडचिरोली व वडसा डिव्हिजनसाठी वेगवेगळ्या दोन टीम देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग