शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

गौरी-गणपतीचा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळालाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 14:14 IST

१०० रुपयांत चार जिन्नस : सण संपल्यानंतर गोडधड करणार काय?

दिगांबर जवादे लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गौरीगणपती सणासाठी दिला जाणारा आनंदाचा शिधा अजूनपर्यंत लाभार्थ्यांना उपलब्ध झाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये पुरवठा विभागाविषयी असंतोष निर्माण झाला आहे. ज्या सणाच्या निमित्ताने शिधा दिला जातो तो त्या कालावधीतच देण्यात यावा, अशी अपेक्षा लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

वर्षभरात विविध सणउत्सव साजरे केले जातात. या सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्य शासनामार्फत रेशन दुकानातून काही निवडक सणांसाठी १०० रुपयांमध्ये काही निवडक जिन्नस दिले जात आहेत. नागरिकांना सदर जिन्नस कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने त्याची प्रतीक्षा करीत असतात. ज्या सणासाठी आनंदाचा शिधा जाहीर करण्यात आला आहे. त्याच सणाच्या काही दिवसांपूर्वी त्याचे वितरण होणे आवश्यक आहे. तेव्हाच त्याचे महत्त्व राहते. मात्र बऱ्याचवेळा सण संपल्यावर आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळत आहे. कोणता सण कोणत्या तारखेला आहे. ही बाब पुरवठा विभागाला माहीत असते. त्यानुसार त्या सणाच्या काही दिवसांपूर्वी शिधा पोहोचेल याचे नियोजन संबंधित विभागाने करणे आवश्यक असते. मात्र नियोजन केले जात नसल्याने सणाच्या पहिले आनंदाचा शिधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

केवळ रवा पोहोचला लाभार्थ्यांना वितरित केला जाणारे धान्य सर्वप्रथम तालुकास्तरावरील गोदामात साठवले जाते. त्यानंतर त्याचे वितरण रेशन दुकानांमध्ये केले जाते. तालुक्याच्या गोदामात केवळ रवा पोहोचला आहे. उर्वरित जिन्नस तर मिळालेच नाही. ते कधी मिळणार हे पुरवठा विभागही सांगण्यास तयार नाहीत. केवळ शासनाकडून आपल्याला जिल्ह्यात शिधा मिळाला नाही, असे उत्तर देऊन पुरवठा विभागाचे अधिकारी मोकळे होतात.

कोणकोणते जिन्नस मिळणार? 

  • चार प्रकारचे जिन्नस असलेला आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. यामध्ये एक किलो तेल, एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखर यांचा समावेश आहे. मात्र यापैकी केवळ रवा प्राप्त झाला आहे.
  • उर्वरित जिन्नस प्राप्त झाले नाहीत. गौरीचा सण तर आता संपला आहे. गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. तेही तीन, पाच व दहा दिवसांनी उठतील. त्यानंतर तर जर शिधा मिळाला तर या शिध्याचा अर्थ काय? असा प्रश्न आहे.

पुरवठा विभागाचा नियोजनशून्य कारभार गडचिरोली जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा अनुभव येथील नागरिकांना अनेकवेळा आला आहे. रेशनचे धान्य लाभार्थ्यांना कधीच वेळेवर मिळत नाही. घरचे धान्य संपल्याने गरीब नागरिकांना खासगी दुकानातून धान्य खरेदी करावे लागते. त्यासाठी मजुरीचे पैसे खर्च होतात. परिणामी नियोजन बिघडते.

"ज्या सणाच्या नावाने आनंदाचा शिधा जाहीर केला आहे. तो त्या सणाच्या पूर्वी मिळणे अपेक्षित आहे. मात्र तो वेळेवर मिळत नाही. परिणामी लाभार्थी नाराज होतात. सणाच्या पूर्वी शिधा मिळेल यासाठी पुरवठा विभागाने नियोजन करावे."- अनिल भांडेकर, रेशन दुकानदार

"पुरवठा विभाग शिधा व धान्य उपलब्ध करून देत नाही. लाभार्थ्यांच्या रोषाला मात्र रेशन दुकानदारांना बळी पडावे लागते. धान्यासाठी येणारे लाभार्थी आनंदाच्या शिधासाठी विचारत आहे. त्यांना उत्तर देताना नाकीनऊ येत आहे." - रुपेश वलके, रेशन दुकानदार

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Gadchiroliगडचिरोली